शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

Lokmat Infra Conclave: यापुढे एकेका इमारतीचा नव्हे, लेआउटचा विकास, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 10:14 IST

गरिबाला घर देणाऱ्याच्या खिशात दोन पैसे गेले तरी चालतील...

मुंबई : यापुढे म्हाडाच्या एकेका इमारतीचा नव्हे, तर संपूर्ण लेआउटचा विकास करायलाच परवानगी दिली जाणार असल्याचे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी जाहीर केले. कोरोनाच्या साथीमुळे आपल्याला सुरक्षित घराची किती गरज आहे हे लोकांना जाणवले आहे, असेही ते म्हणाले.

लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह २०२१ मध्ये ‘गृहनिर्माण विभाग - व्हिजन २०२५’ या विषयावर आव्हाड बोलत होते. ते म्हणाले, मुंबईत जेवढी जागा म्हाडाकडे आहे तेवढी खासगी बिल्डरांकडेही नाही. मुंबईत विविध भागांत म्हाडा कॉलनी उभ्या आहेत. आतापर्यंत एकेका इमारतीच्या पुनर्विकासाला परवानगी दिली जात होती. परंतु असा विकास महागडा ठरतो. त्यामुळे यापुढे एका इमारतीच्या विकासाला परवानगी न देता संपूर्ण लेआउटचा विकास करण्याचे धोरण स्वीकारले जाणार आहे. मुंबईत घर बांधणीला मर्यादा आहेत. आता संपूर्ण महानगर क्षेत्राचे महत्त्व वाढवायला हवे, तरच मुंबईवरील ताण कमी होईल. उरणच्या बाजूला मोकळ्या जमिनी उपलब्ध आहेत. त्या जमिनी खरेदी कराव्यात. भविष्यात शिवडी-मुंबई हे अंतर २० मिनिटांत पार करणे शक्य झाल्यावर या भागात विकासाला मोठी संधी उपलब्ध होणार आहे. ५२३ झोपडपट्टी योजना बंद असून, येत्या चार दिवसांत झोपडपट्टीवासीयांच्या आवास योजनेबाबत निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

म्हाडाने गेल्या १० वर्षांत २०० लेटर ऑफ इंटेन्ट (एलओआय) दिली होती. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गेल्या केवळ दोन वर्षांत २०० एलओआय दिल्याकडे आव्हाड यांनी लक्ष वेधले. गेली २५ वर्षे गृहनिर्माण हे खाते मुख्यमंत्र्यांकडे होते. मुख्यमंत्र्यांकडे अनेक महत्त्वाची खाती असल्याने गृहनिर्माण विभागाच्या विषयांना प्राधान्य मिळत नव्हते. महाविकास आघाडी सरकारने या खात्याला स्वतंत्र मंत्री दिल्याने ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’च्या दिशेने अनेक पावले टाकली असल्याचे त्यांनी सांगितले. म्हाडातील फाईल वेगवेगळ्या टेबलांवर फिरणे बंद झाल्याकडे आव्हाड यांनी लक्ष वेधले.

महापालिका, म्हाडा अथवा खासगी मालकीच्या जमिनीवरील झोपड्यांचा विकास करण्यास, जोडपत्राला मान्यता देण्यास होणारा विलंब टाळण्यास म्हाडा, महापालिका अधिकाऱ्यांकडे खेटे मारायला लागू नये याकरिता काही अधिकाऱ्यांना त्यासंबंधीचे अधिकार बहाल केले जाणार आहेत, असे ते म्हणाले.

आपल्याला समाजातील शेवटच्या माणसाला घर द्यायचे आहे. त्यामुळे या गोरगरिबाला घर देणाऱ्या माणसाच्या खिशात दोन पैसे गेले तरी चालतील. आपल्यावर कुणी बिल्डरधार्जिणे निर्णय घेतल्याचा आरोप केला तरी चालेल.  तब्बल २५ वर्षांनंतर बीडीडी चाळींच्या विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून, येत्या चार वर्षांत इमारती उभ्या करू. - जितेंद्र आव्हाड

जुन्या इमारतींमधील रहिवाशांचा प्रश्न लागेल मार्गीदक्षिण मुंबईतील जुन्या इमारती कोसळल्यावर म्हाडाला दोष दिला जातो. काही वेळा तर इमारत खिळखिळी झाली तर मालकांना हवी असते. सरकारने अशा मालमत्ता संपादित करून म्हाडाच्या माध्यमातून त्यांचा विकास करण्यासंबंधी केलेला कायदा मंजुरीकरिता राष्ट्रपतींकडे पडून आहे. त्यांनी त्यावर स्वाक्षरी केली तर अशा रहिवाशांना मोठा दिलासा मिळेल.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड