शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

प्रत्येक क्षण श्वास रोखणारा, कधीही ऑक्सिजन संपणार; आता चमत्कारच 'टायटन'ला वाचवेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 15:42 IST

पाणबुडीचा संपर्क तुटल्यानंतर अमेरिकेने तिच्या शोधासाठी मोठं सर्च ऑपरेशन हाती घेतले आहे जे अद्याप सुरू आहे.

नवी दिल्ली - जगातील सर्वात प्रसिद्ध जहाज टायटॅनिकचे अवशेष दाखवणारी पाणबुडी टायटन समुद्राच्या खोल खोल पाण्यात रविवारी बेपत्ता झाली. पाणबुडीत पाच अब्जाधीश होते ज्यांचा शोध अद्याप सुरू आहे. या पाणबुडीमध्ये केवळ काही तासांचा ऑक्सिजन शिल्लक असल्याचं बोललं जात आहे. त्यात शोधकार्यात वेळ निघून जात असल्याने पाणबुडीतील लोकांच्या जगण्याच्या आशाही मावळल्या आहेत. 

टायटन एक छोट्या कॅप्सुलच्या आकाराची पाणबुडी आहे ज्याची कमाल क्षमता ५ लोकांची आहे. ज्यावेळी ही पाणबुडी गायब झाली त्यात ५ जण प्रवास करत होते. पाणबुडीचा आकार ६.७ मीटर लांब, २.८ मीटर रुंद, २.५ मीटर उंच आहे. त्यात ९६ तासांचा ऑक्सिजन आहे. पाणबुडीत बसण्यासाठी सीट नसून एक सपाट तळ आहे ज्यावर ५ जण बसू शकतात. २१ फूट लांब पाणबुडीत पसरण्यासाठीही जागा नाही. पाणीबुडीतील लोकांकडे मर्यादित जेवण आणि पाणी आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पाणबुडीतून बाहेर बघण्यासाठी २१ इंच व्यासाची खिडकी आहे. टायटॅनिकपर्यंत पोहचून परत येण्यासाठी ८ तास लागतात. टायटॅनिकचे अवशेष १२५०० फूट समुद्राच्या खोलीत आहेत. त्याठिकाणी जायला २ तास, टायटॅनिक पाहण्यासाठी ४ तास आणि परत येण्यासाठी २ तास असा वेळ लागतो. पाणबुडीला रविवारी समुद्रात उतरवण्यात आले. परंतु १ तास ४५ मिनिटांनी जहाजासोबत त्यांचा संपर्क तुटला. पाणबुडी अमेरिकन किनाऱ्यापासून ९०० नॉटिकल माइल्स अंतरावरून बेपत्ता झाली आहे. 

पाणबुडीचा संपर्क तुटल्यानंतर अमेरिकेने तिच्या शोधासाठी मोठं सर्च ऑपरेशन हाती घेतले आहे जे अद्याप सुरू आहे. या शोध मोहिमेत अमेरिका, कॅनडासह मोठ्या कंपन्या ज्या समुद्राच्या खोलाशी जाऊ शकतात त्यांचाही सहभाग आहे. पाणबुडी, सैन्य विमान, सोनार बॉयच्या मदतीने पाणबुडीचा शोध घेतला जात आहे. त्याचसह रोबोट्सही मदतीला आला आहे. सोनार बॉय असं एक यंत्र आहे ज्याद्वारे ध्वनी लहरी पाठवून समुद्राखालील वस्तू शोधल्या जातात. खोल पाण्यात शत्रूच्या पाणबुड्या शोधण्यासाठी याचा वापर केला जातो.

समुद्रात बचाव कार्य इतके अवघड का?बचाव कार्याची सर्वात मोठी अडचण ही आहे की शोधमोहिम समुद्राच्या तळाशी करायची का समुद्राच्या पृष्ठभागावर बचाव कार्याला गती द्यायची. प्रत्येक वळणावर त्यांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. समुद्रावरील बचाव कार्य हे जमिनीवरील बचाव कार्यापेक्षा कितीतरी पटीने कठीण असते. इंग्लंडमधील कीले विद्यापीठातील फॉरेन्सिक जिओलॉजीचे लेक्चरर जेमी प्रिंगल यांनी सांगितले की, पाण्यात बचाव कार्य करणे खूप कठीण आहे. 'याचं कारण म्हणजे समुद्रात अतिशय आव्हानात्मक वातावरण असते. त्यात पाण्याच्या अनेक पातळ्या आहेत, लाटा असतात आणि समुद्राचा तळही जमिनीच्या तुलनेत खूप खडबडीत असतो.

टायटन सापडेल वाटत नाहीखोल पाण्यात सोनारच्या मदतीने पाणबुडीचा शोध लागू शकतो. परंतु इतक्या विशाल समुद्रात पाणीबुडी शोधण्याला खूप वेळ लागेल आणि पाणबुडीतील लोकांकडे अजिबात वेळ नाही. तज्ज्ञांनुसार, टायटनला शोधले तरी त्यातील लोकांना वाचवणे खूप कठीण आहे. पाणबुडी तळाशी गेलेली असेल ती शोधली तरी त्यातून जिवंत लोकांना बाहेर काढणे अशक्य आहे. खूप कमी जहाज इतक्या तळाशी जातात. बचावासाठी बनवण्यात आलेले नौदलाची जहाजे, पाणबुड्याही टायटॅनिकच्या खोलापर्यंत जाऊ शकत नाही. एक एक क्षण महत्त्वाचा आहे. समुद्राच्या खोलाशी जाणे म्हणजे अंतराळात जाण्यासारखे आहे. शोध कठीण आहे आता चमत्काराची गरज आहे, समुद्रात चमत्कार होत राहतात असं डेविड गॅलो यांनी सांगितले. 

टायटॅनिक दुर्घटना कधी घडली?टायटॅनिक दुर्घटना आतापर्यंत समुद्रातील सर्वात मोठा अपघात मानला जातो. १४ एप्रिल १९१२ रोजी अर्ध्या रात्री एका महाकाय हिमनगाला धडकून हे अतिशय मोठे जहाज अटलांटिक महासागरात बुडाले. या भीषण दुर्घटनेवेळी टायटॅनिक ४१ किमी प्रति तास वेगाने न्यूयॉर्कच्या दिशेने जात होते. हा त्या जहाजाचा पहिलाच प्रवास होता. जहाजात १३०० प्रवासी आणि ९०० कर्मचारी असे एकून २२०० जण होते. त्यातील १५०० लोकांचा जीव गेला.