शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

डबाबंद अन्नाची चटक अकाली मृत्यूस कारण; पदार्थांतील रसायनांमुळे कॅन्सर आणि डायबेटिसचे प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 10:29 IST

अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबत गेली ३४ वर्षे अभ्यास केला आहे.

वॉशिंग्टन : रोजचीच धावपळ, बदललेली जीवनशैली यामुळे लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी पुरत्या बदलून गेल्या आहेत. पॅक फूड, बाटलीबंद शीतपेये तसेच प्रोसेस्ड फूड यांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु असे खाद्यपदार्थ खाणे म्हणजे अकाली मृत्यूला कवटाळण्यासारखे आहे, असे अभ्यासातून पुढे आले आहे. यामुळे लवकर मृत्यू होण्याचा धोका ९ टक्के वाढतो.

अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबत गेली ३४ वर्षे अभ्यास केला आहे. या काळात त्यांनी तब्बल १,१४,००० वरिष्ठ नागरिकांचे खाणेपिणे आणि आरोग्यस्थितीचा अभ्यास केला. हा अहवाल बीएमजे जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. यात सहभागींपैकी १ लाख जणांनी डबाबंद पदार्थांचे सेवन केले होते, असे अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

या पदार्थांचे सेवन केल्याने कॅन्सर, मानसिक आरोग्यासंबंधीचे विकार, टाईप टू डायबेटीज आदीसोंबत अकाली मृत्यू धोका उद्भवतो, असे म्हटले आहे. नागरिकांना हे पदार्थ खाणे टाळून फळे, भाज्या, कडधान्ये आदींचे सेवन मोठ्या प्रमाणात करावे असा सल्ला अभ्यासकांनी दिला आहे. या अभ्यासात ४८,१९३ मृत्यूमागच्या नेमक्या कारणांचे विश्लेषण केले आहे. 

सोडियम ठरते घातक

दीर्घकाळ टिकण्यासाठी प्रोसेस्ड फूडमध्ये मोठ्या प्रमाणात रसायने मिसळावी लागतात. ही रसायने मृत्यूसाठी कारणीभूत ठरतात. या पदार्थांमध्ये वापरले जाणारे सोडियम तसेच साखर यांचा आरोग्यावर विपरित परणाम होत असतो. 

 

टॅग्स :Americaअमेरिका