शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

डबाबंद अन्नाची चटक अकाली मृत्यूस कारण; पदार्थांतील रसायनांमुळे कॅन्सर आणि डायबेटिसचे प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 10:29 IST

अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबत गेली ३४ वर्षे अभ्यास केला आहे.

वॉशिंग्टन : रोजचीच धावपळ, बदललेली जीवनशैली यामुळे लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी पुरत्या बदलून गेल्या आहेत. पॅक फूड, बाटलीबंद शीतपेये तसेच प्रोसेस्ड फूड यांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु असे खाद्यपदार्थ खाणे म्हणजे अकाली मृत्यूला कवटाळण्यासारखे आहे, असे अभ्यासातून पुढे आले आहे. यामुळे लवकर मृत्यू होण्याचा धोका ९ टक्के वाढतो.

अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबत गेली ३४ वर्षे अभ्यास केला आहे. या काळात त्यांनी तब्बल १,१४,००० वरिष्ठ नागरिकांचे खाणेपिणे आणि आरोग्यस्थितीचा अभ्यास केला. हा अहवाल बीएमजे जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. यात सहभागींपैकी १ लाख जणांनी डबाबंद पदार्थांचे सेवन केले होते, असे अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

या पदार्थांचे सेवन केल्याने कॅन्सर, मानसिक आरोग्यासंबंधीचे विकार, टाईप टू डायबेटीज आदीसोंबत अकाली मृत्यू धोका उद्भवतो, असे म्हटले आहे. नागरिकांना हे पदार्थ खाणे टाळून फळे, भाज्या, कडधान्ये आदींचे सेवन मोठ्या प्रमाणात करावे असा सल्ला अभ्यासकांनी दिला आहे. या अभ्यासात ४८,१९३ मृत्यूमागच्या नेमक्या कारणांचे विश्लेषण केले आहे. 

सोडियम ठरते घातक

दीर्घकाळ टिकण्यासाठी प्रोसेस्ड फूडमध्ये मोठ्या प्रमाणात रसायने मिसळावी लागतात. ही रसायने मृत्यूसाठी कारणीभूत ठरतात. या पदार्थांमध्ये वापरले जाणारे सोडियम तसेच साखर यांचा आरोग्यावर विपरित परणाम होत असतो. 

 

टॅग्स :Americaअमेरिका