शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

भारतात ६ लाख डॉक्टर, २० लाख नर्सची उणीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 06:11 IST

भारतात ६ लाख डॉक्टर आणि २० लाख परिचारिकांची टंचाई आहे, असे अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे.

वॉशिंग्टन : भारतात ६ लाख डॉक्टर आणि २० लाख परिचारिकांची टंचाई आहे, असे अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे.सेंटर फॉर डिसिज डायनामिक्टस, इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी (सीडीडीईपी) या संस्थेने हा अभ्यास केला आहे. संस्थेने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, अँटिबायोटिक्स उपलब्ध असतानाही ते देणारा योग्य प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसल्यामुळे योग्य तो गुण येत नाही. अनेकदा अँटिबायोटिक्सच्या किमती रुग्णांना परवडत नाहीत. आरोग्य सेवेवरील भारत सरकारचा खर्च अत्यल्प असल्यामुळे औषधांचा खर्च रुग्णांना स्वत:च्या खिशातूनच करावा लागतो. भारतात आरोग्यावरील ६५ टक्के खर्च लोकांना स्वत:च्या खिशातून करावा लागतो. या खर्चामुळे ५७ दशलक्ष लोक दरवर्षी गरिबीच्या खाईत ढकलले जातात. अँटिबायोटिक्सने सहज बऱ्या होणाºया साध्या आजारांनी जगात दरवर्षी ५.७ दशलक्ष लोक मृत्युमुखी पडतात. यातील बहुतांश मृत्यू अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत होतात. सीडीडीईपीचे संचालक रामनन लक्ष्मीनारायण यांनी सांगितले की, अँटिबायोटिक्स रेसिस्टन्टन्सच्या तुलनेत अँटिबायोटिक्सअभावी मरण पावणाऱ्यांची संख्या अधिक आहे.>भारतात १०,१८९ लोकांमागे एक डॉक्टर‘सीडीडीईपी’ने युगांडा, भारत आणि जर्मनी या देशांत हितधारकांच्या मुलाखती घेऊन आपले निष्कर्ष काढले आहेत. या देशांतील आरोग्य सुविधा अनेकदा अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असतात. अहवालात म्हटले आहे की, १ हजार लोकसंख्येमागे १ डॉक्टर असावा, असा जागतिक आरोग्य संघटनेचा नियम आहे.तथापि, भारतात १०,१८९ लोकांमागे एक डॉक्टर आहे. याचाच अर्थ भारतात ६ लाख डॉक्टर कमी आहेत. रुग्ण आणि परिचारिकांचे गुणोत्तर १:४८३ आहे. याचाच अर्थ भारतात २० लाख परिचारिका कमी आहेत.

टॅग्स :doctorडॉक्टर