शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

आमच्या सीमेत भारतानेच घुसखोरी केली, हे आता स्पष्ट; व्ही. के. सिंह यांच्या विधानानंतर चीनचा दावा 

By देवेश फडके | Updated: February 9, 2021 11:53 IST

केंद्रीय परिवहन राज्यमंत्री आणि माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंह यांच्या एका वक्तव्यानंतर आता चीनने भारतावर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देएलएसीवरून चीनची भारतावर टीकाव्ही. के. सिंह यांच्या विधानाचा आधार घेत भारतावर साधला निशाणाभारतानेच सीमा कराराचे उल्लंघन केल्याचा दावा

बीजिंग : केंद्रीय परिवहन राज्यमंत्री आणि माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंह यांच्या एका वक्तव्यानंतर आता चीनने भारतावर निशाणा साधला आहे. चीनच्या तुलनेत भारताने अधिकवेळा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले, असे विधान व्ही. के. सिंह यांनी रविवारी केले होते. याच वक्तव्यावरून आता चीनने भारतावर टीका केली आहे. (china reacts on v k singh lac remark)

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी व्ही. के. सिंह यांच्या वक्तव्यवावर प्रतिक्रिया दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भारताने अनावधानाने का होईना, आपली चूक कबूल केली आहे. भारताकडून दीर्घकालावधीपासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले जात आहे. हे एक प्रकारे चीनच्या सीमेत अतिक्रमण केल्यासारखे आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण होते. भारताची वागणूक हीच या प्रश्नाचे मूळ आहे. भारताने सीमेसंदर्भातील कराराचे कसोशिने पालन करावे, असे आवाहन चीनकडून करण्यात आले आहे. 

सीरमने पुरवलेल्या कोरोना डोसचे लसीकरण दक्षिण आफ्रिकेने थांबवले; 'हे' दिले कारण

भारताने अधिकृतरित्या दिलेल्या माहितीपेक्षा व्ही. के. सिंह यांचे वक्तव्य एकदम वेगळे आहे. गतवर्षी लडाख येथील गलवान खोऱ्याजवळ भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झडप झाली होती. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीनने याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका मांडली नाही. तेव्हा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी भारताने कधीही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले नाही, असे म्हटले होते. 

पूर्वी चिनी सैन्य भारतीय हद्दीत घुसून छावण्या बांधत होते आणि चर्चेनंतर त्या काही प्रमाणात मागे घेत होते. मात्र, वर्तमान सरकारने यावर ठोस निर्णय घेत यापुढे चीन असे करणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. चीन आता दबावात आहे. आता काही चूक झाल्यास भारत जशास तसे उत्तर द्यायला समर्थ आहे, हे चीनला समजले आहे, असा दावा व्ही. के. सिंह यांनी रविवारी केला. 

ग्लोबल टाइम्सच्या संपादकांनी ट्विट करत, भारत सरकारमधील मंत्री व्ही. के. सिंह जे पूर्वी भारतीय सैन्याचे प्रमुख होते, त्यांनी चुकून भारत-चीन सीमेवरील सत्य सर्वांसमोर मांडले आहे. भारताकडूनच सीमा बदलण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याची उत्तरे चीनला द्यायला लागतात, असा दावा केला आहे. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावXi Jinpingशी जिनपिंगVK Singhव्ही के सिंगborder disputeसीमा वाद