शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

१९७१ च्या युद्धाचे पाकने भान ठेवावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:55 IST

दहशतवादाला खतपाणी घालून काही साध्य होणार नाही, हे पाकिस्तानने ओळखावे आणि १९७१ च्या युद्धात काय झाले होते याचे भान ठेवावे, असा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दहशतवादाला खतपाणी घालून काही साध्य होणार नाही, हे पाकिस्तानने ओळखावे आणि १९७१ च्या युद्धात काय झाले होते याचे भान ठेवावे, असा इशारा सत्ताधारी ‘रालोआ’चे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू यांनी रविवारी येथे दिला. १९७१च्या युद्धात पाकिस्तानचा सपशेल पराभवच झाला नव्हता तर त्याचे दोन तुकडे होऊन स्वतंत्र बांगलादेश उदयास आला होता.सन १९९९ मधील पाकिस्तानसोबतच्या कारगिल युद्धात प्राणाहुती दिलेल्या वीरजवानांच्या स्मृत्यर्थ आयोदित ‘कारगिल पराक्रम परेड’नंतर नायडू बोलते होते.नायडू म्हणाले की, आमच्या शेजारी देशाने मागच्या अनुभवावरून शिकावे. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू असल्याने त्याने कोणाचेच भले होत नाही. पण दुर्दैवाने पाकिस्तानने शासन व्यवहाराच्या धोरणाचा भाग म्हणून दहशतवादाचा वापर करीत आहे. पाकिस्तान काश्मीरमध्ये केवळ लुडबूडच करत नाही तर तेथे दहशतवादास सक्रियतेने पाठिंबा देत आहे, असाही त्यांनी आरोप केला.नायडू असेही म्हणाले की, भारत हा शांतताप्रिय देश आहे. भारताने कधीही कोणावर आक्रमण केलेले नाही, ही त्याची खासियत आहे. आम्हाला युद्ध, संघर्ष नको आहे. आम्हाला शांतता हवी आहे व शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. पण शेजाऱ्यांनीही भ्रातृभाव दाखवावा, अशी आमची अपेक्षा आहे. येत्या महिनाभरात देशाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर बसणार असलेल्या नायडू यांनी मंत्री असल्याप्रमाणे एवढी थेट व तिखट भाषा वापरावी, हे लक्षणीय आहे.काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे व पाकव्याप्त काश्मिरमधील इंचभरही जमीन कोणी भारतापासून हिरावून घेऊ शकणार नाही, याची पाकिस्तानने पक्की खुणगाठ बांधावी.- एम. व्यंकय्या नायडू