शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
2
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
5
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
6
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
8
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
9
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
10
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
11
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
12
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
13
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
14
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
15
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
16
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
17
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
18
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
19
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
20
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

भारत आशिया चॅम्पियन, संघाचा विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:09 IST

अत्यंत थरारक झालेल्या अंतिम सामन्यात मोक्याच्या वेळी पेनल्टी शूटआऊटदरम्यान गोलरक्षक सविताने अडवलेला गोल निर्णायक ठरला आणि भारताने चीनविरुद्ध ५-४ अशी बाजी मारत दिमाखात महिला

काकामिगहरा (जपान) : अत्यंत थरारक झालेल्या अंतिम सामन्यात मोक्याच्या वेळी पेनल्टी शूटआऊटदरम्यान गोलरक्षक सविताने अडवलेला गोल निर्णायक ठरला आणि भारताने चीनविरुद्ध ५-४ अशी बाजी मारत दिमाखात महिला आशिया चषक उंचावला. विशेष म्हणजे या जेतेपदासह भारताच्या महिलांनी पुढील वर्षी होणा-या विश्वचषक स्पर्धेसाठीही थेट प्रवेश केला. संपूर्ण स्पर्धेत आपला दबदबा राखलेल्या भारतीय महिलांनी तब्बल १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आशिया चषक उंचावण्याची कामगिरी केली.सुरुवातीपासून अत्यंत चुरशीच्या झालेल्या या अंतिम लढतीत दोन्ही संघांच्या महिलांनी एकमेकांविरुद्ध आक्रमक चाली रचल्या. २५ व्या मिनिटाला नवज्योत कौर हिने केलेल्या गोलच्या जोरावर भारताने १-० अशी आघाडी घेतली. ही आघाडी भारतीय महिलांनी ४७ व्या मिनिटापर्यंत टिकवली. पण ४७ व्या मिनिटाला टियांटन लुका हिने गोल करत चीनला १-१ गोलबरोबरी साधून दिली. त्यानंतर निर्धारित वेळेत हीच बरोबरी कायम राहिल्याने सामन्याचा निकाल शूटआऊटद्वारे लावण्यात आला. शूटआऊटमध्ये भारतीय संघाने ५-४ गोलने बाजी मारली.या वेळी राणीने शानदार कामगिरी करताना दोन्ही संधी सत्कारणी लावत गोल केले. याशिवाय, मोनिका, लिलिमामिंज आणि नवज्योत यांनीही महत्त्वपूर्ण गोल केले. पण, सामन्याला खºया अर्थाने कलाटणी दिली ती सविताने. तिने चीनचा एक गोल अप्रतिमरीत्या अडवताना भारताचे जेतेपद निश्चित केले.1भारताने साखळी फेरीत सर्वच सामन्यांत विजय मिळवला. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत कझाकिस्तान आणि उपांत्य फेरीत गतविजेत्या जपानला पराभूत केले. भारताने साखळी फेरीत सिंगापूरला १०-०, चीनला ४-१, मलेशियाला २-० असे पराभूत केले होते.2भारतीय संघ याआधी २००९मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र त्या वेळी चीनने भारताला ५-३ असे पराभूत केले होते.3भारतीय महिलांनी २००४ मध्ये जपानचा १-० गोलने पराभव करून आशियाई चषक जिंकला होता.पूर्ण वेळेत सामना १-१ गोल बरोबरीतसामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही. मात्र दुसºया क्वार्टरमध्ये भारताने आक्रमक पवित्रा घेत चीनला दबावाखाली आणले. १७ व्या मिनिटाला नवज्योतचा आक्रमक फटका रोखण्यात आल्यानंतर २५ व्या मिनिटाला नवज्योतने पुन्हा एकदा वेगवान खेळ करत भारताला आघाडीवर नेले. यानंतर चीननेही जोरदार प्रत्युत्तर दिले . तिसºया क्वार्टरमध्येही भारताने आक्रमक खेळ केला. पण, चीनच्या भक्कम बचावापुढे गोल करण्यात भारतीय अपयशी ठरले. चीनच्या मध्यरक्षकांनी शानदार बचाव केले. चौथ्या क्वार्टरमध्येही भारताने वर्चस्व राखले. परंतु, ४७ व्या मिनिटाला चीनने गोल करून सामना रोमांचक केला.५१ व्या मिनिटाला भारताला गोल करण्याची संधी मिळाली होती. परंतु चीनने भारताचे प्रयत्न हाणून पाडले. सामना संपण्यास तीन मिनिटे शिल्लक असताना चीनला पेनल्टी कॉर्नर मिळाली खरी, परंतु गोलरक्षक सविता लाकडाने अप्रतिम बचाव करताना चीनला यश मिळू दिले नाही आणि सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला.आशिया कप जिंकल्याबद्दल आणि गुणवत्तेच्या आधारे पुढील वर्षी होणाºया विश्वचषक स्पर्धेसाठी आम्ही पात्र ठरलो, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आमच्या संघात अनेक युवा खेळाडू आहेत, ज्यांनी इतक्या मोठ्या स्तरावर आपला उत्साह आणि चमकदार खेळ दाखवला. आमच्या संघाने चीनला चांगले आव्हान दिले. चीननेही चांगला खेळ करून सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये खेचला. ही उच्चस्तरीय स्पर्धा होती आणि आम्ही कोणत्याही सामन्यात कमजोर प्रदर्शन केले नाही. सविताने सडनडेथमध्ये अप्रतिम संरक्षण केले आणि मी त्या वेळी गोल करण्यात यशस्वी ठरले, याचा आनंद आहे. या स्पर्धेतून मिळालेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आम्ही आगामी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांतही यश मिळवू, अशी अपेक्षा आहे. - राणी, भारतीय कर्णधार.

टॅग्स :Sportsक्रीडा