शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

बांगलादेश सरकार चिन्मय दास यांना सोडू इच्छित नाही, वकिलांनी केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 10:50 IST

बांगलादेशमध्ये अटक करण्यात आलेल्या चिन्मय दास यांच्या वकिलाने दावा केला आहे की, सरकार आणि प्रशासनाची इच्छा आहे की ते वर्षानुवर्षे तुरुंगातच रहावे. यासाठी षडयंत्र रचले जात आहे.

बांगलादेशात चिन्मय दास यांना तुरुंगात डांबण्याचा कट रचला जात आहे. चिन्मय दास यांची तुरुंगातून लवकर सुटका होऊ नये, अशी पोलिस प्रशासनापासून ते सरकारपर्यंत सर्वांची इच्छा आहे, असा दावा त्यांचे वकील रवींद्र घोष यांनी केला आहे. त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

कोलकाता येथील इस्कॉन मंदिराबाहेर पत्रकारांसबोत बोलताना घोष म्हणाले की, मी बांगलादेशात परत येईन आणि तेथील अत्याचार सहन करणाऱ्या लोकांसाठी लढेन.

'बाबांच्या निधनानंतर CWCने शोकसभादेखील बोलावली नाही', प्रणव मुखर्जींच्या मुलीनं व्यक्त केली नाराजी

घोष हे बांगलादेशातील सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष आहेत. त्यांनी दावा केला की त्यांनी चितगाव सत्र न्यायालयात हजर राहून जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना तसे करण्याची परवानगी नव्हती. आता या प्रकरणाची सुनावणी २ जानेवारीला होणार आहे. माझी प्रकृती ठीक राहिल्यास मी सर्वोच्च न्यायालयात हजर राहीन, असे ते म्हणाले. मी हे करू शकत नसल्यास, मी एका चांगल्या वकिलाची व्यवस्था करीन. मी त्यांची लढाई लढत राहीन.

घोष सध्या पश्चिम बंगालच्या बराकपूरमध्ये राहतात. ते उपचारासाठी भारतात आले आहेत. ते म्हणाले की, चिन्मय दास यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत. कोलकाता येथे त्यांनी इस्कॉन मंदिराला भेट दिली आणि इस्कॉन कोलकाता अध्यक्ष राधारमण दास यांची भेट घेतली. बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार हटवल्यापासून अल्पसंख्याक निशाण्यावर आहेत. चिन्मय दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. अनेक प्रयत्न करूनही जामीन मिळाला नाही.

चिन्मय दास यांच्या अटकेनंतर त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध करण्यात आला. बांगलादेशात त्यांच्या बाजूने उपस्थित असलेल्या वकिलांनाही अनेकदा मारहाण करण्यात आली आहे. त्यांना तुरुंगात डांबण्यासाठीच हे सर्व केले जात असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. घोष म्हणाले, मी वकील असून माझा राजकारणाशी संबंध नाही. कायद्यापुढे सर्व समान असले पाहिजेत. बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाल्यापासून अल्पसंख्याकांवर ६६५० हल्ले झाले आहेत.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश