शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

वय वर्षे ४०, पंधरा बाळांतपणं आणि ४४ मुलं !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 08:00 IST

जगातील एका अनोख्या घटनेनं मात्र सगळ्यांचेच डोळे आश्चर्यानं विस्फारले आहेत.

पूर्वीच्या काळी दाम्पत्याला अनेक मुलं असायची. अगदी आठ-आठ, दहा-दहा आणि डझनभर मुलं ! हल्लीच्या काळात एखाद्या दाम्पत्याला दोन-तीनपेक्षा जास्त मुलं असतील तर अनेकांचे डोळे आश्चर्यानं मोठे होतात. पूर्वी अनेक दाम्पत्यांना भरपूर मुलं असायची, कारण त्यावेळचा सामाजिक ट्रेंडच तसा होता, एवढंच नव्हे, तर अनेकदा मुलं लहानपणीच दगावण्याचं प्रमाणही खूप मोठं होतं. आरोग्याच्या सोयी-सुविधा पुरेशा नव्हत्या आणि आपला वंश पुढे चालावा ही प्रत्येक सजीवाची तीव्र इच्छा असते, तशीच मानवाचीही होती. 

आज मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. अनेक दाम्पत्यांना एक किंवा फारतर दोन अपत्यं असतात. कारण जास्त मुलं असली तर मुलांच्या संगोपनाकडे पुरेसं लक्ष देता येत नाही, जास्त मुलांच्या पालनपोषणाचा खर्च परवडत नाही आणि पालकांनाही या साऱ्या धबडग्यात मुलांकडे आणि स्वत:कडेही लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, स्वत:ला, एकमेकांना स्पेस देता येत नाही. त्यामुळे एक किंवा दोन मुलांवरच आजकाल प्रत्येक घरातला पाळणा थांबतो..

जगातील एका अनोख्या घटनेनं मात्र सगळ्यांचेच डोळे आश्चर्यानं विस्फारले आहेत. - एखाद्या महिलेनं किती मुलांना जन्म द्यावा? पूर्व आफ्रिकेतील युगांडा या देशातील मरिअम नाबातान्झी या ४० वर्षीय महिलेनं २८ वर्षांत तब्बल ४४ मुलांना जन्म दिला आहे ! तुम्ही म्हणाल, कसं शक्य आहे हे? - हो, पण ही खरी गोष्ट आहे आणि याच कारणावरून मरिअम सध्या संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय झाली आहे. 

मरिअमची कहाणीही तशी दर्दभरी आहे. अत्यंत गरीब घरात ती जन्माला आली आणि लग्नानंतरही तिच्या परिस्थितीत काहीच फरक पडला नाही. उलट अनंत हालअपेष्टांना तिला सामोरं जावं लागलं. तिचा नवराही अतिशय गरीब होता आणि तुटपुंज्या आमदनीवर त्यांना भागवावं लागत होतं. 

वयाच्या बाराव्या वर्षीच मरिअमचं लग्न झालं आणि वयाच्या तेराव्या वर्षी तिला पहिलं बाळही झालं. डॉक्टरांनी त्याचवेळी तिला सांगितलं होतं, अनेक मुलं होण्याची क्षमता आणि शक्ती तुझ्यात आहे. सर्वसाधारण महिलेपेक्षा बऱ्याच जास्त मुलांना तू जन्म देऊ शकतेस; पण तुला स्वत:लाच जास्त मुलं नको असली तरी तुला मुलांना जन्म देत राहावंच लागणार आहे. मुलांना जन्म देणं तू थांबवलंस तर त्यामुळे तुझ्या जीवाला धोका आहे! त्यामुळे तुला कदाचित तुझे प्राणही गमवावे लागतील!

मरिअमनं आजवर इतक्या मुलांना जन्म दिला; पण बाळंतपणात तिला कोणत्याही विशेष उपचारांची गरज भासली नाही आणि कुठल्या मेडिकल कॉम्प्लिकेशन्सही निर्माण झाल्या नाहीत. प्रत्येक बाळाच्या जन्मानंतर ती अगदी ठणठणीत होती.  मरिअमची केस जगावेगळी असली, स्वत:चा जीव वाचवायचा तर मुलांना जन्म देत राहाणं तिला आवश्यकच होतं, तरीही पाळणा थांबवण्याचं आधुनिक तंत्रज्ञान आजच्या काळात उपलब्ध आहेच, पण ज्या ठिकाणी ती राहाते, त्या दुर्गम, आदिवासी भागात हे तंत्रज्ञान आणि अशा प्रकारचे आधुनिक वैद्यकीय उपचार अजून पोहोचलेले नाहीत. समजा तशी सोय असती तरीही हा खर्च तिला झेपणारा नव्हता. त्यामुळे हा एवढा मोठा खर्च करण्यापेक्षा मुलांना जन्म देत राहाणं हेच तिच्या दृष्टीनं जास्त सोयीचं होतं. मरिअमच्या नशिबाचे फेरे इतके खडतर की, तिचा नवराही निकम्मा निघाला. इतकी मुलं असताना मरिअमला साथ देण्याऐवजी घरात असेल नसेल ते सारं, पैसाअडका घेऊन तोच घरातून फरार झाला.  

त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढी मुलं असूनही मरिअम अजूनही हिंमत हरलेली नाही. या सगळ्या मुलांचं ती हिंमतीनं स्वत: पालनपोषण करते आहे. त्यांना वाढवते आहे. त्यासाठी मिळेल ते काम करून, प्रसंगी चोवीस तास कष्ट करून मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी तिनं उचलली आहे. मरिअम म्हणते, ही माझी मुलं आहेत, मीच त्यांना जन्म दिला आहे, त्यामुळे त्यांना वाढवण्याची जबाबदारीही माझीच आहे. त्यापासून पळून जाण्यात किंवा मागे हटण्यात काहीच मतलब नाही. इतकी मुलं असल्यामुळे मरिअमला ‘ममा युगांडा’ या नावानंही ओळखलं जातं. ‘द मोस्ट फर्टाइल वूमन ऑन अर्थ’ म्हणूनही जगभरात ती प्रसिद्ध झाली आहे.

१५ बाळंतपणात ४४ मुलं! ‘ममा युगांडा’ मरिअमनं आतापर्यंत ४४ मुलांना जन्म दिला; पण त्यातील फक्त एकच प्रसंग असा आहे, ज्यावेळी तिनं एकावेळी एकाच मुलाला जन्म दिला. तिनं चार वेळा जुळ्यांना, पाच वेळा तिळ्यांना, तर पाच वेळा एकदम चार मुलांना जन्म दिला आहे. या ४४ मुलांतील सहा मुलं दगावली असल्यानं सध्या ३८ मुलांचा सांभाळ मरिअम करते आहे. त्यात १६ मुली  तर २२ मुलं आहेत.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय