शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

बलुच बंडखोरांनी जाफर एक्सप्रेसमधील प्रत्येक प्रवाशांचे आयकार्ड तपासले, अन् नंतर हल्ला केला; नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 12:16 IST

बलुच बंडखोरांनी काल जाफर एक्सप्रेस ट्रेनला ओलीस ठेवले. पाकिस्तान प्रशासनाला त्यांची सुटका करण्यास अजूनही यश आलेले नाही.

पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात मंगळवारी बलुचिस्तान फुटीरवाद्यांनी जाफर एक्सप्रेस ट्रेनला ओलीस ठेवले. जवळपास २४ तास उलटून गेले आहेत, पण आतापर्यंत पाकिस्तानी सुरक्षा दलांना ट्रेन मुक्त करण्यात अपयश आले आहे. दरम्यान, बलुच बंडखोरांनी ट्रेनमध्ये अनेक नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना ठार मारले आहे. हा हल्ला बंडखोरांनी रॉकेट लाँचर, बंदुका आणि बॉम्ब वापरून केला. 

शेख हसीना यांचे घरही हिसकावून घेतले, बांगलादेशात मोठी कारवाई; बहिणीपासून मुलापर्यंत, सर्वांची मालमत्ता जप्त

हल्लेखोरांनी आधी ट्रेन चालकावर हल्ला केला आणि त्याला खाली फेकल्यानंतर त्यांनी ट्रेनचा ताबा घेतला. या घटनेत आतापर्यंत डझनभराहून अधिक पाकिस्तानी सुरक्षा कर्मचारी ठार झाल्याचे वृत्त आहे. बंडखोरांनी पंजाबी वंशाच्या लोकांना लक्ष्य केले असल्याची माहिती समोर आली आहे. 

बलुच बंडखोरांच्या कैदेतून सुटलेल्या लोकांनी घटनाक्रम सांगितला आहे. सुटका झाल्यानंतर जवळच्या रेल्वे स्थानकावर अनेक किलोमीटर चालत गेलेल्या अल्लाहदित्ता या व्यक्तीने सांगितले की, बंडखोरांनी ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांचे ओळखपत्र तपासले. 'आम्ही डोंगरांमधून बराच अंतर कापून येथे पोहोचलो आहोत. मी सकाळपासून उपवास करत आहे आणि अजून तो सोडू शकलो नाही. याचे कारण म्हणजे मला जेवण्याची संधी मिळाली नाही. दुसऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, बंडखोर पंजाबी वंशाच्या लोकांना लक्ष्य करत होते. बंडखोरांनी ओळखपत्रे तपासली. त्यांना जाणून घ्यायचे होते की कोण बलुचिस्तानचे आहे आणि कोण बाहेरचे आहे. ते पंजाबी वंशाच्या लोकांना शोधत होता.

दुसऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, जवळच्या स्टेशनवर पोहोचण्यासाठी त्याला ४ तास चालावे लागले. ते आले आणि ओळखपत्र तपासले.' याशिवाय, सर्व्हिस कार्ड देखील तपासण्यात आले. माझ्या समोरच दोन सैनिकांना गोळ्या घालण्यात आल्या आणि उर्वरित चार जणांना घेऊन गेले. त्या लोकांना कुठे नेण्यात आले हे मला माहित नाही. ओळखपत्र तपासल्यानंतर त्यांना आढळले की ती व्यक्ती पंजाबी आहे आणि त्यांनी त्याला सोबत नेले. 

बलुच बंडखोर पंजाबी वंशाच्या लोकांवर नाराज आहेत. ते बऱ्याच काळापासून पंजाबी लोकांची हत्या करत आहेत. गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासून, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, यात बलुच बंडखोरांनी पंजाबी लोकांची लक्ष्य हत्या केली आहे. महामार्गांवर बस थांबवून अनेक वेळा पंजाबी लोकांवर हल्ले केले आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान