शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

चीनकडे झुकलेल्या मालदीवचा आणखी एक झटका... भारतीय सैन्याला माघारी बोलवण्यास सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 09:52 IST

जुनमध्ये मालदीवसोबतचा करार संपुष्टात आला असून मालदीव सरकारने हा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : नेपाळने चीनशी जवळीक साधल्यानंतर आता मालदीवनेही चीनशी संधान साधत तेथील भारतीय सैनिक आणि हेलिकॉप्टर माघारी बोलावण्यास सांगितले आहे. जुनमध्ये मालदीवसोबतचा करार संपुष्टात आला असून मालदीव सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे पुढील काळात मालदीववरून भारत आणि चीनमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. 

  मालदीवमध्ये काही दशकांपासून भारताने आपले सैन्य ठेवलेले आहे. मालदीवमध्ये भारताचे खच्चीकरण करण्यासाठी चीन या देशात मोठ्या प्रमाणावर रस्ते, मोठमोठे पूल आणि विमानतळ बांधत आहे. काही दिवसांपूर्वीच मालदीवच्या यामीन सरकारने राजकीय विरोधकांविरोधात मोहिमा चालिवल्या होत्या. याला भारताने कडाडून विरोध केला होता. त्यावेळी विरोधकांनी भारताकडे सैन्याने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. 

 मालदीवमध्ये राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांचे सरकार आहे. मात्र, ते चीनचे समर्थक आहेत. या कारणांनी मालदीवमध्ये भारताविरोधात वातावरण निर्माण करण्यात आले. याचा परिणाम भारताकडून हिंदी महासागरातील छोट्या देशांना होत असलेल्या संरक्षण विषयक मोहिमांवर झाला आहे. भारत या देशांना आर्थिक क्षेत्र विकसित करून देणार आहे. तसेच आतापर्यंत सामुद्री चाचांपासून संरक्षण देत आला आहे. 

 मालदीवचे भारतातील राजदूत अहमद मोहम्मद यानी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, भारताने मालदीवला दिलेली दोन हेलिकॉप्टर आता वापरात नाहीत. या हेलिकॉप्टरच्या मदतीने जी कामे केली जात होती ती करण्यास मालदीव आता सक्षम झाला आहे. पहिल्यांदा या हेलिकॉप्टरचा वापर केला जात होता, मात्र अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी आम्ही स्वत:ची क्षमता विकसित केली आहे. 

  भारत विकसित करत असलेल्या आर्थिक क्षेत्राचे काम दोन्ही देशांकडून केले जात आहे. हे क्षेत्र भारतापासून 400 किमी आणि जगातील सर्वात व्यस्त जलवाहतूक मार्गापासून खूपच जवळ आहे. मालदीवमध्ये भारताचे हेलिकॉप्टर आणि 50 जवान तैनात आहेत. यामध्ये वैमानिक आणि देखभाल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांच्या व्हिसाची मुदत संपलेली आहे. तरीही भारताने त्यांना माघारी बोलावलेले नाही.

टॅग्स :MaldivesमालदीवIndian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दल