शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

अपघातग्रस्त विमानातील २१ जणांचे मृतदेह सापडले; ठाण्यातील चार जणांसह सर्व जणांचा मृत्यू झाल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 08:01 IST

पोखरा येथून रविवारी सकाळी या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले.

काठमांडू : नेपाळमधील तारा एअर कंपनीच्या विमानाला रविवारी झालेल्या अपघातातील २१ मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहेत. विमानातील ठाण्याच्या त्रिपाठी कुटुंबातील चार जणांसह सर्व २२ जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अतिशय खराब हवामानामुळे नेपाळच्या मुस्तांग जिल्ह्यात या विमानाला अपघात झाल्याचे सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटी ऑफ नेपाळ (सीएएएन) या यंत्रणेने प्राथमिक चौकशी अहवालात म्हटले आहे.

पोखरा येथून रविवारी सकाळी या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले. जोमसोम येथे जाणाऱ्या या विमानात ठाण्याच्या त्रिपाठी कुटुंबातील चार सदस्य, दोन जर्मन व १३ नेपाळी नागरिक असे १९ प्रवासी व ३ विमान कर्मचारी होते. विमानाचे अवशेष जिथे सापडले तिथे शोधकार्यासाठी सुमारे १०० जणांचे पथक कार्यरत आहे. त्यामध्ये नेपाळी लष्कराचे सैनिक, पोलीस, प्रशिक्षित गिर्यारोहक व स्थानिकांचा समावेश आहे. तारा कंपनीचे विमान कोसळल्यानंतर ते एका डोंगराला धडकले व त्याचे अनेक तुकडे झाले. त्या धडकेने विमानातील लोकांचे मृतदेह आजूबाजूच्या डोंगराळ प्रदेशात विखुरले गेले. 

अपघातग्रस्त विमानाची जी छायाचित्रे सोशल मीडियावर झळकली आहेत, त्यामध्ये या विनानाची शेपूट व एका पंखाचे अवशेष दिसत आहेत. नेपाळ सरकारच्या हेलिकॉप्टरमधून शोधपथकातील जवानांना अपघातस्थळी उतरविण्यात आले. रविवारी खराब हवामानामुळे अडथळे आल्याने थांबवावे लागलेले शोधकार्य सोमवारी सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आले. २०१६ साली तारा एअर कंपनीच्या विमानाला झालेल्या अपघातात २३ जणांचा मृत्यू झाला होता. २०१८ साली त्रिभुवन विमानतळावर झालेल्या विमान अपघातात ५१ जण ठार झाले होते. त्याआधी २०१२ साली सीता एअरच्या विमान अपघातात १९ जण, तर २०१२च्या विमान अपघातात १२ जण ठार झाले होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Nepalनेपाळ