शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

३,००० जण अजूनही बेपत्ता

By admin | Updated: May 2, 2015 04:48 IST

महाप्रलंयकारी भूकंपानंतर नेपाळमध्ये सुरू असलेले मृत्यूचे तांडव आठवड्यानंतरही कायम आहे. नेपाळच्या ग्रामीण भागात अजूनही ढिगाऱ्याखाली

सिंधूपालचौक (नेपाळ) : महाप्रलंयकारी भूकंपानंतर नेपाळमध्ये सुरू असलेले मृत्यूचे तांडव आठवड्यानंतरही कायम आहे. नेपाळच्या ग्रामीण भागात अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे मृतदेह बाहेर काढणे अत्यंत जिकिरीचे बनले आहे. ढिगाऱ्याखालील मृतदेहांचा शोध घेऊन त्यांची विल्हेवाट न लावल्यास पुढच्या काही दिवसांमध्ये साथीच्या रोगांनी थैमान घालण्याची भीती वर्तवली जात आहे.आंतरराष्ट्रीय वैद्यकीय बचावपथके त्यादृष्टीने नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आहेत. इंटरनॅशनल रेडक्रॉसने या कार्यात आघाडी घेतली आहे. सरकारी आकडेवारीनुसार भूकंपातील बळींच्या संख्येने सहा हजारांचा आकडा ओलांडला आहे. भूकंपाचे केंद्र असलेल्या गोरखा जिल्ह्यापेक्षाही सिंधूपालचौक येथील मृत्यूचे थैमान अस्वस्थ करणारे आहे. सिंधूपालचौक येथे आतापर्यंत १,८०० मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. तर सुमारे तीन हजार लोक अजूनही बेपत्ता आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. सिंधूपालचौकमध्ये मातीच्या घरांची संख्या अधिक असल्याने साहजिकच येथे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सिंधूपालचौकच्या खालोखाल  गंभीर स्थिती काठमांडू जिल्ह्यात आहे. येथील मृतांच्या संख्येनेही हजाराचा आकडा ओलांडला आहे. काठमांडू लगतच्या ग्रामीण भागांमध्ये अजूनही भूकंपग्रस्तांना मदत पोहोचलेली नाही. दांडागाव, कालाबारी, बतासे आणि चिसापाणी ही गावे काठमांडू लगतच्या स्वयंभूपासून अवघ्या साडेपाच ते ७ किलोमीटर परिघात आहेत. ही गावे पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहेत. नैसर्गिक आपत्तीनंतर बचावलेले उघड्यावर जगत आहेत. रात्री थंडीचा जोर वाढत असल्याने त्यांचे हाल होत आहे. बतासे गावात इश्वर राज गिरी या बचावलेल्या २४ वर्षीय तरुणाला ‘लोकमत’ने गाठले. कुटुंबातील तो एकटाच भूकंपातून बचावला. ६ दिवसांपासून कोणीतरी येईल व आपल्याला मदत करेल या आशेवर तो आहे. पण आमच्या गावाकडे कोणीही फिरकलेले नसल्याचे हताश गिरीने सांगितले.