शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

चीनला खडसावले, अरुणाचल भारताचेच; परराष्ट्रमंत्र्यांनी चीनचा दावा फेटाळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 08:32 IST

सीमावर्ती राज्य असलेले अरुणाचल प्रदेश ‘भारताचा अविभाज्य भाग’ असल्याचे ते म्हणाले.

सिंगापूर : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी अरुणाचल प्रदेशवर चीनचा दावा ‘हास्यास्पद’ असल्याचे सांगत  त्यांचा दावा फेटाळून लावला. सीमावर्ती राज्य असलेले अरुणाचल प्रदेश ‘भारताचा अविभाज्य भाग’ असल्याचे ते म्हणाले. येथील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (एनयूएस)च्या प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट ऑफ साउथ एशियन स्टडीज (आएसएस)मध्ये अरुणाचल प्रदेश मुद्द्यावर व्याख्यान दिल्यानंतर एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘हा काही नवीन मुद्दा नाही. म्हणजे चीनने दावा केला आहे, त्याने आपला दावा वाढवला आहे. दावा सुरुवातीस हास्यास्पद होता आणि आजही हास्यास्पद आहे,’ परराष्ट्रमंत्री जयशंकर, जे येथे तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत, बोलताना त्यांनी अरुणाचल प्रदेश हा भारताचा नैसर्गिक भाग आहे यावर भर दिला.

नेताजी बोस व आझाद हिंद सेनेला अभिवादन करत सिंगापूर दौऱ्याची सुरुवात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी सिंगापूर येथील युद्ध स्मारकावर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना आदरांजली अर्पण करून त्यांच्या तीन दिवसीय सिंगापूर दौऱ्याची सुरुवात केली. एक्सवर पोस्टमध्ये जयशंकर म्हणाले की, ‘नेताजी आणि आझाद हिंद सेनेच्या शूर सैनिकांना आदरांजली अर्पण करून दौऱ्याची सुरुवात केली. त्यांची प्रखर देशभक्ती येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.’ 

‘द्विपक्षीय संबंध वाढवण्याची संधी’ जयशंकर भेटीदरम्यान सिंगापूरच्या पंतप्रधान ली सिएन लुंग यांच्यासह प्रमुख नेत्यांची भेट घेतील. सिंगापूरच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की, ‘जयशंकर यांची भेट सिंगापूर आणि भारत यांच्यातील घनिष्ठ मैत्रीला अधोरेखित करते. दोन्ही बाजूंना प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारविनिमय करण्याची, तसेच द्विपक्षीय सहकार्यातील चांगल्या प्रगतीवर चर्चा सुरू ठेवण्याची या भेटीमुळे एक चांगली संधी आहे.’

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकर