शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बांगलादेश पुन्हा पेटले; १०० ठार, एकाच पोलीस ठाण्याच्या १३ पोलिसांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 07:48 IST

Bangladesh Riots, Protest : पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून पेटला वाद; इंटरनेट बंद

ढाका: पंतप्रधान शेख हसीना राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या निदर्शनानंतर बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आला.. आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात १४ पोलिसांसह १०० पेक्षा जास्त आंदोलकांचा मृत्यू झाला असून ४०पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. हिंसाचारावर नियंत्रणासाठी सरकारने संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू केली असून, ३ दिवस सुट्टी जाहीर केली आहे. आंदोलकांनी पोलीस ठाण्यावर हल्ला केला, त्याच १३ पोलिसांचा मृत्यू झाला.

शेख हसीना जानेवारी २०२४मध्ये पंतप्रधानपदी निवडून आल्या. मात्र, या निवडणुकीवर विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलीस्ट पार्टीने (बीएनपी) बहिष्कार टाकला होता. रविवारी बीएनपीच्या कार्यकर्त्यांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने केली. त्यांचा अवामी लीग, विद्यार्थी लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा विरोध केला. त्यातून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष पेटला. आंदोलकांनी प्रमुख रस्ते रोखल्यानंतर राजधानी ढाक्यासह इतर शहरांमध्येही संघर्ष पेटला.

लष्कर मागे घ्या : माजी लष्करी अधिकाऱ्यांची मागणीहिंसाचार रोखण्यासाठी शेख हसीना यांनी लष्कराला पाचारण केले आहे. मात्र, त्यांना रस्त्यांवरून मागे घ्या आणि बराकीमध्ये परत पाठवा, अशी मागणी माजी लष्करी अधिकाऱ्याऱ्यांनी केली आहे.

अशा प्रकारची निदर्शने रोखण्यासाठी लष्कराची शक्त्ती वाया घालवू नका, असे या अधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे. बांगलादेशच्या लष्कराने कधीही आपल्याच नागरिकांवर बंदु‌का रोखल्या नाहीत आणि त्यांना असे प्रशिक्षणही दिलेले नाही, असे माजी लष्करप्रमुख इकबाल भुयान म्हणाले.

यापूर्वी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भडकला होता हिंसाचारकाही दिवसांपूर्वी बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठी हिंसा भडकली होती. त्यात २०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. शेकडो भारतीय विद्यार्थी तेथून भारतात परतले होते. सरकारने विविध श्रेणीतील ५६ टक्के आरक्षण रद्द केले होते. हा निर्णय तेथील सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केला होता.

पुन्हा उफाळून आलेल्या हिंसाचारानंतर बांगलादेशातील भारतीय नागरिकांना उच्चायुक्त कार्यालयाशी संपर्कात राहण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी उच्चायुक्त कार्यालयाने एक संपर्क क्रमांक जारी केला आहे.

विद्यापीठात जाळपोळबंगबंधू शेख मुजीब वैद्यकीय विद्यापीठात काही अज्ञात लोकांनी अनेक वाहनांची जाळपोळ केली. रुग्णवाहिका तसेच इतर वाहनांची तोडफोडदेखील करण्यात आली. १३ जिल्ह्यांमध्ये हिंसाचार झाला आहे. सरकारने फेसबुक, व्हॉट्सअॅप. मेसेंजर यासह सर्व सोशल मीडियावर तत्काळ बंदी घातली आहे.

ते दहशतवादी : पीएममोबाइल सेवादेखील सरकारने खंडित केली आहे. शेख हसीना यांनी हिंसाचारानंतर सुरक्षेसंदर्भात बैठक बोलाविली. त्यात तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख, पोलीस तसेच इतर वरिष्ठ सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. आंदोलन करणारे विद्यार्थी नसून दहशतवादी आहेत, असे हसीना म्हणाल्या.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश