शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

बांगलादेशी भारतात घुसतायत, रोहिंग्या बांगलादेशात; ड्रोन हल्ल्यात २०० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 09:18 IST

म्यानमार सोडून बांगलादेशात पळून जात असलेल्या रोहिंग्यांच्या गटावर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आहे.

भारताचे शेजारी एकामागोमाग एक बेजार होत चालले आहेत. पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार या देशांमध्ये अराजकतेची स्थिती आहे. अशातच बांगलादेशात पंतप्रधानांना देश सोडून पळावे लागले आहे. बांगलादेशात हिंसाचार असल्याने हजारो बांगलादेशी भारतात घुसण्याच्या प्रयत्नात आहेत. अनेकजण घुसलेले आहेत. तर त्या बांगलादेशात म्यानमारचेरोहिंग्या घुसत आहेत. 

म्यानमार सोडून बांगलादेशात पळून जात असलेल्या रोहिंग्यांच्या गटावर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्य महिला, लहान मुले आणि अनेक कुटुंबेच्या कुटुंबे असल्याचे सांगितले जात आहे. रॉयटर्सने याचे वृत्त दिले आहे. या ठिकाणी मृतदेहांचे ढिगारे असल्याचे व आपल्या नातेवाईकाला लोक शोधत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

गेल्या आठवड्यात सोमवारी हा ड्रोन हल्ला झाला आहे. बांगलादेशच्या सीमेवर घुसण्याच्या प्रयत्नात असताना हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यासाठी मिलिशिया आणि म्यानमार लष्कराने एकमेकांवर आरोप केले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये चिखलाच्या जमिनीवर मृतदेहांचे ढीग विखुरलेले दिसत आहेत. या हल्ल्यातून वाचलेल्या लोकांनी २०० चा आकडा सांगितला आहे. 

रोहिंग्यांचा इतिहास...मुळचे बांगलादेशीचरोहिंग्या मुस्लिम आणि म्यानमारचा बहुसंख्य बौद्ध समुदाय यांच्यातील वाद १९४८ मध्ये म्यानमारला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुरू आहे. अराकान या राज्यात १६ व्या शतकापासून मुस्लिम राहतात. या भागावर ब्रिटिशांची सत्ता होती. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी बांगलादेशातून अराकानमध्ये मजूर आणण्यास सुरुवात केली. यामुळे अराकानमधील मुस्लिम वस्ती वाढू लागली. या लोकांना रोहिंग्या म्हणून ओळखले जाऊ लागले. रोहिंग्यांची वाढती संख्या पाहून म्यानमारच्या जनरलने 1982 मध्ये बर्माचा राष्ट्रीय कायदा लागू केला. यानुसार त्यांचे नागरिकत्व रद्द करण्यात आले. तेव्हापासून रोहिंग्या मुस्लिम ना बांगलादेशचे ना म्यानमारचे राहिले, ते अनेक देशांत स्थलांतरीत होत आहेत.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशMyanmarम्यानमारRohingyaरोहिंग्या