शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

बांगलादेश आपले राष्ट्रगीत बदलणार? कट्टरतावादी म्हणाले- भारताने आमच्यावर लादले; युनूस सरकारने उत्तर दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 13:41 IST

बांगलादेशच्या राष्ट्रगीतावरुन आता देशात गदारोळ सुरू झाला आहे. जमात-ए-इस्लामीचे माजी अमीर गुलाम आझम यांचा मुलगा अब्दुल्लाही अमान आझमी यांनी बांगलादेशचे राष्ट्रगीत आणि संविधानात बदल करण्याची मागणी केली आहे.

बांगलादेशमध्ये काही दिवसापासून नोकरीतील आरक्षणावरुन निदर्शने सुरू आहेत, या आंदोलनामुळे शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. यामुळे देशात सत्तांत्तर झाले.हिंसाचाराची आग शांत झाल्यानंतर आता आणखी एक नवीन मुद्दा तापला आहे. आता देशाच्या राष्ट्रगीतावरुन नवा वाद सुरू झाला आहे. 

आता बांगलादेशात 'आमार सोनार बांगला' या राष्ट्रगीतावरून गदारोळ सुरू आहे. जमात-ए-इस्लामीचे माजी अमीर गुलाम आझम यांचे पुत्र अब्दुल्लाहिल अमान आझमी यांनी बांगलादेशचे राष्ट्रगीत आणि संविधानात बदल करण्याची मागणी केली आहे.

"भारत थांबवू शकतो रशिया-युक्रेन युद्ध", इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे मोठे वक्तव्य

जनरल अमन आझमी म्हणाले, “मी राष्ट्रगीताचा मुद्दा या सरकारवर सोडतो. आपले सध्याचे राष्ट्रगीत हे आपल्या स्वतंत्र बांगलादेशच्या अस्तित्वाच्या विरुद्ध आहे. हे बंगालच्या फाळणीची आणि दोन बंगालच्या विलीनीकरणाची वेळ दर्शवते. दोन बंगालांना एकत्र करण्यासाठी तयार केलेले राष्ट्रगीत स्वतंत्र बांगलादेशचे राष्ट्रगीत कसे असू शकते?', असा सवालही केला आहे. 

आझमी पुढे म्हणाले की, हे राष्ट्रगीत भारताने १९७१ मध्ये आपल्यावर लादले होते. अशी अनेक गाणी आहेत जी राष्ट्रगीत म्हणून काम करू शकतात. नवीन राष्ट्रगीत निवडण्यासाठी सरकारने नवीन आयोग स्थापन करावा. बांगलादेशचे राष्ट्रगीत प्रसिद्ध बंगाली संगीतकार रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले होते.

बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील धार्मिक बाबींचे सल्लागार अबुल फैज मुहम्मद खालिद हुसेन यांनी शनिवारी सांगितले की, देशाचे राष्ट्रगीत बदलण्याची कोणतीही योजना नाही. पद्मा नदीच्या उत्तरेकडील राजशाही येथील इस्लामिक फाऊंडेशनला भेट दिल्यानंतर स्थानिक प्रसारमाध्यमांनी हुसैन यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, अंतरिम सरकार वाद निर्माण करण्यासाठी काहीही करणार नाही, आम्हाला सर्वांच्या सहकार्याने एक सुंदर बांगलादेश तयार करायचा आहे.

बांगलादेशातील हिंदू समुदायाला लक्ष्य करणारे हल्ले अजूनही सुरू असल्याची माहिती समोर आली. यावर बोलताना हुसैन म्हणाले,अशा घटनांमध्ये दोषी आढळलेल्यांना मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारकडून शिक्षा केली जाईल. प्रार्थनास्थळांवर हल्ले करणारे हे मानवतेचे शत्रू आहेत. ते गुन्हेगार आहेत आणि सध्याच्या कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश