शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

१९७१ च्या युद्धाचे पाकने भान ठेवावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:55 IST

दहशतवादाला खतपाणी घालून काही साध्य होणार नाही, हे पाकिस्तानने ओळखावे आणि १९७१ च्या युद्धात काय झाले होते याचे भान ठेवावे, असा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दहशतवादाला खतपाणी घालून काही साध्य होणार नाही, हे पाकिस्तानने ओळखावे आणि १९७१ च्या युद्धात काय झाले होते याचे भान ठेवावे, असा इशारा सत्ताधारी ‘रालोआ’चे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू यांनी रविवारी येथे दिला. १९७१च्या युद्धात पाकिस्तानचा सपशेल पराभवच झाला नव्हता तर त्याचे दोन तुकडे होऊन स्वतंत्र बांगलादेश उदयास आला होता.सन १९९९ मधील पाकिस्तानसोबतच्या कारगिल युद्धात प्राणाहुती दिलेल्या वीरजवानांच्या स्मृत्यर्थ आयोदित ‘कारगिल पराक्रम परेड’नंतर नायडू बोलते होते.नायडू म्हणाले की, आमच्या शेजारी देशाने मागच्या अनुभवावरून शिकावे. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू असल्याने त्याने कोणाचेच भले होत नाही. पण दुर्दैवाने पाकिस्तानने शासन व्यवहाराच्या धोरणाचा भाग म्हणून दहशतवादाचा वापर करीत आहे. पाकिस्तान काश्मीरमध्ये केवळ लुडबूडच करत नाही तर तेथे दहशतवादास सक्रियतेने पाठिंबा देत आहे, असाही त्यांनी आरोप केला.नायडू असेही म्हणाले की, भारत हा शांतताप्रिय देश आहे. भारताने कधीही कोणावर आक्रमण केलेले नाही, ही त्याची खासियत आहे. आम्हाला युद्ध, संघर्ष नको आहे. आम्हाला शांतता हवी आहे व शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. पण शेजाऱ्यांनीही भ्रातृभाव दाखवावा, अशी आमची अपेक्षा आहे. येत्या महिनाभरात देशाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर बसणार असलेल्या नायडू यांनी मंत्री असल्याप्रमाणे एवढी थेट व तिखट भाषा वापरावी, हे लक्षणीय आहे.काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे व पाकव्याप्त काश्मिरमधील इंचभरही जमीन कोणी भारतापासून हिरावून घेऊ शकणार नाही, याची पाकिस्तानने पक्की खुणगाठ बांधावी.- एम. व्यंकय्या नायडू