शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बांगलादेशचे पंतप्रधान होताच मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 19:23 IST

PM Muhammad Yunus: बांगलादेशातील हंगामी सरकारने एक मोठा निर्णय घेत जमात-ए-इस्लामी संघटनेला बंदीतून मुक्त केले आहे. 

Muhammad Yunus Jamaat-e-Islami Party: शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर सत्तेत पंतप्रधान मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन झाले. नव्या सरकारने जमात-ए-इस्लामी या पक्षावरील बंदी हटवली आहे. हा बांगलादेशातील प्रमुख राजकीय पक्ष असून, त्याच्या शेख हसीना यांच्या सरकारने बंदी घातली होती. 

जमात-ए-इस्लामी पक्षावरील बंदी हटवताना सरकारने म्हटले आहे की, जमात-ए-इस्लामी दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. दहशतवाद विरोधी कायद्याखाली या पक्षावर बंदी घालण्यात आलेली होती. 

जमात-ए-इस्लामी पक्षावर बंदी का घालण्यात आली?

बांगलादेशात आरक्षणाविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला हिंसक वळण दिल्याचा आरोप जमात-ए-इस्लामी पक्षावर लावण्यात आला होता. त्यानंतर पक्षावर बंदी घातली गेली, पण शेवटी ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांना बांगलादेशातून पलायन करावे लागले होते. 

पंतप्रधान मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बंदी हटवताना म्हटले आहे की, "जमात आणि त्यांचे सहयोगी दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे कोणतेही विशेष पुरावे मिळाले नाहीत. पक्षावर घातलेली बंदी अवैध, अन्याय करणारी आणि असंवैधानिक आहे."

टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीयPoliticsराजकारण