शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पाकमध्ये १४ जणांची गोळ्या घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 04:14 IST

पाकिस्तानात निमलष्करी दल जवानांच्या गणवेशात आलेल्या अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गुरुवारी १४ जणांची गोळ्या घालून हत्या केली.

इस्लामाबाद/कराची : पाकिस्तानात निमलष्करी दल जवानांच्या गणवेशात आलेल्या अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गुरुवारी १४ जणांची गोळ्या घालून हत्या केली. मृतांत पाकिस्तानच्या नौदलाचा कर्मचारी आहे. हिंसाचाराने अस्वस्थ असलेल्या बलुचिस्तान प्रांतातील ओरमारा भागातील मकरान कोस्टल महामार्गावर १५-२० जणांच्या सशस्त्र टोळीने कराची आणि ग्वादारदरम्यान प्रवास करीत असलेल्या पाच ते सहा बस अडवून तीन डझन प्रवाशांची ओळखपत्रे तपासली व त्यातील १६ जणांना उतरवून घेण्यात आले. त्यातील १४ जणांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले व दोन जण पळून जाण्यात यशस्वी ठरले, असे पोलिसांनी सांगितले.बलुचिस्तानचे पोलीस महानिरीक्षक मोहसीन हस्सन बट्ट यांनी हे हत्याकांड बुझी टॉप भागात पहाटे झाल्याचे सांगितले. बसमधील प्रवाशांची नियमित तपासणी होते. त्यामुळे हल्लेखोरांनी निमलष्करी दलाच्या जवानांचा गणवेश घालून या हत्या केल्या, असे बलुचिस्तानचे गृहमंत्री झिया लँगोव्ह यांनीसांगितले.ते म्हणाले, मृतांची ओळख पटलेली नाही. आम्ही हल्लेखोरांचा शोध घेत असून, चौकशी सुरू केली आहे. मृतांमध्ये नौदलाचा एक व किनारारक्षक दलाचा एक कर्मचारी मरण पावल्याचे लँगगोव्ह म्हणाले. पंतप्रधान इम्रान खान यांनी या हत्याकांडाचा तीव्र निषेध केला आहे. हत्याकांडाचा उद्देश स्पष्ट झालेला नाही, तसेच अजून कोणत्याही गटाने या हत्याकांडाची जबाबदारीही घेतलेली नाही. >अस्वस्थ बलुचिस्तानबलुचिस्तान हा इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर असून, तो पाकिस्तानचा सगळ्यात मोठा व गरीब प्रांतांपैकी एक आहे. बलुचिस्तान वांशिक, फुटीरवादी बंडखोरी आणि कट्टर विचारांनी त्रस्त आहे. देशातील अल्पसंख्य शिया मुस्लिम आणि पंजाब प्रांतातील वांशिक कार्यकर्ते यांना याआधी अगदी ठरवून ठार मारण्यात आले आहे.गेल्या आठवड्यात इसिसने क्वेट्टाच्या प्रांतीय राजधानीत हाजरा शिया समूहाला लक्ष्य करून २१ जणांना ठार मारले होते. या हल्ल्यात ६० जण जखमीही झाले होते. २०१५ मध्ये बलुचिस्तानच्या मात्सुंग भागात सशस्त्र बंदूकधाऱ्यांनी कराचीला निघालेल्या रेल्वेच्या दोन डब्यांतून दोन डझन प्रवाशांचे अपहरण करून त्यातील १९ जणांची खाद कोचा या डोंगराळ भागात हत्या केली.

टॅग्स :terroristदहशतवादीPakistanपाकिस्तान