शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
2
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
3
पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी PSI चा दबाव; विरोध केल्याने महिला डॉक्टरचा सुरु होता छळ, शेवटी...
4
आशियात नव्या युद्धाची चाहूल; किम जोंगच्या सैनिकांवर दक्षिण कोरियाचा गोळीबार, कारण काय..?
5
ग्लोव्ह्ज कापून काढले, सलाईन लावताना सुई मोडली! तिलक वर्मानं केलाय 'या' जीवघेण्या आजाराचा सामना
6
Carbide Gun : दिवाळीच्या आनंदावर विरजण! ३०० जणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत; 'कार्बाइड गन' आहे तरी काय?
7
'बिग बॉस'मध्ये प्रणित मोरेचा पुन्हा कॉमेडी शो, सदस्यांना खळखळून हसवलं; नेटकरी म्हणतात...
8
आयडियाची कल्पना! सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी लढवली शक्कल; डोकं केलं पिंजऱ्यात बंद
9
Phaltan Crime: महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? आयुष्य संपविण्यापूर्वी ती तिथे कशी पोहोचली? 
10
१ नोव्हेंबरपासून बदलणार नियम! आता बँक खात्यांसाठी तुम्हाला ठेवता येणार एकापेक्षा अधिक 'वारस'दार, जाणून घ्या
11
रोहित शर्माला मिडिया फोटोसाठी हाक मारताच गौतम गंभीर म्हणाला, "फोटो काढून घे, सगळ्यांना..."
12
पाकिस्तानने 'या' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी, १६ नागरिकांच्या मृत्यूनंतर 'उशिराने शहाणपण'
13
दिल्लीत बॉम्बस्फोटाचा कट उधळला; दोन ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
VIRAL VIDEO : वय केवळ आकडाच! ८२ वर्षांच्या आजीने केली भारतातील सगळ्यात उंच बंजी जम्पिंग; पाहून अंगावर येतील शहारे
15
'या' आयपीओचं बंपर लिस्टिंग! पहिल्याच दिवशी ९ टक्क्यांचा नफा, गुंतवणूकदार मालामाल
16
Budh Gochar 2025: २४ ऑक्टोबर बुध गोचर; १० नोव्हेंबरपर्यंत 'वृश्चिक' राशीच्या लोकांनी घ्या 'ही' काळजी!
17
हसतं खेळतं घर उद्ध्वस्त! बसच्या भीषण आगीत कुटुंब संपलं; आई-वडिलांसह २ मुलांचा मृत्यू
18
Ladki Bahin eKYC: लाडकी बहीणच्या e-KYC साठी दिवाळीची वेळ होती सर्वोत्तम...; पठ्ठ्याने धडाधड घरातल्या, पाहुण्या रावळ्यांच्याही करून टाकल्या...
19
VIRAL VIDEO : 'मराठीत बोला नाहीतर मुंबई सोडा'; एअर इंडिया फ्लाईटमध्ये यूट्यूबरला महिला प्रवाशाची धमकी
20
अ‍ॅपलने उचललं मोठं पाऊल; स्टोअरमधून काढून टाकले 'हे' व्हायरल डेटिंग अ‍ॅप! काय आहे कारण?

चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर सर्वात मोठे धरण बांधण्यास सुरुवात केली; भारताने आधीच घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:57 IST

हे धरण अरुणाचल प्रदेशजवळील तिबेटमधील न्यिंगची शहरात बांधण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी ब्रह्मपुत्र नदी यू-टर्न घेते आणि अरुणाचल प्रदेशमार्गे बांगलादेशला जाते.

चीन जगातील सर्वात मोठे धरण बांधण्यास सुरुवात करत आहे. हे धरण ब्रह्मपुत्र नदीवर बांधण्यात येणार आहे. या धरणाचे नाव यारलुंग झांगबो आहे. हे धरण बांधण्यासाठी १६७.८ अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच १ लाख ४४ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. पण, हे धरण बांधायला सुरुवात करण्याआधीच भारताने आक्षेप घेतला आहे. 

झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार

अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळच हे धरण होणार आहे. यामुळे खालील गावांना याचा फटका बसू शकतो. खाली असणाऱ्या गावांना पुराचा धोका होऊ शकतो. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या धरणावर आक्षेप घेतला आहे. भारताने चीनला ब्रह्मपुत्रेवर असे कोणतेही काम करू नये असे सांगितले होते, यामुळे खालच्या भागात राहणाऱ्या लोकसंख्येचे नुकसान होईल. त्यानंतर चीनची बाजूही समोर आली. चीनने म्हटले होते की, या प्रकल्पामुळे खालच्या भागातील देशांचे कोणतेही नुकसान होणार नाही. ते या धरणाबद्दल इतर देशांशी चर्चा करत राहतील. यापूर्वी १८ डिसेंबर २०२४ रोजी एनएसए अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात पाण्याबाबत चर्चा झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, चीन एक जलविद्युत प्रकल्प बांधत आहे. त्याची पायाभरणी चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी शनिवारी, १९ जुलै रोजी केली. अरुणाचल प्रदेशजवळील तिबेटमधील न्यिंगची शहरात हे धरण बांधले जाणार आहे. तिथे ब्रह्मपुत्र नदी एक मोठा यू-टर्न घेते आणि अरुणाचल प्रदेशमार्गे बांगलादेशला जाते.

या जलविद्युत प्रकल्पात पाच कॅस्केड पॉवर स्टेशन असतील. यामुळे दरवर्षी ३०० अब्ज किलोवॅट-तासांपेक्षा जास्त वीज निर्मिती होईल. दरवर्षी ३० कोटी लोकांना वीज पुरवली जाईल. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. त्यावर बांधकाम सुरू झाले आहे.

सीमावर्ती भागात पूरसदृश परिस्थिती 

चीनच्या या प्रकल्पामुळे भारत आणि बांगलादेशमध्ये चिंता निर्माण झाली आहे. ज्या ठिकाणी हे धरण बांधले जात आहे त्या भागात अनेकदा भूकंप होतात. धरण बांधल्याने परिसंस्थेवर दबाव येऊ शकतो. यामुळे मोठे अपघात होऊ शकतात. याशिवाय ब्रह्मपुत्र नदीच्या पाण्यावर चीनचे नियंत्रण असेल. यामुळे बीजिंगसह इतर शहरांना पाणीपुरवठा करण्यास मदत होईल. तसेच जर या धरणातून एकाच वेळी पाणी सोडले तर सीमावर्ती भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनीही आक्षेप घेतला होता. त्यांनी चीनच्या या धरणाला 'वॉटर बॉम्ब' म्हटले होते. 'हा प्रकल्प केवळ पर्यावरण किंवा जल सुरक्षेचा विषय नाही. तर तो भारतासाठी अस्तित्वाचा धोका आहे. यामुळे लष्करी धोका निर्माण होईल', असा त्यांनी इशारा दिला होता. 

सीमाभागाजवळ राहणाऱ्या आदिवासींचे जीवन आणि संसाधने उद्ध्वस्त होतील. कारण भविष्यात चीन या धरणाचा वापर शस्त्र म्हणून करू शकतो, असंही त्यांनी म्हटले होते. 

टॅग्स :chinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश