शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

आशिया चषक स्पर्धा जिंकून दमदारपणे विश्वकप हॉकी स्पर्धेत खेळू - राणी रामपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 02:39 IST

भारतीय महिला हॉकी संघाने विश्वचषक हॉकी स्पर्धेत आधीच स्थान निश्चित केले असले, तरी आशिया चषक स्पर्धा जिंकून दमदारपणे विश्वकप हॉकी स्पर्धेत खेळू, असा विश्वास भारतीय संघाची कर्णधार राणी रामपाल हिने व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाने विश्वचषक हॉकी स्पर्धेत आधीच स्थान निश्चित केले असले, तरी आशिया चषक स्पर्धा जिंकून दमदारपणे विश्वकप हॉकी स्पर्धेत खेळू, असा विश्वास भारतीय संघाची कर्णधार राणी रामपाल हिने व्यक्त केला आहे.जपानच्या काकामिगहरा शहरात सुरू असलेल्या आशिया चषकात भारताने साखळीत तिन्ही सामने जिंकले. उपांत्यपूर्व फेरीत भारताची गाठ कझाकिस्तानशी पडेल. प्रतिस्पर्धी संघाने तिन्ही साखळी सामने गमाविले हे विशेष. द. आफ्रिकेने आफ्रिकन नेशन्स कपमध्ये घानावर ४-० ने विजय नोंदविताच भारताने विश्वचषकाची पात्रता मिळविली होती. पण, राणीने मात्र भारतीय संघ विश्वचषकात स्वत:च्या बळावर स्थान मिळवेल, असे म्हटले आहे.राणी म्हणाली, ‘‘पात्रता गाठली ही समाधानाची बाब आहे; पण आशिया चषक जिंकून विश्वकप खेळायचा, असा आमचा निर्धार असेल. कुणाच्याही सहानुभूतीच्या बळावर पुढे जाणे आपल्याला पसंत नाही. यासाठी कठोर मेहनत घेत आहोत.’’ गटातील सामन्यात भारताने सिंगापूरचा १०-०ने, चीनचा ४-१ने आणि मलेशियाचा २-०ने पराभव केला होता. राणी म्हणाली, ‘‘आमची कामगिरी चांगली झाली; पण यापुढील खेळावर फोकस करणार आहोत. प्रत्येक संघ विजयासाठीच खेळत असल्याने प्रतिस्पर्धी सोपा नाही, या भावनेतून वाटचाल करू.’’मागच्या वर्षी लखनौ येथे ज्युनियर विश्वचषक हॉकीचे जेतेपद पटकाविणाºया भारतीय संघाचे कोच हरेंद्रसिंग यांची महिला संघासोबत ही पहिलीच स्पर्धा आहे. हरेंद्र यांनी संघाला चॅम्पियनच्या थाटात वावरण्याचे बळ दिले असून त्यांच्यामुळे सकारात्मकता आल्याचे राणीने सांगितले. हरेंद्र बेसिक्सवर लक्ष देत असल्याने आत्मविश्वास उंचावत आहे. (वृत्तसंस्था)विजयी लय कायम राहीलयुवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण असलेल्या भारतीय महिला संघाचे भविष्य उज्ज्वल आहे, रोटेशन पद्धतीने आम्ही युवा खेळाडूंना संधी देतो. अनुभवी खेळाडू स्वत:ची जबाबदारी ओळखून खेळत असल्याने पुढेही विजयी लय कायम राहील, असा विश्वास राणीने व्यक्त केला.

टॅग्स :Hockeyहॉकी