शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर सर्वात मोठे धरण बांधण्यास सुरुवात केली; भारताने आधीच घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:57 IST

हे धरण अरुणाचल प्रदेशजवळील तिबेटमधील न्यिंगची शहरात बांधण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी ब्रह्मपुत्र नदी यू-टर्न घेते आणि अरुणाचल प्रदेशमार्गे बांगलादेशला जाते.

चीन जगातील सर्वात मोठे धरण बांधण्यास सुरुवात करत आहे. हे धरण ब्रह्मपुत्र नदीवर बांधण्यात येणार आहे. या धरणाचे नाव यारलुंग झांगबो आहे. हे धरण बांधण्यासाठी १६७.८ अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच १ लाख ४४ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. पण, हे धरण बांधायला सुरुवात करण्याआधीच भारताने आक्षेप घेतला आहे. 

झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार

अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळच हे धरण होणार आहे. यामुळे खालील गावांना याचा फटका बसू शकतो. खाली असणाऱ्या गावांना पुराचा धोका होऊ शकतो. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या धरणावर आक्षेप घेतला आहे. भारताने चीनला ब्रह्मपुत्रेवर असे कोणतेही काम करू नये असे सांगितले होते, यामुळे खालच्या भागात राहणाऱ्या लोकसंख्येचे नुकसान होईल. त्यानंतर चीनची बाजूही समोर आली. चीनने म्हटले होते की, या प्रकल्पामुळे खालच्या भागातील देशांचे कोणतेही नुकसान होणार नाही. ते या धरणाबद्दल इतर देशांशी चर्चा करत राहतील. यापूर्वी १८ डिसेंबर २०२४ रोजी एनएसए अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात पाण्याबाबत चर्चा झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, चीन एक जलविद्युत प्रकल्प बांधत आहे. त्याची पायाभरणी चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी शनिवारी, १९ जुलै रोजी केली. अरुणाचल प्रदेशजवळील तिबेटमधील न्यिंगची शहरात हे धरण बांधले जाणार आहे. तिथे ब्रह्मपुत्र नदी एक मोठा यू-टर्न घेते आणि अरुणाचल प्रदेशमार्गे बांगलादेशला जाते.

या जलविद्युत प्रकल्पात पाच कॅस्केड पॉवर स्टेशन असतील. यामुळे दरवर्षी ३०० अब्ज किलोवॅट-तासांपेक्षा जास्त वीज निर्मिती होईल. दरवर्षी ३० कोटी लोकांना वीज पुरवली जाईल. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. त्यावर बांधकाम सुरू झाले आहे.

सीमावर्ती भागात पूरसदृश परिस्थिती 

चीनच्या या प्रकल्पामुळे भारत आणि बांगलादेशमध्ये चिंता निर्माण झाली आहे. ज्या ठिकाणी हे धरण बांधले जात आहे त्या भागात अनेकदा भूकंप होतात. धरण बांधल्याने परिसंस्थेवर दबाव येऊ शकतो. यामुळे मोठे अपघात होऊ शकतात. याशिवाय ब्रह्मपुत्र नदीच्या पाण्यावर चीनचे नियंत्रण असेल. यामुळे बीजिंगसह इतर शहरांना पाणीपुरवठा करण्यास मदत होईल. तसेच जर या धरणातून एकाच वेळी पाणी सोडले तर सीमावर्ती भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनीही आक्षेप घेतला होता. त्यांनी चीनच्या या धरणाला 'वॉटर बॉम्ब' म्हटले होते. 'हा प्रकल्प केवळ पर्यावरण किंवा जल सुरक्षेचा विषय नाही. तर तो भारतासाठी अस्तित्वाचा धोका आहे. यामुळे लष्करी धोका निर्माण होईल', असा त्यांनी इशारा दिला होता. 

सीमाभागाजवळ राहणाऱ्या आदिवासींचे जीवन आणि संसाधने उद्ध्वस्त होतील. कारण भविष्यात चीन या धरणाचा वापर शस्त्र म्हणून करू शकतो, असंही त्यांनी म्हटले होते. 

टॅग्स :chinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश