शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

चंद्रयान-३ चे यश चीनला बघवेना, लँडिंग साइटबाबतचा भारताचा दावा खोटा असल्याचे म्हटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 12:36 IST

चीनने भारताच्या चंद्रयान ३ मोहिमेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

भारताच्या चंद्रयान ३ मोहिमेला मोठं यश मिळाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे, यामुळे भारताच्या इस्त्रोचे जगभरात कौतुक होत आहे. पण, भारताच्या या यशावर चीनने प्रश्न उपस्थित केले आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ चंद्रयान-३ लँडिंगचा भारताचा दावा खोटा असल्याचे चीनच्या मून मिशनचे संस्थापक म्हणाले.

मोहिमेचे मुख्य शास्त्रज्ञ ओयांग जियुआन म्हणाले की, चंद्रयान-३ भारताच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरले आहे असे भारताचे म्हणणे चुकीचे आहे.

मणिपूर पुन्हा पेटलं! जमावाने भाजप कार्यालयाला लावली आग, दोन विद्यार्थ्यांच्या हत्येचा निषेध सुरुच

२३ ऑगस्ट रोजी चंद्रयान-३ च्या लँडिंगनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही इस्त्रोचे कौतुक केले होते. पीएम मोदी म्हणाले होते की, 'आमच्या शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रम आणि प्रतिभेने भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचले आहे, जिथे जगातील कोणताही देश आजपर्यंत पोहोचू शकला नाही. 

इस्त्रोने लँडिंगनंतर चंद्रयान ३ मोहिमे संदर्भात माहिती दिली होती.  यात त्यांनी चंद्र मोहीम चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीरित्या उतरली आहे. या दाव्यावर आता चीनच्या अंतराळ संस्थेने प्रश्न उपस्थित केले आहेत. चीनने म्हटले आहे की, भारताची चंद्र मोहीम दक्षिण ध्रुव प्रदेशात नाही तर चंद्राच्या दक्षिण गोलार्धात उतरली होती. "चंद्रयान-३ ची लँडिंग साइट चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नव्हती, किंवा ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशात किंवा आर्क्टिक ध्रुवीय प्रदेशाजवळ उतरले नव्हते, असा दावा त्यांनी केला आहे. 

भारताचे रोव्हर अंदाजे ६९ अंश दक्षिण अक्षांशावर उतरले. ते ८८.५ आणि ९० अंशांच्या अक्षांशांच्या दरम्यान असलेल्या दक्षिण ध्रुव प्रदेशात नाही तर चंद्राच्या दक्षिण गोलार्धात उतरले. पृथ्वी ज्या अक्षावर सूर्याभोवती फिरते तो २३.५ अंशांनी झुकलेला असतो, त्यामुळे दक्षिण ध्रुव ६६.५ ते ९० अंश दक्षिणेला मानला जातो. पण औयांगने असा युक्तिवाद केला की, चंद्राचा कल फक्त १.५ अंश असल्याने, त्याचा ध्रुवीय प्रदेश खूपच लहान आहे (८८.५ आणि ९० अंशांच्या अक्षांशांमधील). युरोपियन स्पेस एजन्सीने म्हटले आहे 

हाँगकाँग युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ ली मॅन-होई यांनी सांगितले की, भारताचे चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिणेकडील अक्षांशापर्यंत पोहोचले आहे आणि यापूर्वी चंद्रावर उतरलेल्या सर्व लँडर्सना मागे टाकले आहे. याला 'उच्च अक्षांश ठिकाण' म्हणता येईल. चीनच्या २०१९ च्या चंद्र मोहिमेबाबत ली म्हणाले, 'तुलना केली तर चीनचे चांगई ४ हे मिशन दक्षिण ध्रुव एटकेन बेसिन नावाच्या चंद्राच्या दुर्गम भागात उतरले होते. नावावरून तुम्हाला वाटेल की चीनचे मिशन दक्षिण ध्रुवाजवळ उतरले आहे, पण तसे नाही. चिनी मून मिशन ४५.४४ अंश दक्षिण अक्षांशावर उतरले होते.

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3isroइस्रोchinaचीन