शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

चीनला खडसावले, अरुणाचल भारताचेच; परराष्ट्रमंत्र्यांनी चीनचा दावा फेटाळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 08:32 IST

सीमावर्ती राज्य असलेले अरुणाचल प्रदेश ‘भारताचा अविभाज्य भाग’ असल्याचे ते म्हणाले.

सिंगापूर : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी अरुणाचल प्रदेशवर चीनचा दावा ‘हास्यास्पद’ असल्याचे सांगत  त्यांचा दावा फेटाळून लावला. सीमावर्ती राज्य असलेले अरुणाचल प्रदेश ‘भारताचा अविभाज्य भाग’ असल्याचे ते म्हणाले. येथील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (एनयूएस)च्या प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट ऑफ साउथ एशियन स्टडीज (आएसएस)मध्ये अरुणाचल प्रदेश मुद्द्यावर व्याख्यान दिल्यानंतर एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘हा काही नवीन मुद्दा नाही. म्हणजे चीनने दावा केला आहे, त्याने आपला दावा वाढवला आहे. दावा सुरुवातीस हास्यास्पद होता आणि आजही हास्यास्पद आहे,’ परराष्ट्रमंत्री जयशंकर, जे येथे तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत, बोलताना त्यांनी अरुणाचल प्रदेश हा भारताचा नैसर्गिक भाग आहे यावर भर दिला.

नेताजी बोस व आझाद हिंद सेनेला अभिवादन करत सिंगापूर दौऱ्याची सुरुवात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी सिंगापूर येथील युद्ध स्मारकावर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना आदरांजली अर्पण करून त्यांच्या तीन दिवसीय सिंगापूर दौऱ्याची सुरुवात केली. एक्सवर पोस्टमध्ये जयशंकर म्हणाले की, ‘नेताजी आणि आझाद हिंद सेनेच्या शूर सैनिकांना आदरांजली अर्पण करून दौऱ्याची सुरुवात केली. त्यांची प्रखर देशभक्ती येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.’ 

‘द्विपक्षीय संबंध वाढवण्याची संधी’ जयशंकर भेटीदरम्यान सिंगापूरच्या पंतप्रधान ली सिएन लुंग यांच्यासह प्रमुख नेत्यांची भेट घेतील. सिंगापूरच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की, ‘जयशंकर यांची भेट सिंगापूर आणि भारत यांच्यातील घनिष्ठ मैत्रीला अधोरेखित करते. दोन्ही बाजूंना प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारविनिमय करण्याची, तसेच द्विपक्षीय सहकार्यातील चांगल्या प्रगतीवर चर्चा सुरू ठेवण्याची या भेटीमुळे एक चांगली संधी आहे.’

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकर