शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पाकिस्तानवर मोठा हल्ला! १०० हून अधिक जवान ठार; बलुचिस्तान आर्मी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 16:18 IST

सध्या पाकिस्तानी सैन्य आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी यांच्यात जबरदस्त युद्ध सुरु आहे

इस्लामाबाद – बलुचिस्तानमध्ये (Balochistan) बलोच लिबरेशन आर्मीच्या सैन्यानं पाकिस्तानी सैन्यावर आक्रमक हल्ला केला आहे. ज्यात १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. बलोच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात फ्रंटियर कोरचे आयजी मेजर जनरल अयमान बिलाल सफदर यांचाही जागेवर मृत्यू झाला आहे.

सध्या पाकिस्तानी(Pakistan) सैन्य आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी यांच्यात जबरदस्त युद्ध सुरु आहे. एकाचवेळी दोन ठिकाणांवर झालेल्या हल्ल्यानं पाकिस्तानी सैन्याला कुठलंच पाऊल उचलण्याचीही संधीही मिळाली नाही. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी सैन्य मारले गेले. पाकिस्तानातील या भागात सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं नोश्की आणि पंजुगुर याठिकाणी असा हल्ला केला की पाकिस्तानी सैन्याच्या तुकड्या उद्ध्वस्त झाल्या.

एकीकडे पाकिस्तानी सैनिकांच्या मृत्यूची बातमी येताच प्रशासकीय अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचे मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी दोन्ही ठिकाणांवरील हल्ल्याची पुष्टी करत बलुचिस्तान सैन्याच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत लिबरेशन आर्मीचे जवान मारले त्याबद्दल पाकिस्तानी सैन्याचं कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, नैसर्गिक साधन संपत्तीनं नटलेला बलुचिस्तानचा भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे.

बलुचिस्तानमधील लोकं गेल्या अनेक वर्षापासून स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. जगातील विविध व्यासपीठावर बलुचिस्तानचे प्रतिनिधी याबाबत सातत्याने आवाज उचलत आहेत. पाकिस्तानी सैन्य बलुचिस्तानच्या जनतेवर इतका अन्याय करत आहे त्याचा हिशोब लावणंही कठीण आहे. त्यामुळे बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा करावा अशी मागणी याठिकाणचे स्थानिक नेते वारंवार करत असतात.

बलुचिस्तान सैन्यानं सप्टेंबर २०२१ मध्येही असाच हल्ला केला

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटच्या सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर मोठा हल्ला केला होता. हा हल्ला रॉकेट आणि इतर घातक शस्त्रांनी करण्यात आला. ही घटना आवारन जिल्ह्यातील पिरंजर भागात घडली. हे ठिकाण बलुचिस्तान प्रांतात आहे. या घटनेत मोठ्या संख्येने पाक सैनिक मृत्युमुखी पडले होते. बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटने पाकिस्तानचा झेंडा लावलेल्या लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाल्याची अधिकृत माहिती मिळाली. पण, बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात कमीत-कमी ११ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान