शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार, सचिवालयाला घेराव, दोन गटात हाणामारी, ५० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 10:03 IST

अन्सार ग्रुपच्या सदस्यांनी सचिवालयात ताब्यात घेतलेल्यांमध्ये विद्यार्थी नेता आणि बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे सल्लागार नाहीद इस्लाम याचाही समावेश आहे.

बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. राजधानी ढाका येथील सचिवालयाजवळ काल रात्री अन्सार ग्रुपचे (होमगार्ड) सदस्य आणि विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीच्या घटनेत ५० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, कायमस्वरूपी नोकरीच्या मागणीसाठी अन्सार ग्रुपचे सदस्य गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत होते.

ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, ही घटना रविवारी रात्री घडली. त्यावेळी हजारो विद्यार्थ्यांनी हातात लाठ्या घेऊन सचिवालयाकडे मोर्चा वळवला. अन्सार ग्रुपच्या सदस्यांनी सचिवालय ताब्यात घेतले होते. त्यांनी सचिवालयाचे गेट बंद केले होते. सचिवालयात उपस्थित असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना बाहेर पडू दिले नाही. यादरम्यान, अनेक विद्यार्थीही सचिवालयात अडकले होते. या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना सचिवालयात येण्याचे आवाहन केले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अँटी डिस्क्रिमिनेशन स्टुडेंट मूव्हमेंटच्या अनेक समन्वयकांनी विद्यार्थ्यांना राजू स्कल्पचर येथे जमण्यास सांगितलं होतं, तेथून या विद्यार्थ्यांनी सचिवालयाकडे मोर्चा वळवला. सुरुवातीला अन्सार ग्रुपचे सदस्य मागे हटू लागले होते. मात्र नंतर त्यांनी विद्यार्थ्यांचा काठ्यांनी पाठलाग सुरू केला. दरम्यान, एकमेकांवर जोरदार दगडफेक झाल्याने दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही बाजूचे लोक जखमी झाले आहेत.

अन्सार ग्रुपच्या सदस्यांनी सचिवालयात ताब्यात घेतलेल्यांमध्ये विद्यार्थी नेता आणि बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे सल्लागार नाहीद इस्लाम याचाही समावेश आहे. यामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते. अन्सार ग्रुपच्या आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, अन्सार ग्रुप गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन करत आहे. त्यांच्या नोकऱ्या कायम कराव्यात, अशी या गटाची मागणी आहे. याचबरोबर, अन्सार ग्रुप बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

बांगलादेशात अंतरिम सरकार सध्या बांगलादेशात अंतरिम सरकार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आरक्षणाच्या मुद्यावरुन बांगलादेशात असंतोष पसरला होता. शेख हसीना यांच्या सरकारविरोधात जनतेनं उठाव केला होता. यानंतर परिस्थिती इतकी चिघळली की, शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. सध्या त्या भारतात वास्तव्यास आहेत. या घटनेनंतर आता बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. असं असलं तरी येथील परिस्थिती अद्याप नियंत्रणाबाहेर आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीय