शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

Bangladesh Crisis : बांगलादेशात आता जमावाचा लष्कराच्या ताफ्यावर हल्ला, १५ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 11:25 IST

Bangladesh Crisis : सरकार, जनता, अधिकारी, न्यायाधीश आणि आता लष्कर. बांगलादेशात कोणीही सुरक्षित नाही.

Bangladesh Crisis : ढाका : बांगलादेशात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्यावरुन बांग्लादेशात असंतोष पसरला होता. शेख हसीना यांच्या सरकारविरोधात जनतेनं उठाव केला होता. यानंतर परिस्थिती इतकी चिघळली की, शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. शेख हसीना सध्या भारतात आश्रयाला आल्या आहेत. 

सरकार, जनता, अधिकारी, न्यायाधीश आणि आता लष्कर. बांगलादेशात कोणीही सुरक्षित नाही. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला हिंसाचार आता नियंत्रणाबाहेर गेला आहे. दरम्यान, आता लष्कराच्या जवानांवरही हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. गोपालगंज भागात लष्कराच्या वाहनावर जमावानं हल्ला केला आहे. 

ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, या घटनेत लष्कराचे जवान, पत्रकार आणि स्थानिक लोकांसह १५ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांना गोळ्या लागल्या आहेत. माजी पंतप्रधान शेख हसीनाच्या परतीच्या मागणीसाठी अवामी लीगचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असताना शनिवारी संध्याकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली.

रिपोर्टनुसार, अवामी लीगचे हजारो नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक लोक माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या देशात परतण्याची मागणी करत होते. या मागणीसाठी आंदोलकांनी ढाका-खुलना महामार्ग रोखून धरला होता. दरम्यान, लष्कराचे वाहन तेथे पोहोचले आणि त्यांनी आंदोलकांना रस्ता खुला करून आंदोलन थांबवण्याचं आवाहन केलं. मात्र जमावानं त्यांच्यावर विटा फेकण्यास सुरुवात केली. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी लष्कराच्या जवानांनी लाठीमार केला.

प्रत्युत्तरात, आंदोलकांनी लष्कराच्या वाहनाची तोडफोड केली आणि गोपालगंज कॅम्पचे लेफ्टनंट कर्नल मकसूदुर रहमान यांनी या घटनेची पुष्टी केली. जवळपास ३००० ते ४००० लोक जमले होते आणि त्यांनी रस्ता अडवला होता, असं मकसूदुर रहमान यांनी सांगितलं. तर गोपीनाथपूर संघाचे माजी अध्यक्ष लच्छू शरीफ यांनी सांगितलं की, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराच्या जवानांनी गोळीबार केला. एका मुलासह दोन जणांना गोळ्या लागल्या. या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही.

दरम्यान, बांगलादेशातील अशांततेच्या पार्श्वभूमीवर, आसाम पोलीस भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्टवर आहेत, जेणेकरून कोणीही बेकायदेशीरपणे राज्यात प्रवेश करू नये. पोलीस महासंचालक जी.पी. सिंग म्हणाले की, बांगलादेशातून कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश दिला जाणार नाही, अशा सूचना केंद्राने दिल्या आहेत.

टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीय