शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

अफगाणिस्तानात हिमस्खलनामुळे 100 जणांचा मृत्यू, भारतातही सतर्कतेचा इशारा

By admin | Updated: February 6, 2017 08:34 IST

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे.

ऑनलाइन लोकमत

काबूल, दि. 6 -  अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. बर्फवृष्टीमुळे अफगाणिस्तानात झालेल्या हिमस्खलनाच्या दुर्घटनांमध्ये 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. बर्फवृष्टीमुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात जात आहे.  नुरिस्तान प्रांतातील एकाच गावातील 50 जणांचा मृत्यू झाला आहे. 
 
आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाचे प्रवक्ते उमर मोहम्मदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील 34 पैकी 22 प्रांतात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. हिमस्खलनाच्या घटनेत  परिसरातील लोकांची घरं पूर्णतः उद्घवस्त झाली असून येथील रस्तेही ठप्प पडले आहेत.  जवळपास 168 घरं उद्धवस्त झाली असून 340 गुरे दगावली आहेत. दुर्घटनास्थळी बचाव पथक पाठवण्यात आले आहे, मात्र बर्फवृष्टीमुळे रस्ते वाहतूक ठप्प असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने भारतातही सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील काही क्षेत्रांमध्ये हिमस्खलन होण्याचा इशारा देण्यात आला आहे.  
 
पाकिस्तानात 14 जणांचा मृत्यू 
पाकिस्तानातील चित्राल जिल्ह्यातील दूरदराज परिसरात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यानंतर झालेल्या हिमस्खलनाच्या घटनेत पाच इमारती जमीनदोस्त झाल्या. यात जवळपास 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 6 महिला, 6 लहान मुले आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. पाकिस्तानातील वृत्तपत्र 'डॉन'च्या बातमीनुसार, या क्षेत्रात दोन दिवसांपासून प्रचंड बर्फवृष्टी होत असल्याने परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
 
भारततही सतर्कतेचा इशारा
हिमस्खलन होण्याची शक्यता असल्याने रविवारी जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील कुपवाडा, बांदीपुरा, अनंतनाग, बारामुल्ला, गांदरबल, कुलगाम, बडगाम, पूंछ,  किश्तवाड आणि कारगीर परिसरात येत्या 24 तासांत हिमस्खलन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
तर हिमाचल प्रदेशआतील कुल्लू, चांबा, मंडी, शिमला आणि किन्नौर जिल्ह्यातही सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून लोकांना हिमस्खलन होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घरांवरील साचणारे बर्फ वेळोवेळी साफ केले जावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हिमस्खलनाच्या दुर्घटनेत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत.