शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

वय वर्षे ४०, पंधरा बाळांतपणं आणि ४४ मुलं !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 08:00 IST

जगातील एका अनोख्या घटनेनं मात्र सगळ्यांचेच डोळे आश्चर्यानं विस्फारले आहेत.

पूर्वीच्या काळी दाम्पत्याला अनेक मुलं असायची. अगदी आठ-आठ, दहा-दहा आणि डझनभर मुलं ! हल्लीच्या काळात एखाद्या दाम्पत्याला दोन-तीनपेक्षा जास्त मुलं असतील तर अनेकांचे डोळे आश्चर्यानं मोठे होतात. पूर्वी अनेक दाम्पत्यांना भरपूर मुलं असायची, कारण त्यावेळचा सामाजिक ट्रेंडच तसा होता, एवढंच नव्हे, तर अनेकदा मुलं लहानपणीच दगावण्याचं प्रमाणही खूप मोठं होतं. आरोग्याच्या सोयी-सुविधा पुरेशा नव्हत्या आणि आपला वंश पुढे चालावा ही प्रत्येक सजीवाची तीव्र इच्छा असते, तशीच मानवाचीही होती. 

आज मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. अनेक दाम्पत्यांना एक किंवा फारतर दोन अपत्यं असतात. कारण जास्त मुलं असली तर मुलांच्या संगोपनाकडे पुरेसं लक्ष देता येत नाही, जास्त मुलांच्या पालनपोषणाचा खर्च परवडत नाही आणि पालकांनाही या साऱ्या धबडग्यात मुलांकडे आणि स्वत:कडेही लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, स्वत:ला, एकमेकांना स्पेस देता येत नाही. त्यामुळे एक किंवा दोन मुलांवरच आजकाल प्रत्येक घरातला पाळणा थांबतो..

जगातील एका अनोख्या घटनेनं मात्र सगळ्यांचेच डोळे आश्चर्यानं विस्फारले आहेत. - एखाद्या महिलेनं किती मुलांना जन्म द्यावा? पूर्व आफ्रिकेतील युगांडा या देशातील मरिअम नाबातान्झी या ४० वर्षीय महिलेनं २८ वर्षांत तब्बल ४४ मुलांना जन्म दिला आहे ! तुम्ही म्हणाल, कसं शक्य आहे हे? - हो, पण ही खरी गोष्ट आहे आणि याच कारणावरून मरिअम सध्या संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय झाली आहे. 

मरिअमची कहाणीही तशी दर्दभरी आहे. अत्यंत गरीब घरात ती जन्माला आली आणि लग्नानंतरही तिच्या परिस्थितीत काहीच फरक पडला नाही. उलट अनंत हालअपेष्टांना तिला सामोरं जावं लागलं. तिचा नवराही अतिशय गरीब होता आणि तुटपुंज्या आमदनीवर त्यांना भागवावं लागत होतं. 

वयाच्या बाराव्या वर्षीच मरिअमचं लग्न झालं आणि वयाच्या तेराव्या वर्षी तिला पहिलं बाळही झालं. डॉक्टरांनी त्याचवेळी तिला सांगितलं होतं, अनेक मुलं होण्याची क्षमता आणि शक्ती तुझ्यात आहे. सर्वसाधारण महिलेपेक्षा बऱ्याच जास्त मुलांना तू जन्म देऊ शकतेस; पण तुला स्वत:लाच जास्त मुलं नको असली तरी तुला मुलांना जन्म देत राहावंच लागणार आहे. मुलांना जन्म देणं तू थांबवलंस तर त्यामुळे तुझ्या जीवाला धोका आहे! त्यामुळे तुला कदाचित तुझे प्राणही गमवावे लागतील!

मरिअमनं आजवर इतक्या मुलांना जन्म दिला; पण बाळंतपणात तिला कोणत्याही विशेष उपचारांची गरज भासली नाही आणि कुठल्या मेडिकल कॉम्प्लिकेशन्सही निर्माण झाल्या नाहीत. प्रत्येक बाळाच्या जन्मानंतर ती अगदी ठणठणीत होती.  मरिअमची केस जगावेगळी असली, स्वत:चा जीव वाचवायचा तर मुलांना जन्म देत राहाणं तिला आवश्यकच होतं, तरीही पाळणा थांबवण्याचं आधुनिक तंत्रज्ञान आजच्या काळात उपलब्ध आहेच, पण ज्या ठिकाणी ती राहाते, त्या दुर्गम, आदिवासी भागात हे तंत्रज्ञान आणि अशा प्रकारचे आधुनिक वैद्यकीय उपचार अजून पोहोचलेले नाहीत. समजा तशी सोय असती तरीही हा खर्च तिला झेपणारा नव्हता. त्यामुळे हा एवढा मोठा खर्च करण्यापेक्षा मुलांना जन्म देत राहाणं हेच तिच्या दृष्टीनं जास्त सोयीचं होतं. मरिअमच्या नशिबाचे फेरे इतके खडतर की, तिचा नवराही निकम्मा निघाला. इतकी मुलं असताना मरिअमला साथ देण्याऐवजी घरात असेल नसेल ते सारं, पैसाअडका घेऊन तोच घरातून फरार झाला.  

त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढी मुलं असूनही मरिअम अजूनही हिंमत हरलेली नाही. या सगळ्या मुलांचं ती हिंमतीनं स्वत: पालनपोषण करते आहे. त्यांना वाढवते आहे. त्यासाठी मिळेल ते काम करून, प्रसंगी चोवीस तास कष्ट करून मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी तिनं उचलली आहे. मरिअम म्हणते, ही माझी मुलं आहेत, मीच त्यांना जन्म दिला आहे, त्यामुळे त्यांना वाढवण्याची जबाबदारीही माझीच आहे. त्यापासून पळून जाण्यात किंवा मागे हटण्यात काहीच मतलब नाही. इतकी मुलं असल्यामुळे मरिअमला ‘ममा युगांडा’ या नावानंही ओळखलं जातं. ‘द मोस्ट फर्टाइल वूमन ऑन अर्थ’ म्हणूनही जगभरात ती प्रसिद्ध झाली आहे.

१५ बाळंतपणात ४४ मुलं! ‘ममा युगांडा’ मरिअमनं आतापर्यंत ४४ मुलांना जन्म दिला; पण त्यातील फक्त एकच प्रसंग असा आहे, ज्यावेळी तिनं एकावेळी एकाच मुलाला जन्म दिला. तिनं चार वेळा जुळ्यांना, पाच वेळा तिळ्यांना, तर पाच वेळा एकदम चार मुलांना जन्म दिला आहे. या ४४ मुलांतील सहा मुलं दगावली असल्यानं सध्या ३८ मुलांचा सांभाळ मरिअम करते आहे. त्यात १६ मुली  तर २२ मुलं आहेत.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय