शहरं
Join us  
Trending Stories
1
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सारख्या सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
2
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
3
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
4
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
5
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
6
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल
7
आधी भारताविरोधात गरळ ओकली; आता PM मोदींच्या स्वागतासाठी मंत्रिमंडळासह मुइझ्झू हजर
8
Mumbai: भाडेकरूने घरमालकालाच कार खाली चिरडण्याचा केला प्रयत्न, मुंबईतील घटना
9
'तो' अखेरचा व्हिडिओ कॉल, त्यानंतर मृत्यूची बातमी आली; महिला इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू
10
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
11
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
12
अनिल अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स विकण्यासाठी रांगा; सर्वांनाच लागलं लोअर सर्किट, गुंतवणूकदारांत भीती
13
"मी आज पुण्याचा खासदार असतो, काँग्रेसचं तिकिट मला फायनल झालं होते, पण..."; वसंत मोरेंचा दावा
14
पहिला श्रावण शुक्रवार: वसुमान योगात 'या' राशींवर होणार लक्ष्मीकृपेची बरसात!
15
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
16
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण
17
मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले?
18
Raju Shetti :'५०० एकराची कागदपत्रे त्यांनी द्यावीत, २५ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा'; राजू शेट्टींचे एकनाथ शिंदेंच्या आमदाराला ओपन चॅलेंज
19
'सैयारा' चित्रपट पाहिला अन् एका गर्लफ्रेंडसाठी दोन तरुण भिडले; तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
20
ऑगस्टमध्ये बँका 'इतके' दिवस बंद राहणार! महत्त्वाचे काम असेल तर लगेच करा, अन्यथा अडचण होईल!

बांगलादेशातील ५०० कैदी कारागृहातून पळाले; दहशतवाद्यांचाही समावेश, भारतीय लष्कर अलर्ट मोडवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 15:42 IST

Bangladesh Protests : शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतरही सध्या हिंसाचारानं बांगलादेश धुमसत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Bangladesh Protests : बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी काल(दि.६) आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि देशातून पलायन केले. त्यामुळं आता बांग्लादेशात अंतरिम सरकार स्थापन झालं आहे. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतरही सध्या हिंसाचारानं बांगलादेश धुमसत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या बांगलादेशातील घडामोडींकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागलं आहे. 

बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळं हिंसाचार शिगेला पोहोचला आहे. शेख हसीना यांनी सोमवारी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर सत्ता लष्कराच्या हाती गेली. मात्र, आंदोलकांनी देशाची सत्ता लष्कराकडे देण्यास विरोध दर्शवला आहे. दरम्यान, हिंसक जमावानं कारागृह देखील सोडलं नाही. कारागृहात घुसूनही जमावानं जाळपोळ केली. यावेळी अनेक कैदी पळून गेले. या कैद्यांमध्ये अनेक दहशतवाद्यांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत भारतीय लष्करही अलर्ट मोडवर आहे.

बांगलादेशच्या माध्यमांमधून समोर आलेल्या बातम्यांनुसार, देशात सत्तापालट झाल्यानंतर परिस्थिती आणि व्यवस्था कोलमडली आहे. दरम्यान, देशातील तुरुंगही रिकामी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बांगलादेशात रविवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून कर्फ्यू लागू करण्यात आला होता. मात्र, सोमवारी हिंसक आंदोलकांनी कर्फ्यु झुगारुन शेख हसीना यांच्या घराला घेराव घातला. एवढंच नाही तर, कर्फ्यू दरम्यानच शेरपूर कारागृहात हल्लेखोर लाठ्या घेऊन घुसले आणि जवळपास ५०० कैद्यांना कारागृहातून बाहेर काढलं. 

आंदोलकांकडून जाळपोळ आंदोलकांनी शेरपूरच्या कारागृहातच नव्हे तर दमदमा कालीगंज परिसरातही घुसून आग लावली. शेरपूरचे उपायुक्त अब्दुल्ला अल खैरुन यांनी सांगितलं की, सायंकाळी पाचच्या सुमारास हल्लेखोरांनी कारागृहावर हल्ला केला. सोमवारी संतप्त जमावानं फक्त कारागृहातच नव्हे तर पोलीस ठाण्यांनाही लक्ष्य केलं. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सदर पोलीस ठाण्याला हल्लेखोरांनी आग लावली. याशिवाय, जिल्हा परिषद, जिल्हा निवडणूक कार्यालय, सोनाली बँक तसेच अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली.

शेख हसीना भारतात शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर देश सोडून पलायन केलं. त्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतल्याची माहिती मिळत आहे. भारतात काही दिवस आश्रय घेतल्यानंतर शेख हसीना इंग्लंडला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. बांगलादेशात सुरू असलेला गोंधळ हा केवळ विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुरता मर्यादित नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. तसंच, या आंदोलनादरम्यान देशाच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचीही सुटका करण्यात आली आहे. त्यांच्या पक्षाशी संबंधित लोक बांगलादेशात गोंधळ घालत असल्याचं म्हटलं जात आहे.   

टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीयPrisonतुरुंगjailतुरुंग