शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बलुच बंडखोरांनी जाफर एक्सप्रेसमधील प्रत्येक प्रवाशांचे आयकार्ड तपासले, अन् नंतर हल्ला केला; नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 12:16 IST

बलुच बंडखोरांनी काल जाफर एक्सप्रेस ट्रेनला ओलीस ठेवले. पाकिस्तान प्रशासनाला त्यांची सुटका करण्यास अजूनही यश आलेले नाही.

पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात मंगळवारी बलुचिस्तान फुटीरवाद्यांनी जाफर एक्सप्रेस ट्रेनला ओलीस ठेवले. जवळपास २४ तास उलटून गेले आहेत, पण आतापर्यंत पाकिस्तानी सुरक्षा दलांना ट्रेन मुक्त करण्यात अपयश आले आहे. दरम्यान, बलुच बंडखोरांनी ट्रेनमध्ये अनेक नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना ठार मारले आहे. हा हल्ला बंडखोरांनी रॉकेट लाँचर, बंदुका आणि बॉम्ब वापरून केला. 

शेख हसीना यांचे घरही हिसकावून घेतले, बांगलादेशात मोठी कारवाई; बहिणीपासून मुलापर्यंत, सर्वांची मालमत्ता जप्त

हल्लेखोरांनी आधी ट्रेन चालकावर हल्ला केला आणि त्याला खाली फेकल्यानंतर त्यांनी ट्रेनचा ताबा घेतला. या घटनेत आतापर्यंत डझनभराहून अधिक पाकिस्तानी सुरक्षा कर्मचारी ठार झाल्याचे वृत्त आहे. बंडखोरांनी पंजाबी वंशाच्या लोकांना लक्ष्य केले असल्याची माहिती समोर आली आहे. 

बलुच बंडखोरांच्या कैदेतून सुटलेल्या लोकांनी घटनाक्रम सांगितला आहे. सुटका झाल्यानंतर जवळच्या रेल्वे स्थानकावर अनेक किलोमीटर चालत गेलेल्या अल्लाहदित्ता या व्यक्तीने सांगितले की, बंडखोरांनी ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांचे ओळखपत्र तपासले. 'आम्ही डोंगरांमधून बराच अंतर कापून येथे पोहोचलो आहोत. मी सकाळपासून उपवास करत आहे आणि अजून तो सोडू शकलो नाही. याचे कारण म्हणजे मला जेवण्याची संधी मिळाली नाही. दुसऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, बंडखोर पंजाबी वंशाच्या लोकांना लक्ष्य करत होते. बंडखोरांनी ओळखपत्रे तपासली. त्यांना जाणून घ्यायचे होते की कोण बलुचिस्तानचे आहे आणि कोण बाहेरचे आहे. ते पंजाबी वंशाच्या लोकांना शोधत होता.

दुसऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, जवळच्या स्टेशनवर पोहोचण्यासाठी त्याला ४ तास चालावे लागले. ते आले आणि ओळखपत्र तपासले.' याशिवाय, सर्व्हिस कार्ड देखील तपासण्यात आले. माझ्या समोरच दोन सैनिकांना गोळ्या घालण्यात आल्या आणि उर्वरित चार जणांना घेऊन गेले. त्या लोकांना कुठे नेण्यात आले हे मला माहित नाही. ओळखपत्र तपासल्यानंतर त्यांना आढळले की ती व्यक्ती पंजाबी आहे आणि त्यांनी त्याला सोबत नेले. 

बलुच बंडखोर पंजाबी वंशाच्या लोकांवर नाराज आहेत. ते बऱ्याच काळापासून पंजाबी लोकांची हत्या करत आहेत. गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासून, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, यात बलुच बंडखोरांनी पंजाबी लोकांची लक्ष्य हत्या केली आहे. महामार्गांवर बस थांबवून अनेक वेळा पंजाबी लोकांवर हल्ले केले आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान