शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

भारताने हॉकी मालिका ३-१ अशी जिंकली, द. कोरियाविरुद्ध अखेरचा सामना बरोबरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 01:42 IST

भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी अंतिम लढतीत यजमान दक्षिण कोरियाला १-१ ने बरोबरीत रोखत पाच सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली. दोन्ही संघांनी सामन्याच्या अखेरच्या क्वॉर्टरमध्ये गोल नोंदवले.

सेऊल - भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी अंतिम लढतीत यजमान दक्षिण कोरियाला १-१ ने बरोबरीत रोखत पाच सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली. दोन्ही संघांनी सामन्याच्या अखेरच्या क्वॉर्टरमध्ये गोल नोंदवले.वंदना कटारियाने ४८ व्या मिनिटाला गोल नोंदवत भारताला आघाडी मिळवून दिली, पण पाहुण्या संघाला हा आनंद फार वेळ उपभोगता आला नाही. कारण दक्षिण कोरियाच्या बोमी किमने (५० वा मिनिट) दोन मिनिटानंतर बरोबरी साधणारा गोल नोंदवला.पहिल्या दोन्ही क्वॉर्टरमध्ये उभय संघांनी तुल्यबळ खेळ केला. दुसºया क्वॉर्टरमध्ये यजमान संघाला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण भारतीय गोलकिपर रजनी इतिमारपूने चांगला बचाव करीत प्रतिस्पर्धी संघाचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर ४१ व्या मिनिटाला मिळला, पण त्याचा लाभ घेता आला नाही. कारण दक्षिण कोरियाच्या मिजिन हानने त्यावर चांगला बचाव केला. वंदनाने ४८ व्या मिनिटाला राणी रामपालच्या पासवर जोरकस फटका लगावत चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला आणि संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन मिनिटांनी दक्षिण कोरियाच्या बुमी किमने संघाला बरोबरी साधून दिली. अखेरच्या १० मिनिटांमध्ये उभय संघांनी आक्रमक खेळ केला, पण त्यांना गोलजाळ्याचा वेध घेता आला नाही. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :HockeyहॉकीSportsक्रीडा