शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

चीनकडे झुकलेल्या मालदीवचा आणखी एक झटका... भारतीय सैन्याला माघारी बोलवण्यास सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 09:52 IST

जुनमध्ये मालदीवसोबतचा करार संपुष्टात आला असून मालदीव सरकारने हा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : नेपाळने चीनशी जवळीक साधल्यानंतर आता मालदीवनेही चीनशी संधान साधत तेथील भारतीय सैनिक आणि हेलिकॉप्टर माघारी बोलावण्यास सांगितले आहे. जुनमध्ये मालदीवसोबतचा करार संपुष्टात आला असून मालदीव सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे पुढील काळात मालदीववरून भारत आणि चीनमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. 

  मालदीवमध्ये काही दशकांपासून भारताने आपले सैन्य ठेवलेले आहे. मालदीवमध्ये भारताचे खच्चीकरण करण्यासाठी चीन या देशात मोठ्या प्रमाणावर रस्ते, मोठमोठे पूल आणि विमानतळ बांधत आहे. काही दिवसांपूर्वीच मालदीवच्या यामीन सरकारने राजकीय विरोधकांविरोधात मोहिमा चालिवल्या होत्या. याला भारताने कडाडून विरोध केला होता. त्यावेळी विरोधकांनी भारताकडे सैन्याने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. 

 मालदीवमध्ये राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांचे सरकार आहे. मात्र, ते चीनचे समर्थक आहेत. या कारणांनी मालदीवमध्ये भारताविरोधात वातावरण निर्माण करण्यात आले. याचा परिणाम भारताकडून हिंदी महासागरातील छोट्या देशांना होत असलेल्या संरक्षण विषयक मोहिमांवर झाला आहे. भारत या देशांना आर्थिक क्षेत्र विकसित करून देणार आहे. तसेच आतापर्यंत सामुद्री चाचांपासून संरक्षण देत आला आहे. 

 मालदीवचे भारतातील राजदूत अहमद मोहम्मद यानी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, भारताने मालदीवला दिलेली दोन हेलिकॉप्टर आता वापरात नाहीत. या हेलिकॉप्टरच्या मदतीने जी कामे केली जात होती ती करण्यास मालदीव आता सक्षम झाला आहे. पहिल्यांदा या हेलिकॉप्टरचा वापर केला जात होता, मात्र अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी आम्ही स्वत:ची क्षमता विकसित केली आहे. 

  भारत विकसित करत असलेल्या आर्थिक क्षेत्राचे काम दोन्ही देशांकडून केले जात आहे. हे क्षेत्र भारतापासून 400 किमी आणि जगातील सर्वात व्यस्त जलवाहतूक मार्गापासून खूपच जवळ आहे. मालदीवमध्ये भारताचे हेलिकॉप्टर आणि 50 जवान तैनात आहेत. यामध्ये वैमानिक आणि देखभाल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांच्या व्हिसाची मुदत संपलेली आहे. तरीही भारताने त्यांना माघारी बोलावलेले नाही.

टॅग्स :MaldivesमालदीवIndian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दल