शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

AstraZeneca Corona Vaccine: अ‍ॅस्ट्राझिनेकाच्या कोरोना लसीमुळे रक्तामध्ये गाठी? सहा देशांनी वापर थांबवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 12:34 IST

AstraZeneca Corona Vaccination in Europe: डेन्मार्क, इटली आणि नॉर्वेसह सहा देशांमधील काही नागरिकांच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी बनू लागल्याचे समोर आले आहे. यामुळे या देशांनी हा प्रकार गंभीरतेने घेतला असून या लसीच्या परिणामांवर चौकशी सुरु केली आहे.

कोपेनहेगन : कोरोना महामारीला रोखण्यासाठी अनेक देश ब्रिटनची मोठी कंपनी अ‍ॅस्ट्राझिनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचा आपत्कालीन वापर (AstraZeneca Corona Vaccination ) करत आहेत. मात्र, या कंपनीची लस वादात सापडण्याची शक्यता आहे. ही लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी (blood clots) तयार होत असल्याचे समोर येऊ लागल्याने युरोपच्याच सहा देशांनी या लसीचा वापर करणे थांबविले आहे. (Denmark, Norway, Iceland Suspend Use Of AstraZeneca Covid Vaccine)

डेन्मार्क, इटली आणि नॉर्वेसह सहा देशांमधील काही नागरिकांच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी बनू लागल्याचे समोर आले आहे. यामुळे या देशांनी हा प्रकार गंभीरतेने घेतला असून या लसीच्या परिणामांवर चौकशी सुरु केली आहे. युरोपियन मेडिसिन एजन्सीने सध्यातरी याबाबत कोणतेही संकेत सापडलेले नाहीत. अ‍ॅस्ट्राझिनेकाची लस घेतल्यानंतर अशा प्रकारची हालत होत असल्याचे स्पष्ट झालेले नाहीय, असे म्हटले आहे. 

डेन्मार्कच्या हेल्थ अथॉरिटीने सांगितले की,  हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीय. लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी तयार होत असल्याचा तपास सुरु आहे. याआधी ऑस्ट्रियामध्ये 49 वर्षांच्या नर्सचा कोरोना लस घेतल्यानंतर मृत्यू झाल्याने या देशाने अ‍ॅस्ट्राझिनेकाची लस वापरणे बंद केले आहे. या नर्सचा मृत्यू तिच्या रक्तात गाठी तयार झाल्याने झाला होता. 

17 हून अधिक देशांना पुरवठाचार आणखी युरोपिय देश एस्टोनिया, लातविया, लिथुआनिया व लक्जमबर्ग या देशांनीही कोरोना लसीकरण थांबविले आहे. 17 युरोपीय देशांपैकी 10 देशांना कोरोना लसीचा डोस पाठविण्यात आला आहे. डेन्मार्कच्या हेल्थ अथॉरिटीचे संचालक सोरेन ब्रोसट्रॉम यांनी सांगितले की, आम्ही अ‍ॅस्ट्राझिनेकाची लस वापरण्यास नकार दिला नसून तात्पुरत्या स्वरुपात वापर थांबविला आहे. आमच्याकडे लस घेतल्यानंतर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

धक्कादायक म्हणजे अ‍ॅस्ट्राझिनेकाची लस ही पुण्यातील सीरम इन्स्टीट्यूटदेखील बनविते. भारतातही लस घेतल्यानंतर जवळपास 40 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, भारत सरकारने या लोकांचा मृत्यू लसीमुळे झाला नसल्याचे म्हटले आहे. या मृत लोकांना आधीपासूनच दुर्धर आजार होते, असे स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या