शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

बांगलादेश सरकार चिन्मय दास यांना सोडू इच्छित नाही, वकिलांनी केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 10:50 IST

बांगलादेशमध्ये अटक करण्यात आलेल्या चिन्मय दास यांच्या वकिलाने दावा केला आहे की, सरकार आणि प्रशासनाची इच्छा आहे की ते वर्षानुवर्षे तुरुंगातच रहावे. यासाठी षडयंत्र रचले जात आहे.

बांगलादेशात चिन्मय दास यांना तुरुंगात डांबण्याचा कट रचला जात आहे. चिन्मय दास यांची तुरुंगातून लवकर सुटका होऊ नये, अशी पोलिस प्रशासनापासून ते सरकारपर्यंत सर्वांची इच्छा आहे, असा दावा त्यांचे वकील रवींद्र घोष यांनी केला आहे. त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

कोलकाता येथील इस्कॉन मंदिराबाहेर पत्रकारांसबोत बोलताना घोष म्हणाले की, मी बांगलादेशात परत येईन आणि तेथील अत्याचार सहन करणाऱ्या लोकांसाठी लढेन.

'बाबांच्या निधनानंतर CWCने शोकसभादेखील बोलावली नाही', प्रणव मुखर्जींच्या मुलीनं व्यक्त केली नाराजी

घोष हे बांगलादेशातील सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष आहेत. त्यांनी दावा केला की त्यांनी चितगाव सत्र न्यायालयात हजर राहून जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना तसे करण्याची परवानगी नव्हती. आता या प्रकरणाची सुनावणी २ जानेवारीला होणार आहे. माझी प्रकृती ठीक राहिल्यास मी सर्वोच्च न्यायालयात हजर राहीन, असे ते म्हणाले. मी हे करू शकत नसल्यास, मी एका चांगल्या वकिलाची व्यवस्था करीन. मी त्यांची लढाई लढत राहीन.

घोष सध्या पश्चिम बंगालच्या बराकपूरमध्ये राहतात. ते उपचारासाठी भारतात आले आहेत. ते म्हणाले की, चिन्मय दास यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत. कोलकाता येथे त्यांनी इस्कॉन मंदिराला भेट दिली आणि इस्कॉन कोलकाता अध्यक्ष राधारमण दास यांची भेट घेतली. बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार हटवल्यापासून अल्पसंख्याक निशाण्यावर आहेत. चिन्मय दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. अनेक प्रयत्न करूनही जामीन मिळाला नाही.

चिन्मय दास यांच्या अटकेनंतर त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध करण्यात आला. बांगलादेशात त्यांच्या बाजूने उपस्थित असलेल्या वकिलांनाही अनेकदा मारहाण करण्यात आली आहे. त्यांना तुरुंगात डांबण्यासाठीच हे सर्व केले जात असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. घोष म्हणाले, मी वकील असून माझा राजकारणाशी संबंध नाही. कायद्यापुढे सर्व समान असले पाहिजेत. बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाल्यापासून अल्पसंख्याकांवर ६६५० हल्ले झाले आहेत.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश