शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अफगाणिस्तानात हिमस्खलनामुळे 100 जणांचा मृत्यू, भारतातही सतर्कतेचा इशारा

By admin | Updated: February 6, 2017 08:34 IST

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे.

ऑनलाइन लोकमत

काबूल, दि. 6 -  अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. बर्फवृष्टीमुळे अफगाणिस्तानात झालेल्या हिमस्खलनाच्या दुर्घटनांमध्ये 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. बर्फवृष्टीमुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात जात आहे.  नुरिस्तान प्रांतातील एकाच गावातील 50 जणांचा मृत्यू झाला आहे. 
 
आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाचे प्रवक्ते उमर मोहम्मदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील 34 पैकी 22 प्रांतात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. हिमस्खलनाच्या घटनेत  परिसरातील लोकांची घरं पूर्णतः उद्घवस्त झाली असून येथील रस्तेही ठप्प पडले आहेत.  जवळपास 168 घरं उद्धवस्त झाली असून 340 गुरे दगावली आहेत. दुर्घटनास्थळी बचाव पथक पाठवण्यात आले आहे, मात्र बर्फवृष्टीमुळे रस्ते वाहतूक ठप्प असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने भारतातही सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील काही क्षेत्रांमध्ये हिमस्खलन होण्याचा इशारा देण्यात आला आहे.  
 
पाकिस्तानात 14 जणांचा मृत्यू 
पाकिस्तानातील चित्राल जिल्ह्यातील दूरदराज परिसरात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यानंतर झालेल्या हिमस्खलनाच्या घटनेत पाच इमारती जमीनदोस्त झाल्या. यात जवळपास 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 6 महिला, 6 लहान मुले आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. पाकिस्तानातील वृत्तपत्र 'डॉन'च्या बातमीनुसार, या क्षेत्रात दोन दिवसांपासून प्रचंड बर्फवृष्टी होत असल्याने परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
 
भारततही सतर्कतेचा इशारा
हिमस्खलन होण्याची शक्यता असल्याने रविवारी जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील कुपवाडा, बांदीपुरा, अनंतनाग, बारामुल्ला, गांदरबल, कुलगाम, बडगाम, पूंछ,  किश्तवाड आणि कारगीर परिसरात येत्या 24 तासांत हिमस्खलन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
तर हिमाचल प्रदेशआतील कुल्लू, चांबा, मंडी, शिमला आणि किन्नौर जिल्ह्यातही सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून लोकांना हिमस्खलन होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घरांवरील साचणारे बर्फ वेळोवेळी साफ केले जावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हिमस्खलनाच्या दुर्घटनेत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत.