शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

जगातील 27 कोटी लोक भूकबळीच्या वाटेवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 13:23 IST

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न मदत संस्थेचे प्रमुख व वर्ल्ड फूड प्रोग्रामचे कार्यकारी संचालक डेव्हीड बिसले यांनी जगाला इशारा देताना म्हटलं आहे, ‘विकसनशील जगातील तीसपेक्षा अधिक देशांत अन्नधान्याचा तीव्र दुष्काळ यामुळे पडण्याची शक्यता आहे. त्यातल्या दहा देशांत आधीच एक कोटीहून अधिक लोक उपाशी आहेत. या तीस देशांतील जवळपास 27 कोटी लोक आजच मरणाच्या दारात उभे आहेत.

ठळक मुद्देतीस विकसनशील देशांना  संयुक्त राष्ट्रसंघाचा इशारा!

लोकमत न्यूज नेटवर्ककोविड-19! चीनमध्ये पहिल्यांदा या साथीच्या आजाराचा उगम झाल्यानंतर इतक्या झपाट्यानं संपूर्ण जगात त्याचा प्रसार हाईल आणि अख्खं जग त्याच्या कचाट्यात सापडेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. अमेरिकेसह बहुसंख्य देशांना वाटलं होतं, चीनमध्ये उगम झालेल्या या रोगाचा फटका केवळ चीनलाच बसेल, आपल्यापर्यंत तो येणार नाही. पण तसं झालं नाही. जगातल्या जवळपास प्रत्येक देशाला कोरोनाचा फटका बसला आहे. अनेक पातळ्यांवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे, पण सर्वात मोठा परिणाम झाला आहे, तो लोकांच्या भुकेवर आणि अर्थातच त्यांच्या जगण्या-मरण्यावर!संयुक्त राष्ट्रसंघानंही त्याबाबत चिंता व्यक्त करताना जगाचं काय होईल याबाबत प्रo्नचिन्ह उभं केलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचं म्हणणं आहे. कोरोनाचा प्रभाव इतका प्रचंड असेल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. कोरोनामुळे अख्ख्या जगालाच व्यापक दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. जगातल्या कोट्यवधी लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न मदत संस्थेचे प्रमुख व वर्ल्ड फूड प्रोग्रामचे कार्यकारी संचालक डेव्हीड बिसले यांनी तर जगाला इशारा देताना म्हटलं आहे, ‘विकसनशील जगातील तीसपेक्षा अधिक देशांत अन्नधान्याचा तीव्र दुष्काळ यामुळे पडण्याची शक्यता आहे. त्यातल्या दहा देशांत आधीच एक कोटीहून अधिक लोक उपाशी आहेत. ज्या लोकांना उपाशीपोटी झोपावं लागतंय त्यांच्याविषयी आम्ही बोलत नाही आहोत. आम्ही आत्ताच्या आपत्कालिन परिस्थितीविषयी बोलतो आहोत. लोकं अक्षरश: उपासमारीच्या दिशेनं निघाले आहेत आणि दर दिवसागणिक मृत्यूच्या दाढेत ते ढकलले जात आहेत. या लोकांना जर आपण वेळेत अन्नधान्याचा पुरवठा करू शकलो, नाही, त्यांना खायला मिळालं नाही, तर त्यांचं मरण अटळ आहे!’या तीस देशांतील जवळपास 27 कोटी लोक आजच मरणाच्या दारात उभे आहेत, असंही संयुक्त राष्ट्रसंघाचं निरीक्षण आहे. डेव्हीड बिसले यांचं म्हणणं आहे की, कोरोना अजूनही आपले हातपाय पसरतोच आहे. कृती करायला आपल्याला फार थोडा वेळ आहे. आपण जर याबाबत फक्त विचारच करत राहिलो आणि प्रत्यक्ष कृतीला थोडाही उशीर केला, तर या गरीब, भुकेकंगाल लोकांची कलेवरं पाहण्याशिवाय आपल्या हातात काहीच राहणार नाही. या अत्यंत बिकट अशा परिस्थितीत या विकसनशील देशांपुढील आव्हान अतिशय बिकट आहे. त्यांना स्वत:ला तर यावरचा पर्याय शोधून काढावाच लागेल, युद्धपातळीवर त्यासाठी प्रय} करावेच लागतील, पण जगातल्या इतर देशांनीही या लोकांना मदत केली पाहिजे. या काळात कुठलाही भेदभाव, अपपरभाव प्रत्येकाच्याच विनाशाला कारणीभूत ठरू शकतो. कोरोनाचा मुकाबल आणि त्याविरुद्धचा आमचा बचाव आम्ही स्वत:, एकट्यानंच करू शकतो, असा कुठल्याही देशाचा समज असेल, तर तो चुकीचा आहे, असंही संयुक्त राष्ट्रसंघानं स्पष्ट केलं आहे. आज सुरुवातीला हे तीस देश सुपात आहेत, पण कालांतरानं इतर देशही त्याच वाटेवर येऊ शकतात, त्यामुळे एक व्हा, एकत्र या, एकमेकांना मदत करा, भुकेल्यांच्या पोटात किमान दोन घास जाऊ द्या. हीच आजची तातडीची गरज आहे.