शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आमच्या सीमेत भारतानेच घुसखोरी केली, हे आता स्पष्ट; व्ही. के. सिंह यांच्या विधानानंतर चीनचा दावा 

By देवेश फडके | Updated: February 9, 2021 11:53 IST

केंद्रीय परिवहन राज्यमंत्री आणि माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंह यांच्या एका वक्तव्यानंतर आता चीनने भारतावर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देएलएसीवरून चीनची भारतावर टीकाव्ही. के. सिंह यांच्या विधानाचा आधार घेत भारतावर साधला निशाणाभारतानेच सीमा कराराचे उल्लंघन केल्याचा दावा

बीजिंग : केंद्रीय परिवहन राज्यमंत्री आणि माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंह यांच्या एका वक्तव्यानंतर आता चीनने भारतावर निशाणा साधला आहे. चीनच्या तुलनेत भारताने अधिकवेळा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले, असे विधान व्ही. के. सिंह यांनी रविवारी केले होते. याच वक्तव्यावरून आता चीनने भारतावर टीका केली आहे. (china reacts on v k singh lac remark)

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी व्ही. के. सिंह यांच्या वक्तव्यवावर प्रतिक्रिया दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भारताने अनावधानाने का होईना, आपली चूक कबूल केली आहे. भारताकडून दीर्घकालावधीपासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले जात आहे. हे एक प्रकारे चीनच्या सीमेत अतिक्रमण केल्यासारखे आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण होते. भारताची वागणूक हीच या प्रश्नाचे मूळ आहे. भारताने सीमेसंदर्भातील कराराचे कसोशिने पालन करावे, असे आवाहन चीनकडून करण्यात आले आहे. 

सीरमने पुरवलेल्या कोरोना डोसचे लसीकरण दक्षिण आफ्रिकेने थांबवले; 'हे' दिले कारण

भारताने अधिकृतरित्या दिलेल्या माहितीपेक्षा व्ही. के. सिंह यांचे वक्तव्य एकदम वेगळे आहे. गतवर्षी लडाख येथील गलवान खोऱ्याजवळ भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झडप झाली होती. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीनने याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका मांडली नाही. तेव्हा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी भारताने कधीही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले नाही, असे म्हटले होते. 

पूर्वी चिनी सैन्य भारतीय हद्दीत घुसून छावण्या बांधत होते आणि चर्चेनंतर त्या काही प्रमाणात मागे घेत होते. मात्र, वर्तमान सरकारने यावर ठोस निर्णय घेत यापुढे चीन असे करणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. चीन आता दबावात आहे. आता काही चूक झाल्यास भारत जशास तसे उत्तर द्यायला समर्थ आहे, हे चीनला समजले आहे, असा दावा व्ही. के. सिंह यांनी रविवारी केला. 

ग्लोबल टाइम्सच्या संपादकांनी ट्विट करत, भारत सरकारमधील मंत्री व्ही. के. सिंह जे पूर्वी भारतीय सैन्याचे प्रमुख होते, त्यांनी चुकून भारत-चीन सीमेवरील सत्य सर्वांसमोर मांडले आहे. भारताकडूनच सीमा बदलण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याची उत्तरे चीनला द्यायला लागतात, असा दावा केला आहे. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावXi Jinpingशी जिनपिंगVK Singhव्ही के सिंगborder disputeसीमा वाद