शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चीनकडे झुकलेल्या मालदीवचा आणखी एक झटका... भारतीय सैन्याला माघारी बोलवण्यास सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 09:52 IST

जुनमध्ये मालदीवसोबतचा करार संपुष्टात आला असून मालदीव सरकारने हा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : नेपाळने चीनशी जवळीक साधल्यानंतर आता मालदीवनेही चीनशी संधान साधत तेथील भारतीय सैनिक आणि हेलिकॉप्टर माघारी बोलावण्यास सांगितले आहे. जुनमध्ये मालदीवसोबतचा करार संपुष्टात आला असून मालदीव सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे पुढील काळात मालदीववरून भारत आणि चीनमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. 

  मालदीवमध्ये काही दशकांपासून भारताने आपले सैन्य ठेवलेले आहे. मालदीवमध्ये भारताचे खच्चीकरण करण्यासाठी चीन या देशात मोठ्या प्रमाणावर रस्ते, मोठमोठे पूल आणि विमानतळ बांधत आहे. काही दिवसांपूर्वीच मालदीवच्या यामीन सरकारने राजकीय विरोधकांविरोधात मोहिमा चालिवल्या होत्या. याला भारताने कडाडून विरोध केला होता. त्यावेळी विरोधकांनी भारताकडे सैन्याने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. 

 मालदीवमध्ये राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांचे सरकार आहे. मात्र, ते चीनचे समर्थक आहेत. या कारणांनी मालदीवमध्ये भारताविरोधात वातावरण निर्माण करण्यात आले. याचा परिणाम भारताकडून हिंदी महासागरातील छोट्या देशांना होत असलेल्या संरक्षण विषयक मोहिमांवर झाला आहे. भारत या देशांना आर्थिक क्षेत्र विकसित करून देणार आहे. तसेच आतापर्यंत सामुद्री चाचांपासून संरक्षण देत आला आहे. 

 मालदीवचे भारतातील राजदूत अहमद मोहम्मद यानी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, भारताने मालदीवला दिलेली दोन हेलिकॉप्टर आता वापरात नाहीत. या हेलिकॉप्टरच्या मदतीने जी कामे केली जात होती ती करण्यास मालदीव आता सक्षम झाला आहे. पहिल्यांदा या हेलिकॉप्टरचा वापर केला जात होता, मात्र अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी आम्ही स्वत:ची क्षमता विकसित केली आहे. 

  भारत विकसित करत असलेल्या आर्थिक क्षेत्राचे काम दोन्ही देशांकडून केले जात आहे. हे क्षेत्र भारतापासून 400 किमी आणि जगातील सर्वात व्यस्त जलवाहतूक मार्गापासून खूपच जवळ आहे. मालदीवमध्ये भारताचे हेलिकॉप्टर आणि 50 जवान तैनात आहेत. यामध्ये वैमानिक आणि देखभाल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांच्या व्हिसाची मुदत संपलेली आहे. तरीही भारताने त्यांना माघारी बोलावलेले नाही.

टॅग्स :MaldivesमालदीवIndian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दल