शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:12 IST

Pakistan Missile Test Announcement, Pahalgam Terror Attack: जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची अधिसूचना केली जारी

Pakistan Missile Test Announcement, Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी काही दहशतवाद्यांनी हल्ला करून २६ भारतीय निष्पाप हिंदू नागरिकांची हत्या केली. पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून कठोर पावले उचलण्यात आली. सिंधू पाणी करार रद्द करण्यात आला. तसेच ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारतातून बाहेर होण्यास सांगण्यात आले. याशिवाय, भारतातील पाकिस्तानचे उच्च आयुक्तालयही बंद करण्यात आले. भारताने कडक कारवाई केल्यानंतर पाकिस्तान बिथरला असून त्यांनी दुसऱ्याच दिवशी क्षेपणास्त्र चाचणी करण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानने २४ किंवा २५ एप्रिल रोजी त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रात कराची किनाऱ्याजवळ जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची अधिसूचना जारी केली आहे.

पाकिस्तानच्या कुरापतींकडे भारताची बारीक नजर

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर कारवाई केल्यामुळे पाकिस्तानमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर कारवाई केली असल्याने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. अशा वेळी बिथरलेल्या पाकिस्तानने लगेच दुसऱ्याच दिवशी मिसाईल टेस्टची घोषणा केली आहे. पाकिस्तानच्या कुरापती अद्यापही कमी होत नसल्याने पाकिस्तानच्या या घोषणेनंतर भारतीय एजन्सी या चाचणीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच भारतीय सुरक्षा यंत्रणादेखील इतर सर्व घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहेत.

क्षेपणास्त्र चाचणी कधी होणार?

वृत्तसंस्था एएनआयने संरक्षण सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, पाकिस्तानने २४, २५ एप्रिल रोजी कराची किनाऱ्याजवळ त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रातून चाचणी घेण्याची माहिती दिली आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे असे हे मिसाइल आहे. हे क्षेपणास्त्र चाचणी करण्याची अधिसूचना पाकिस्तानने जारी केली आहे. त्यामुळे संबंधित भारतीय संस्था या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.

'बीटिंग द रिट्रीट' सेरेमनी रद्द

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे पुन्हा भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. हल्ला झाल्यानंतर भारतात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी बॅगा पॅक करून पाकिस्तानात जाण्यासाठी LOC वर गर्दी केली आहे. भारतीयांना बदला हवाय असा सूर देशभरातून उमटू लागला आहे. यादरम्यान, बीएसएफ केंद्राच्या एका आदेशाची वाट पाहत आहे. सूर्यास्तापूर्वी आदेश आला तर दररोज होणारा बीटिंग द रिट्रीट सेरेमनी बंद करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर