शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर सर्वात मोठे धरण बांधण्यास सुरुवात केली; भारताने आधीच घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:57 IST

हे धरण अरुणाचल प्रदेशजवळील तिबेटमधील न्यिंगची शहरात बांधण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी ब्रह्मपुत्र नदी यू-टर्न घेते आणि अरुणाचल प्रदेशमार्गे बांगलादेशला जाते.

चीन जगातील सर्वात मोठे धरण बांधण्यास सुरुवात करत आहे. हे धरण ब्रह्मपुत्र नदीवर बांधण्यात येणार आहे. या धरणाचे नाव यारलुंग झांगबो आहे. हे धरण बांधण्यासाठी १६७.८ अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच १ लाख ४४ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. पण, हे धरण बांधायला सुरुवात करण्याआधीच भारताने आक्षेप घेतला आहे. 

झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार

अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळच हे धरण होणार आहे. यामुळे खालील गावांना याचा फटका बसू शकतो. खाली असणाऱ्या गावांना पुराचा धोका होऊ शकतो. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या धरणावर आक्षेप घेतला आहे. भारताने चीनला ब्रह्मपुत्रेवर असे कोणतेही काम करू नये असे सांगितले होते, यामुळे खालच्या भागात राहणाऱ्या लोकसंख्येचे नुकसान होईल. त्यानंतर चीनची बाजूही समोर आली. चीनने म्हटले होते की, या प्रकल्पामुळे खालच्या भागातील देशांचे कोणतेही नुकसान होणार नाही. ते या धरणाबद्दल इतर देशांशी चर्चा करत राहतील. यापूर्वी १८ डिसेंबर २०२४ रोजी एनएसए अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात पाण्याबाबत चर्चा झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, चीन एक जलविद्युत प्रकल्प बांधत आहे. त्याची पायाभरणी चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी शनिवारी, १९ जुलै रोजी केली. अरुणाचल प्रदेशजवळील तिबेटमधील न्यिंगची शहरात हे धरण बांधले जाणार आहे. तिथे ब्रह्मपुत्र नदी एक मोठा यू-टर्न घेते आणि अरुणाचल प्रदेशमार्गे बांगलादेशला जाते.

या जलविद्युत प्रकल्पात पाच कॅस्केड पॉवर स्टेशन असतील. यामुळे दरवर्षी ३०० अब्ज किलोवॅट-तासांपेक्षा जास्त वीज निर्मिती होईल. दरवर्षी ३० कोटी लोकांना वीज पुरवली जाईल. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. त्यावर बांधकाम सुरू झाले आहे.

सीमावर्ती भागात पूरसदृश परिस्थिती 

चीनच्या या प्रकल्पामुळे भारत आणि बांगलादेशमध्ये चिंता निर्माण झाली आहे. ज्या ठिकाणी हे धरण बांधले जात आहे त्या भागात अनेकदा भूकंप होतात. धरण बांधल्याने परिसंस्थेवर दबाव येऊ शकतो. यामुळे मोठे अपघात होऊ शकतात. याशिवाय ब्रह्मपुत्र नदीच्या पाण्यावर चीनचे नियंत्रण असेल. यामुळे बीजिंगसह इतर शहरांना पाणीपुरवठा करण्यास मदत होईल. तसेच जर या धरणातून एकाच वेळी पाणी सोडले तर सीमावर्ती भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनीही आक्षेप घेतला होता. त्यांनी चीनच्या या धरणाला 'वॉटर बॉम्ब' म्हटले होते. 'हा प्रकल्प केवळ पर्यावरण किंवा जल सुरक्षेचा विषय नाही. तर तो भारतासाठी अस्तित्वाचा धोका आहे. यामुळे लष्करी धोका निर्माण होईल', असा त्यांनी इशारा दिला होता. 

सीमाभागाजवळ राहणाऱ्या आदिवासींचे जीवन आणि संसाधने उद्ध्वस्त होतील. कारण भविष्यात चीन या धरणाचा वापर शस्त्र म्हणून करू शकतो, असंही त्यांनी म्हटले होते. 

टॅग्स :chinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश