शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

"आमच्याकडे १३० अणुबॉम्ब, सजवून ठेवण्यासाठी नाहीत"; पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 14:41 IST

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कृतीनंतर पाकिस्तानी मंत्र्यांनी धमकी दिली आहे.

Pahelgam Attack Pakistan Railway Minister: पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून २६ जणांची हत्या केल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिंधू जल करार रद्द करण्यासह पाच मोठे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे पाकिस्तान संतप्त झाला आहे. पाकिस्तानातील राजकीय नेत्यांकडून भारताला धमकावण्याचे प्रयत्न सुरु झालेत. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो-झरदारी यांनी सिंधू नदीतून आमचं पाणी वाहील किंवा त्यांचं रक्त वाहील, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांनी गरळ ओकली आहे.

 पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. भारताने घेतलेल्या निर्णयांनंतर दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच एका पाकिस्तानी मंत्र्यांने भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री हनीफ अब्बासी यांनी पाकिस्तानची घौरी, शाहीन आणि गझनवी क्षेपणास्त्रे आणि १३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी ठेवली आहेत, असं म्हटलं. जर भारताने पाकिस्तानचे पाणी रोखण्याचे धाडस केले तर युद्धासाठी तयार राहण्याची धमकीही अब्बासी यांनी दिली.

रावळपिंडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना अब्बासी यांनी भारताला धमकावले. "जर भारताने पाकिस्तानचे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल. आमची सर्व क्षेपणास्त्रे भारताच्या दिशेने आहेत. जर भारताने कोणतीही कारवाई करण्याचा निर्णय घेतला तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. राजनैतिक प्रयत्नांसोबतच, आम्ही सीमांच्या सुरक्षेसाठीही व्यवस्था केल्या आहेत. पहलगाम हल्ला हे फक्त एक निमित्त आहे. सिंधू पाणी कराराकडेही लक्ष दिले जात आहे," असे हनीफ अब्बासी म्हणाले.

"आम्ही  गौरी, शाहीन, गझनवी ही क्षेपणास्त्रे चौकात सजावटीसाठी ठेवली नाहीत. आम्ही ती भारतासाठी ठेवली आहेत. आमच्याकडे असलेली १३० अण्वस्त्रे आम्ही फक्त मॉडेल बनवण्यासाठी ठेवली नाहीत आणि पाकिस्तानच्या कोणत्या भागात ठेवली आहेत हे तुम्हाला माहितीही नाही.तुम्ही असा विचारही करू नका की तुम्ही पाकिस्तानची सीमा ओलांडाल. जर तुम्ही याचा विचार केलात तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील," असेही अब्बासी यांनी म्हटलं. याआधी सिंध प्रांतातील सुक्कुर येथे एका जाहीर सभेत बिलावल भुट्टो-झरदारी यांनी भारताला इशारा दिला होता. "आम्ही कोणालाही सिंधू नदीचा सौदा करू देणार नाही. आपला कमकुवतपणा लपवण्यासाठी आणि जनतेला मूर्ख बनवण्यासाठी, मोदी सरकार पाकिस्तानवर खोटे आरोप करून सिंधू पाणी करार एकतर्फी स्थगित करत आहे. पण मला सुक्कुरमध्ये सिंधू नदीच्या काठावर उभे राहून भारताला स्पष्ट संदेश द्यायचा आहे की सिंधू नदी आमची आहे आणि आमचीच राहील. एकतर या नदीतून आमचं पाणी त्यातून वाहील किंवा त्यांचं रक्त वाहील," असे भुट्टो यांनी म्हटलं.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर