शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भारत आशिया चॅम्पियन, मलेशिया पराभूत, विजयासाठी एका दशकाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 03:54 IST

अफलातून कामगिरी करणा-या भारतीय संघाने रविवारी अंतिम सामन्यात मलेशियाचा २-१ अशा गोलने पराभव करून आशिया चषक हॉकी स्पर्धा जिंकली.

ढाका : अफलातून कामगिरी करणा-या भारतीय संघाने रविवारी अंतिम सामन्यात मलेशियाचा २-१ अशा गोलने पराभव करून आशिया चषक हॉकी स्पर्धा जिंकली. विशेष म्हणजे तब्बल एका दशकानंतर भारताला आशिया चषक हॉकी स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घालता आली. भारताचे या स्पर्धेतील हे एकूण तिसरे विजेतेपद ठरले.याआधी २००३ मध्ये मलेशियातील क्वालालंपूर येथे प्रथम आशियाई चषक हॉकी स्पर्धा जिंकली होती आणि त्यानंतर २००७ साली मायदेशातील चेन्नई येथे झालेल्या स्पर्धेत भारत चॅम्पियन ठरला होता. २०१३ मध्ये मलेशियातील इपोह येथील स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. अंतिम सामन्यात त्यांना दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागला होता.आज मलेशियाविरुद्ध प्रथमच अंतिम सामन्यात खेळणाºया भारताने रमनदीपसिंहने केलेल्या तिसºया मिनिटाला आणि त्यानंतर ललित उपाध्याय याने २९ व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर तिसºयांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावताना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानची बरोबरी साधण्यात यश मिळविले.या स्पर्धेत दक्षिण कोरियाने चार वेळेस आशिया चषक हॉकी स्पर्धा जिंकली आहे. अंतिम सामन्यात मलेशिया संघाने भारताला अखेरपर्यंत कडवी झुंज दिली. त्यांच्याकडून एकमेव गोल शाहरील सबाह याने ५० व्या मिनिटाला केला. जागतिक क्रमवारीतील ६ व्या क्रमांकावर असणाºया भारतासाठी अखेरचे दहा मिनिटे खूपच संघर्षपूर्ण ठरली. यादरम्यान मलेशियाने सातत्याने हल्लाबोल करताना भारतीय बचाव फळीला व्यस्त ठेवले. तथापि, भारतीय बचाव फळीनेदेखील जबरदस्त कामगिरी केली आणि मलेशियाचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही.विशेष म्हणजे आशिया खंडातील तीन महत्त्वपूर्ण स्पर्धा जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. भारताने आशियाई क्रीडा स्पर्धा, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया चषक स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला. भारताने २०१४ मध्ये इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेत फायनलमध्ये पाकिस्तानला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ अशी धूळ चारली आणि गतवर्षी कुआंटन येथे आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीतही पाकिस्तानवर ३-२ असा विजय मिळविला होता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Hockeyहॉकी