शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
3
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
4
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
5
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
6
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
7
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
8
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
9
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
10
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
11
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
12
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
13
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
14
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
15
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
16
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
17
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
18
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
19
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
20
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!

फेसबुकवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी आगीत तेल ओतलं; बांगलादेशमधील हिंसाचार प्रकरणी आरोपींची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 17:26 IST

बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाविरोधात झालेला हिंसाचार (Bangladesh Violence) आणि सोशल मीडियात धार्मिक द्वेष निर्माण केल्याच्या आरोपाप्रकरणी एका मुख्य संशयित व त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली होती.

बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाविरोधात झालेला हिंसाचार (Bangladesh Violence) आणि सोशल मीडियात धार्मिक द्वेष निर्माण केल्याच्या आरोपाप्रकरणी एका मुख्य संशयित व त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली होती. या दोघांनीही आता त्यांच्यावरील आरोपांची कबुली दिली आहे. आपण केलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे १७ ऑक्टोबर रोजी दुर्गा पुजेवेळी पीरगंज जिल्ह्यातील रंगपूर येथे हिंसा भडकली होती, असा कबुलीनामा आरोपी शैकत मंडल यानं कोर्टासमोर दिला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली आहे. शैकत मंडल याचा साथीदार रबीउल इस्लाम (३६) एक मौलवी आहे आणि त्याच्याविरोधात हिंसा भडकवणं आणि लूटमार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

"शैकल मंडल आणि त्याचा साथीदार रबीउल इस्लाम यांनी रंगपूरच्या कोर्टात हिंसाचार उफळण्यामागची त्यांची भूमिका मान्य केली आहे", असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. बीडीन्यूज २४ डॉट कॉमनं  शीघ्र कृती दलाच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार दोन्ही आरोपींनी फेसबुकवरील आपले फॉलोअर्स वाढविण्याच्या हेतूनं आपत्तीजनक माहिती फेसबुकवर पोस्ट केली होती अशी कबुली दिली आहे.   

६८३ जणांना आतापर्यंत अटकएका लाउडस्पीकरवर घोषणा करुन गावातील मुस्लिमांची माथी भडकवण्याच्या कामात इस्लाम यानं मंडल याची मदत केली. पीरगंजमध्ये एका अफवेमुळेच हिंसा भडकली असा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी अहवालात केला आहे. एका हिंदू व्यक्तीनं धार्मिक तेढ निर्माण करणारा आपत्तीजनक मजकूर फेसबुकवर अपलोड केला होता. १७ ऑक्टोबर रोजी यावरुनच मोठा हिंसाचार झाला आणि ७० हिंदूंची घरं पेटविण्यात आली. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार याप्रकरणी आतापर्यंत ७ जणांनी आपला गुन्हा कबुल केला आहे. हिंसाचारासंबंधी एकूण २४ हजार जणांवर आरोप करण्यात आला आहे. तर आतापर्यंत ६८३ जणांना अटक करण्यात आली आहे. हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत ७० हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. 

बांगलादेशातील कोमिल्ला येथील दुर्गापूजेच्या पेंडालवर झालेल्या हल्ल्यानंतर, रविवारी रंगपूरच्या पीरगंजमध्ये हिंदूंची घरे जाळल्याच्या घटना समोर आल्या होत्या. काही कट्टर धर्मांधांनी हिंदूंची 20 घरे जाळली आहेत. मात्र, स्थानिक संघ परिषदेच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, या धर्मांधांनी तब्बल 65 घरांना आग लावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरणही सोशल मीडिया पोस्टशी संबंधित आहे आणि एका हिंदू युवकाच्या फेसबूकवरील आक्षेपार्ह पोस्टनंतर हा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संबंधित युवकाला सुरक्षा देत त्याचे घर तर वाचवले. पण धर्मांध हल्लेखोरांनी त्याच लोकेशनच्या जवळपासची घरे जाळली. याप्रकरणी ढाका ट्रिब्यूनचे अध्यक्ष मोहम्मद सादकुल इस्लाम यांच्यानुसार, हल्लेखोर जमात-ए-इस्लामी आणि विद्यार्थी संघटना इस्लामिक विद्यार्थी शिबिराच्या स्थानिक युनिटशी संबंधित होते.

टॅग्स :BangladeshबांगलादेशHinduहिंदू