शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Infra Conclave:...तर मुंबईत काम करण्यासाठी घाबरणारे पुन्हा परततील; मंत्री आदित्य ठाकरेंचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 14:11 IST

पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांची मुलाखत लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी घेतली.

मुंबई – मुंबई, ठाण्यात फक्त झोपड्या नाहीत. तर चाळीदेखील आहे. त्याचा पुर्नविकास करणं गरजेचं आहे. पुढील २-३ वर्षात या चाळींचा विकास केला जाईल. डिसेंबर २०२३ पर्यंत कोस्टल रोड पूर्ण होईल. मेट्रो पूर्ण होईल, वरळी-शिवडी कनेक्शन दिसेल. मुंबईत येणारे शहरातील वाहतुक कोंडीला घाबरतात. मात्र ही कनेक्टिविटी सुरु झाली तर  मुंबईत काम करण्यासाठी घाबरणारे लोक पुन्हा मुंबईत परततील असा विश्वास पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांची मुलाखत लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी घेतली. या मुलाखतीत आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील विकासावर बोलतोय, त्याचा आनंद वाटतो. कारण विकासावर बोलणं गरजेचे आहे. राज्यात रोज काही ना काही मोठं काम होत असतात. विकासकामाचा उल्लेख केला तर डोळ्यासमोर रस्ते प्रकल्प, मेट्रो प्रकल्प असं दिसतं परंतु बाहेर परदेशात पाहिलं तर जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा म्हणजे विकास आहे. राज्यात ५१ टक्के शहरीकरण झालेले आहे. शहरीकरण म्हणजे रस्ते, मोठमोठी ऑफिस इतकेच नाही. यूकेचं ट्रान्सपोर्ट सिस्टम एकमेकांशी जोडलेली आहे. चांगल्या शाळा आहेत पण त्याचसोबत उत्तम शिक्षणाचा दर्जा देण्याचं गरजेचे आहे असं मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

तसेच सार्वजनिक वाहतूक महाराष्ट्रात जास्त आहेत. लंडनचं उदाहरण घेतलं तर ९ हजार बसेस आहे. त्यातील अनेक बसेस डबल डेकर आहेत. डबल डेकर आणलं तर कॅपिसिटी डबल होते. आपण अनेक बसेस आता इलेक्ट्रीक बसेस घेतोय. चार्जिग इन्फ्राही महत्त्वाचं आहे. मुंबईत ३३३७ बसेस आहेत. पुढील काही काळात २१०० इलेक्ट्रीक बसेस घेण्याचा विचार आहे. २०२७ पर्यंत १०० टक्के बसेस इलेक्ट्रीक करण्याचा आमचा मानस आहे. इलेक्ट्रीक बसमुळे चांगला प्रवास, चांगला श्वास घेऊ शकतो असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री मुंबईतील असल्याने त्यांना जाण

मुंबईत १६ वेगवेगळ्या एजन्सी काम करतात. एखादा रस्ता तयार करायचा असेल तर सर्वांशी समन्वय साधावा लागतो. रस्ता खोदण्याचं काम करण्यासाठी पत्र व्यवहार करायला लागतो. या सर्व एजन्सीला सोबत घेऊन काम करायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा मुख्यमंत्री मुंबईचे आहेत. त्यामुळे त्यांना या सगळ्या प्रश्नांची जाण आहे. मी पालकमंत्री असल्याने आणि मुख्यमंत्री वरच्या मजल्यावर राहत असल्याने त्याचा फायदा जास्त होतो असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरे