शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

तालिबान्यांच्या हल्ल्यात अफगाणिस्तानमध्ये 11 सैनिकांचा मृत्यू

By admin | Updated: May 23, 2017 14:56 IST

अफगाणिस्तान लष्कराच्या तळावर तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 11 सैनिक ठार झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
कंधार, दि. 23 - अफगाणिस्तान लष्कराच्या तळावर तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 11 सैनिक ठार झाले आहेत. हल्ल्यात इतरही 10 सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. कंधारमधल्या शाह वली कोट जिल्ह्यात हा हल्ला करण्यात आला आहे. या आधीही बलुचिस्तानच्या चमन भागात गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळी पाकिस्तानी सैनिकांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात 50 अफगाणी सैनिक ठार झाले होते. तर 100 हून अधिक जखमी होते. अफगाणिस्तानच्या सेनेनं बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या सैनिकांवर गोळीबार केला होता. यावेळी एका महिलेसमवेत 3 जणांचा मृत्यू झाला होता. तर 17 लोक जखमी होते. अफगाणी सैन्यानं चमन जिल्ह्यातील कली लुकमान आणि कली जहांगीर या भागातील सैनिकांना लक्ष्य केलं होतं. अफगाणिस्तानला ऑपरेशनअंतर्गत पाकिस्तानच्या दोन पोस्ट नेस्तनाबूत करायच्या आहेत. तर गेल्याच महिन्यात उत्तर अफगाणिस्तानच्या एका सैन्य तळावर तालिबानींनी केलेल्या हल्ल्यात किमान 141 अधिक अफगाणी सैनिक ठार झाले होते. या हल्ल्याने देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. 
 
मजार-ए-शरीफ शहराच्या जवळ झालेल्या हल्ल्यात किती नुकसान झाले याची माहिती मात्र मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली नव्हती. काही तास चाललेल्या या हल्ल्यात मशिद आणि भोजनालयातील सैनिकांना लक्ष्य करण्यात आले होते. तालिबानच्या दोन हल्लेखोरांनी स्वत:ला उडवून देत मोठा हल्ला घडवून आणला होता. हे हल्लेखोर अफगाणी सैन्याच्या पोशाखात वाहनांमधून आले होते. या हल्ल्यानंतर किती हल्लेखोरांना ठार मारण्यात आले, याची माहिती न देता संरक्षण मंत्रालयाने सांगितले होते की, अफगाणी सैन्याने सर्व हल्लेखोरांना मारले असून, एका हल्लेखोराला पकडण्यात अफगाणी सैन्याला यश आले होते.
 
दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट करा, असा इशाराच भारतानं पाकिस्तानला दिला होता. अफगाणिस्तानातील हल्ल्याचा भारताने स्पष्ट शब्दांत निषेध केला होता. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अफगाणिस्तानला सर्वोतोपरी मदत देण्याची भारताची तयारी आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते.