शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Infra Conclave:...तर मुंबईत काम करण्यासाठी घाबरणारे पुन्हा परततील; मंत्री आदित्य ठाकरेंचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 14:11 IST

पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांची मुलाखत लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी घेतली.

मुंबई – मुंबई, ठाण्यात फक्त झोपड्या नाहीत. तर चाळीदेखील आहे. त्याचा पुर्नविकास करणं गरजेचं आहे. पुढील २-३ वर्षात या चाळींचा विकास केला जाईल. डिसेंबर २०२३ पर्यंत कोस्टल रोड पूर्ण होईल. मेट्रो पूर्ण होईल, वरळी-शिवडी कनेक्शन दिसेल. मुंबईत येणारे शहरातील वाहतुक कोंडीला घाबरतात. मात्र ही कनेक्टिविटी सुरु झाली तर  मुंबईत काम करण्यासाठी घाबरणारे लोक पुन्हा मुंबईत परततील असा विश्वास पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांची मुलाखत लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी घेतली. या मुलाखतीत आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील विकासावर बोलतोय, त्याचा आनंद वाटतो. कारण विकासावर बोलणं गरजेचे आहे. राज्यात रोज काही ना काही मोठं काम होत असतात. विकासकामाचा उल्लेख केला तर डोळ्यासमोर रस्ते प्रकल्प, मेट्रो प्रकल्प असं दिसतं परंतु बाहेर परदेशात पाहिलं तर जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा म्हणजे विकास आहे. राज्यात ५१ टक्के शहरीकरण झालेले आहे. शहरीकरण म्हणजे रस्ते, मोठमोठी ऑफिस इतकेच नाही. यूकेचं ट्रान्सपोर्ट सिस्टम एकमेकांशी जोडलेली आहे. चांगल्या शाळा आहेत पण त्याचसोबत उत्तम शिक्षणाचा दर्जा देण्याचं गरजेचे आहे असं मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

तसेच सार्वजनिक वाहतूक महाराष्ट्रात जास्त आहेत. लंडनचं उदाहरण घेतलं तर ९ हजार बसेस आहे. त्यातील अनेक बसेस डबल डेकर आहेत. डबल डेकर आणलं तर कॅपिसिटी डबल होते. आपण अनेक बसेस आता इलेक्ट्रीक बसेस घेतोय. चार्जिग इन्फ्राही महत्त्वाचं आहे. मुंबईत ३३३७ बसेस आहेत. पुढील काही काळात २१०० इलेक्ट्रीक बसेस घेण्याचा विचार आहे. २०२७ पर्यंत १०० टक्के बसेस इलेक्ट्रीक करण्याचा आमचा मानस आहे. इलेक्ट्रीक बसमुळे चांगला प्रवास, चांगला श्वास घेऊ शकतो असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री मुंबईतील असल्याने त्यांना जाण

मुंबईत १६ वेगवेगळ्या एजन्सी काम करतात. एखादा रस्ता तयार करायचा असेल तर सर्वांशी समन्वय साधावा लागतो. रस्ता खोदण्याचं काम करण्यासाठी पत्र व्यवहार करायला लागतो. या सर्व एजन्सीला सोबत घेऊन काम करायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा मुख्यमंत्री मुंबईचे आहेत. त्यामुळे त्यांना या सगळ्या प्रश्नांची जाण आहे. मी पालकमंत्री असल्याने आणि मुख्यमंत्री वरच्या मजल्यावर राहत असल्याने त्याचा फायदा जास्त होतो असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरे