शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

३,००० जण अजूनही बेपत्ता

By admin | Updated: May 2, 2015 04:48 IST

महाप्रलंयकारी भूकंपानंतर नेपाळमध्ये सुरू असलेले मृत्यूचे तांडव आठवड्यानंतरही कायम आहे. नेपाळच्या ग्रामीण भागात अजूनही ढिगाऱ्याखाली

सिंधूपालचौक (नेपाळ) : महाप्रलंयकारी भूकंपानंतर नेपाळमध्ये सुरू असलेले मृत्यूचे तांडव आठवड्यानंतरही कायम आहे. नेपाळच्या ग्रामीण भागात अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे मृतदेह बाहेर काढणे अत्यंत जिकिरीचे बनले आहे. ढिगाऱ्याखालील मृतदेहांचा शोध घेऊन त्यांची विल्हेवाट न लावल्यास पुढच्या काही दिवसांमध्ये साथीच्या रोगांनी थैमान घालण्याची भीती वर्तवली जात आहे.आंतरराष्ट्रीय वैद्यकीय बचावपथके त्यादृष्टीने नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आहेत. इंटरनॅशनल रेडक्रॉसने या कार्यात आघाडी घेतली आहे. सरकारी आकडेवारीनुसार भूकंपातील बळींच्या संख्येने सहा हजारांचा आकडा ओलांडला आहे. भूकंपाचे केंद्र असलेल्या गोरखा जिल्ह्यापेक्षाही सिंधूपालचौक येथील मृत्यूचे थैमान अस्वस्थ करणारे आहे. सिंधूपालचौक येथे आतापर्यंत १,८०० मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. तर सुमारे तीन हजार लोक अजूनही बेपत्ता आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. सिंधूपालचौकमध्ये मातीच्या घरांची संख्या अधिक असल्याने साहजिकच येथे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सिंधूपालचौकच्या खालोखाल  गंभीर स्थिती काठमांडू जिल्ह्यात आहे. येथील मृतांच्या संख्येनेही हजाराचा आकडा ओलांडला आहे. काठमांडू लगतच्या ग्रामीण भागांमध्ये अजूनही भूकंपग्रस्तांना मदत पोहोचलेली नाही. दांडागाव, कालाबारी, बतासे आणि चिसापाणी ही गावे काठमांडू लगतच्या स्वयंभूपासून अवघ्या साडेपाच ते ७ किलोमीटर परिघात आहेत. ही गावे पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहेत. नैसर्गिक आपत्तीनंतर बचावलेले उघड्यावर जगत आहेत. रात्री थंडीचा जोर वाढत असल्याने त्यांचे हाल होत आहे. बतासे गावात इश्वर राज गिरी या बचावलेल्या २४ वर्षीय तरुणाला ‘लोकमत’ने गाठले. कुटुंबातील तो एकटाच भूकंपातून बचावला. ६ दिवसांपासून कोणीतरी येईल व आपल्याला मदत करेल या आशेवर तो आहे. पण आमच्या गावाकडे कोणीही फिरकलेले नसल्याचे हताश गिरीने सांगितले.