शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

चंद्रयान-३ चे यश चीनला बघवेना, लँडिंग साइटबाबतचा भारताचा दावा खोटा असल्याचे म्हटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 12:36 IST

चीनने भारताच्या चंद्रयान ३ मोहिमेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

भारताच्या चंद्रयान ३ मोहिमेला मोठं यश मिळाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे, यामुळे भारताच्या इस्त्रोचे जगभरात कौतुक होत आहे. पण, भारताच्या या यशावर चीनने प्रश्न उपस्थित केले आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ चंद्रयान-३ लँडिंगचा भारताचा दावा खोटा असल्याचे चीनच्या मून मिशनचे संस्थापक म्हणाले.

मोहिमेचे मुख्य शास्त्रज्ञ ओयांग जियुआन म्हणाले की, चंद्रयान-३ भारताच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरले आहे असे भारताचे म्हणणे चुकीचे आहे.

मणिपूर पुन्हा पेटलं! जमावाने भाजप कार्यालयाला लावली आग, दोन विद्यार्थ्यांच्या हत्येचा निषेध सुरुच

२३ ऑगस्ट रोजी चंद्रयान-३ च्या लँडिंगनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही इस्त्रोचे कौतुक केले होते. पीएम मोदी म्हणाले होते की, 'आमच्या शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रम आणि प्रतिभेने भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचले आहे, जिथे जगातील कोणताही देश आजपर्यंत पोहोचू शकला नाही. 

इस्त्रोने लँडिंगनंतर चंद्रयान ३ मोहिमे संदर्भात माहिती दिली होती.  यात त्यांनी चंद्र मोहीम चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीरित्या उतरली आहे. या दाव्यावर आता चीनच्या अंतराळ संस्थेने प्रश्न उपस्थित केले आहेत. चीनने म्हटले आहे की, भारताची चंद्र मोहीम दक्षिण ध्रुव प्रदेशात नाही तर चंद्राच्या दक्षिण गोलार्धात उतरली होती. "चंद्रयान-३ ची लँडिंग साइट चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नव्हती, किंवा ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशात किंवा आर्क्टिक ध्रुवीय प्रदेशाजवळ उतरले नव्हते, असा दावा त्यांनी केला आहे. 

भारताचे रोव्हर अंदाजे ६९ अंश दक्षिण अक्षांशावर उतरले. ते ८८.५ आणि ९० अंशांच्या अक्षांशांच्या दरम्यान असलेल्या दक्षिण ध्रुव प्रदेशात नाही तर चंद्राच्या दक्षिण गोलार्धात उतरले. पृथ्वी ज्या अक्षावर सूर्याभोवती फिरते तो २३.५ अंशांनी झुकलेला असतो, त्यामुळे दक्षिण ध्रुव ६६.५ ते ९० अंश दक्षिणेला मानला जातो. पण औयांगने असा युक्तिवाद केला की, चंद्राचा कल फक्त १.५ अंश असल्याने, त्याचा ध्रुवीय प्रदेश खूपच लहान आहे (८८.५ आणि ९० अंशांच्या अक्षांशांमधील). युरोपियन स्पेस एजन्सीने म्हटले आहे 

हाँगकाँग युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ ली मॅन-होई यांनी सांगितले की, भारताचे चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिणेकडील अक्षांशापर्यंत पोहोचले आहे आणि यापूर्वी चंद्रावर उतरलेल्या सर्व लँडर्सना मागे टाकले आहे. याला 'उच्च अक्षांश ठिकाण' म्हणता येईल. चीनच्या २०१९ च्या चंद्र मोहिमेबाबत ली म्हणाले, 'तुलना केली तर चीनचे चांगई ४ हे मिशन दक्षिण ध्रुव एटकेन बेसिन नावाच्या चंद्राच्या दुर्गम भागात उतरले होते. नावावरून तुम्हाला वाटेल की चीनचे मिशन दक्षिण ध्रुवाजवळ उतरले आहे, पण तसे नाही. चिनी मून मिशन ४५.४४ अंश दक्षिण अक्षांशावर उतरले होते.

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3isroइस्रोchinaचीन