शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:12 IST

Pakistan Missile Test Announcement, Pahalgam Terror Attack: जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची अधिसूचना केली जारी

Pakistan Missile Test Announcement, Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी काही दहशतवाद्यांनी हल्ला करून २६ भारतीय निष्पाप हिंदू नागरिकांची हत्या केली. पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून कठोर पावले उचलण्यात आली. सिंधू पाणी करार रद्द करण्यात आला. तसेच ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारतातून बाहेर होण्यास सांगण्यात आले. याशिवाय, भारतातील पाकिस्तानचे उच्च आयुक्तालयही बंद करण्यात आले. भारताने कडक कारवाई केल्यानंतर पाकिस्तान बिथरला असून त्यांनी दुसऱ्याच दिवशी क्षेपणास्त्र चाचणी करण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानने २४ किंवा २५ एप्रिल रोजी त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रात कराची किनाऱ्याजवळ जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची अधिसूचना जारी केली आहे.

पाकिस्तानच्या कुरापतींकडे भारताची बारीक नजर

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर कारवाई केल्यामुळे पाकिस्तानमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर कारवाई केली असल्याने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. अशा वेळी बिथरलेल्या पाकिस्तानने लगेच दुसऱ्याच दिवशी मिसाईल टेस्टची घोषणा केली आहे. पाकिस्तानच्या कुरापती अद्यापही कमी होत नसल्याने पाकिस्तानच्या या घोषणेनंतर भारतीय एजन्सी या चाचणीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच भारतीय सुरक्षा यंत्रणादेखील इतर सर्व घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहेत.

क्षेपणास्त्र चाचणी कधी होणार?

वृत्तसंस्था एएनआयने संरक्षण सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, पाकिस्तानने २४, २५ एप्रिल रोजी कराची किनाऱ्याजवळ त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रातून चाचणी घेण्याची माहिती दिली आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे असे हे मिसाइल आहे. हे क्षेपणास्त्र चाचणी करण्याची अधिसूचना पाकिस्तानने जारी केली आहे. त्यामुळे संबंधित भारतीय संस्था या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.

'बीटिंग द रिट्रीट' सेरेमनी रद्द

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे पुन्हा भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. हल्ला झाल्यानंतर भारतात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी बॅगा पॅक करून पाकिस्तानात जाण्यासाठी LOC वर गर्दी केली आहे. भारतीयांना बदला हवाय असा सूर देशभरातून उमटू लागला आहे. यादरम्यान, बीएसएफ केंद्राच्या एका आदेशाची वाट पाहत आहे. सूर्यास्तापूर्वी आदेश आला तर दररोज होणारा बीटिंग द रिट्रीट सेरेमनी बंद करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर