शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

अभिनंदन यांना पकडल्यानंतर लष्करप्रमुख बाजवा बैठकीत भीतीने थरथर कापत होते; खासदाराची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 06:34 IST

Pakistan News : विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका झाली नसती तर भारत पाकिस्तानवर हवाई हल्ले करण्याच्या तयारीत होता, असा गौप्यस्फोट पाकिस्तान मुस्लीम लिग (नवाझ) पक्षाचे खासदार अयाझ सादिक यांनी केला  आहे.

इस्लामाबाद : भारतीय हवाई दलाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका झाली नसती तर भारत पाकिस्तानवर हवाई हल्ले करण्याच्या तयारीत होता, असा गौप्यस्फोट पाकिस्तान मुस्लीम लिग (नवाझ) पक्षाचे खासदार अयाझ सादिक यांनी केला  आहे. या माहितीला भारताचे माजी  हवाई दलप्रमुख बिरेंदरसिंग धनोआ यांनी दुजोरा दिला आहे. 

फॉरवर्ड ब्रिगेड होते हल्ल्याचे लक्ष्य : धनोआवर्धमान यांची पाकने मुक्तता केली नसती तर त्या देशाच्या फॉरवर्ड ब्रिगेडवर  हवाई हल्ले चढविण्याची योजना भारताने आखली होती, असे माजी हवाई दलप्रमुख बिरेंदरसिंग धनोआ यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी पार्लमेंटमध्ये यासंदर्भात देण्यात आलेली माहिती खरी आहे, असेही त्यांनी सांगितले.  

बालाकोट हल्ल्याद्वारे भारताने दिले होते उत्तरपुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामुळे जनमानस संतप्त झाले. केंद्र सरकारने या हल्ल्याची गंभीर दखल घेत २६ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानातील खैबर पख्तनख्वा या प्रांतातील बालाकोट या ठिकाणी असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण छावण्यांवर हवाई हल्ले करून ते उद्ध्वस्त केले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा न ओलांडता भारतीय हवाई दलाने ही कामगिरी पार पाडली होती.  

नेमका दावा काय केला?संभाव्य हवाई हल्ल्यासंदर्भात परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी  यांनी घेतलेल्या बैठकीत भीतीने गाळण उडालेले पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचे पाय लटपटत होते, असा दावाही सादिक यांनी केला आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमान