शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

Lokmat Infra Conclave:...तर मुंबईत काम करण्यासाठी घाबरणारे पुन्हा परततील; मंत्री आदित्य ठाकरेंचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 14:11 IST

पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांची मुलाखत लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी घेतली.

मुंबई – मुंबई, ठाण्यात फक्त झोपड्या नाहीत. तर चाळीदेखील आहे. त्याचा पुर्नविकास करणं गरजेचं आहे. पुढील २-३ वर्षात या चाळींचा विकास केला जाईल. डिसेंबर २०२३ पर्यंत कोस्टल रोड पूर्ण होईल. मेट्रो पूर्ण होईल, वरळी-शिवडी कनेक्शन दिसेल. मुंबईत येणारे शहरातील वाहतुक कोंडीला घाबरतात. मात्र ही कनेक्टिविटी सुरु झाली तर  मुंबईत काम करण्यासाठी घाबरणारे लोक पुन्हा मुंबईत परततील असा विश्वास पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांची मुलाखत लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी घेतली. या मुलाखतीत आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील विकासावर बोलतोय, त्याचा आनंद वाटतो. कारण विकासावर बोलणं गरजेचे आहे. राज्यात रोज काही ना काही मोठं काम होत असतात. विकासकामाचा उल्लेख केला तर डोळ्यासमोर रस्ते प्रकल्प, मेट्रो प्रकल्प असं दिसतं परंतु बाहेर परदेशात पाहिलं तर जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा म्हणजे विकास आहे. राज्यात ५१ टक्के शहरीकरण झालेले आहे. शहरीकरण म्हणजे रस्ते, मोठमोठी ऑफिस इतकेच नाही. यूकेचं ट्रान्सपोर्ट सिस्टम एकमेकांशी जोडलेली आहे. चांगल्या शाळा आहेत पण त्याचसोबत उत्तम शिक्षणाचा दर्जा देण्याचं गरजेचे आहे असं मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

तसेच सार्वजनिक वाहतूक महाराष्ट्रात जास्त आहेत. लंडनचं उदाहरण घेतलं तर ९ हजार बसेस आहे. त्यातील अनेक बसेस डबल डेकर आहेत. डबल डेकर आणलं तर कॅपिसिटी डबल होते. आपण अनेक बसेस आता इलेक्ट्रीक बसेस घेतोय. चार्जिग इन्फ्राही महत्त्वाचं आहे. मुंबईत ३३३७ बसेस आहेत. पुढील काही काळात २१०० इलेक्ट्रीक बसेस घेण्याचा विचार आहे. २०२७ पर्यंत १०० टक्के बसेस इलेक्ट्रीक करण्याचा आमचा मानस आहे. इलेक्ट्रीक बसमुळे चांगला प्रवास, चांगला श्वास घेऊ शकतो असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री मुंबईतील असल्याने त्यांना जाण

मुंबईत १६ वेगवेगळ्या एजन्सी काम करतात. एखादा रस्ता तयार करायचा असेल तर सर्वांशी समन्वय साधावा लागतो. रस्ता खोदण्याचं काम करण्यासाठी पत्र व्यवहार करायला लागतो. या सर्व एजन्सीला सोबत घेऊन काम करायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा मुख्यमंत्री मुंबईचे आहेत. त्यामुळे त्यांना या सगळ्या प्रश्नांची जाण आहे. मी पालकमंत्री असल्याने आणि मुख्यमंत्री वरच्या मजल्यावर राहत असल्याने त्याचा फायदा जास्त होतो असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरे