शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

भारताचा आॅस्ट्रेलियाकडून २-४ असा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 02:15 IST

पहिल्या तीन क्वार्टरमध्ये केलेल्या खराब खेळामुळे भारताला मंगळवारी येथे आॅस्ट्रेलियाकडून २-४ असा पराभव पत्करावा लागला. या निराशाजनक कामगिरीसह भारत २७ व्या सुलतान अजलन शाह कप हॉकीच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. भारता तिस-या क्वार्टरपर्यंत ०-४ असा पिछाडीवर होता.

इपोह -  पहिल्या तीन क्वार्टरमध्ये केलेल्या खराब खेळामुळे भारताला मंगळवारी येथे आॅस्ट्रेलियाकडून २-४ असा पराभव पत्करावा लागला. या निराशाजनक कामगिरीसह भारत २७ व्या सुलतान अजलन शाह कप हॉकीच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.भारता तिस-या क्वार्टरपर्यंत ०-४ असा पिछाडीवर होता. मात्र रमणदीप सिंह (५२ मिनिट आणि ५३ मिनिट) याने चौथ्या क्वार्टरमध्ये दोन गोलचे अंतर कमी केले. आॅस्ट्रेलियाकडून मार्क नोल्स (२८ मिनिट), एरेन जालेवस्की (३५), डॅनियर बिले (३८) आणि ब्लॅक गोवर्स (४०) यांनी गोल केले.संघातील वरिष्ठ आणि प्रमुख खेळाडूंना विश्रांती देणाºया भारतीय संघाचा हा स्पर्धेतील दुसरा पराभव आहे. सलामीच्या सामन्यात भारताला अर्जेंटिनाकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला होता. तर इंग्लंडसोबत १ -१ अशी बरोबरी केली होती.आॅस्टेÑलियाविरुद्धचा सामना भारतासाठी करा अथवा मरा असा होता. मात्र आॅस्ट्रेलियासमोर भारतीय संघाने लोटांगण घातले.पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने चेंडूवर अधिक निंयत्रण राखले. संघाला गोल करण्याच्या तीन संधी मिळाल्या मात्र त्याचा फायदा घेता आला नाही. दुसºया क्वार्टरमध्ये भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला युवा ड्रॅग फ्लिकर वरुण कुमारचा शॉट क्रॉसबारला लागला.आॅस्ट्रेलियाच्या स्ट्रायकरनी दुसºया क्वार्टरमध्ये काही चुका केल्या मात्र तिसºया क्वार्टरमध्ये त्यांनी एकही चुक केली नाही. क्रेगच्या पासवर जालेवस्कीने संघासाठी दुसरा गोल केला. त्यानंतर आॅस्ट्रेलियाने भारताला दबावात ठेवले.भारताने अखेरच्या क्वार्टरमध्ये दोन गोल केले. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. भारताने अखेरच्या क्षणी मिळालेला पेनल्टी कॉर्नर देखील वाया घालवला.भारताचा चौथा सामना बुधवारी यजमान मलेशियासोबत होणार आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :HockeyहॉकीSportsक्रीडा