शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

इजिप्तमध्ये कार बॉम्बच्या आत्मघातकी स्फोटात 10 जण ठार

By admin | Updated: July 7, 2017 16:54 IST

इजिप्तच्या उत्तरेकडचा सिनाई प्रांत आज बॉम्बस्फोटानं हादरला आहे.

ऑनलाइन लोकमतकाहिरा, दि. 7 - इजिप्तच्या उत्तरेकडचा सिनाई प्रांत आज बॉम्बस्फोटानं हादरला आहे. सिनाई प्रांतातील सेनेच्या एका चेकपोस्टवर झालेल्या आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात कर्नलसह 10 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रफाह आणि शेख जुवैद यादरम्यान असलेल्या एका चेकपोस्टवर दोन कारमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला आहे. या कार बॉम्बस्फोटात 10 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मात्र अद्यापही कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. उत्तर सिनाई हा दहशतवादी संघटन असलेल्या इसिसचा बालेकिल्ला समजला जातो. 2013पासून आतापर्यंत या भागात पोलीस आणि सेनेचे हजारो सैनिक मारले गेले आहेत. मात्र या आत्मघातकी बॉम्बस्फोटानं इजिप्त पुन्हा एकदा हादरलं आहे.

गेल्या दिवसांपूर्वी मध्य इजिप्तमध्ये आठ ते दहा बंदुकधाऱ्यांनी चालू बसवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 26 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर यामध्ये 25 जण गंभीर जखमी झाले होते. कॉप्टिक ईसाइ (ख्रिस्ती) ला घेऊन जाणाऱ्या एका बसवर गोळीबार झाला होता. यामध्ये मृत झालेल्यात लहान मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर आले होते. ईसाइ (ख्रिस्ती) समाजावर झालेला हा या दोन महिन्यांतील दुसरा मोठा हल्ला होता.

काहिरावरुन 250 किमी दक्षिण भागात अंबा शमुवेल मोनेस्ट्रीकडे जात असताना बंधुकधाऱ्यांनी हा हल्ला केल्याचे गृह मंत्रालयाने सांगितले होते. मंत्रालयाने सांगितलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. अद्याप या हल्याची जबाबदारी कोणही घेतलेली नाही. सुरक्षा दलांनी याचा तपास सुरू केला आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, जवानांच्या पोशाखात असलेल्या आठ ते दहा जणांनी चालू बसवर गोळीबार केला होता. यावेळी तिथे मृत्यूचे तांडव उभे राहिले होते. सगळीकडे कर्कश आवाज येत होता. इजिप्तमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इसिसने घेतली होती. टंटामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 46 जणांचा मृत्यू झाला होता.
(इजिप्तमध्ये दोन स्फोटांत ४५ जण ठार)
गेल्या काही दिवसांपूर्वी इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाने (इसिस) इजिप्तमधील तानता आणि अलेक्झांड्रिया शहरात चर्चेसमध्ये रविवारची प्रार्थना सुरू असताना केलेल्या दोन बॉम्बस्फोटांत 45 जण ठार तर 140 जण जखमी झालेत. देशातील अल्पसंख्य ख्रिश्चनांवर गेल्या काही वर्षांत झालेला हा भीषण हल्ला आहे.