शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

३,००० जण अजूनही बेपत्ता

By admin | Updated: May 2, 2015 04:48 IST

महाप्रलंयकारी भूकंपानंतर नेपाळमध्ये सुरू असलेले मृत्यूचे तांडव आठवड्यानंतरही कायम आहे. नेपाळच्या ग्रामीण भागात अजूनही ढिगाऱ्याखाली

सिंधूपालचौक (नेपाळ) : महाप्रलंयकारी भूकंपानंतर नेपाळमध्ये सुरू असलेले मृत्यूचे तांडव आठवड्यानंतरही कायम आहे. नेपाळच्या ग्रामीण भागात अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे मृतदेह बाहेर काढणे अत्यंत जिकिरीचे बनले आहे. ढिगाऱ्याखालील मृतदेहांचा शोध घेऊन त्यांची विल्हेवाट न लावल्यास पुढच्या काही दिवसांमध्ये साथीच्या रोगांनी थैमान घालण्याची भीती वर्तवली जात आहे.आंतरराष्ट्रीय वैद्यकीय बचावपथके त्यादृष्टीने नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आहेत. इंटरनॅशनल रेडक्रॉसने या कार्यात आघाडी घेतली आहे. सरकारी आकडेवारीनुसार भूकंपातील बळींच्या संख्येने सहा हजारांचा आकडा ओलांडला आहे. भूकंपाचे केंद्र असलेल्या गोरखा जिल्ह्यापेक्षाही सिंधूपालचौक येथील मृत्यूचे थैमान अस्वस्थ करणारे आहे. सिंधूपालचौक येथे आतापर्यंत १,८०० मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. तर सुमारे तीन हजार लोक अजूनही बेपत्ता आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. सिंधूपालचौकमध्ये मातीच्या घरांची संख्या अधिक असल्याने साहजिकच येथे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सिंधूपालचौकच्या खालोखाल  गंभीर स्थिती काठमांडू जिल्ह्यात आहे. येथील मृतांच्या संख्येनेही हजाराचा आकडा ओलांडला आहे. काठमांडू लगतच्या ग्रामीण भागांमध्ये अजूनही भूकंपग्रस्तांना मदत पोहोचलेली नाही. दांडागाव, कालाबारी, बतासे आणि चिसापाणी ही गावे काठमांडू लगतच्या स्वयंभूपासून अवघ्या साडेपाच ते ७ किलोमीटर परिघात आहेत. ही गावे पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहेत. नैसर्गिक आपत्तीनंतर बचावलेले उघड्यावर जगत आहेत. रात्री थंडीचा जोर वाढत असल्याने त्यांचे हाल होत आहे. बतासे गावात इश्वर राज गिरी या बचावलेल्या २४ वर्षीय तरुणाला ‘लोकमत’ने गाठले. कुटुंबातील तो एकटाच भूकंपातून बचावला. ६ दिवसांपासून कोणीतरी येईल व आपल्याला मदत करेल या आशेवर तो आहे. पण आमच्या गावाकडे कोणीही फिरकलेले नसल्याचे हताश गिरीने सांगितले.