शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वर्षांनंतरही सविता नोकरीच्या प्रतीक्षेत, सरकारकडून मिळाले केवळ आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 04:21 IST

बलाढ्य चीनला नमवून १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आशिया चषक पटकावलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला ‘हॉकी इंडिया’ने प्रत्येकी एक लाख रुपये रोख पारितोषिक जाहीर केले खरे

नवी दिल्ली : बलाढ्य चीनला नमवून १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आशिया चषक पटकावलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला ‘हॉकी इंडिया’ने प्रत्येकी एक लाख रुपये रोख पारितोषिक जाहीर केले खरे, परंतु भविष्याच्या दृष्टीने गोलरक्षक सविता पूनिया हिच्यासाठी ही रक्कम पुरेशी नाही. याला कारण म्हणजे, नऊ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतरही सविता नोकरीच्या शोधात आहे.भारताला आशिया चषक मिळवून देण्यात निर्णायक कामगिरी बजावलेल्या सविताच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला नऊ वर्षे पूर्ण झाली. परंतु, अजूनही तिचा नोकरीचा शोध थांबलेला नाही. २००८मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये पदार्पण केलेल्या सविताने जपानच्या काकामिगहरा येथे झालेल्या आशिया चषक स्पर्धेत कारकिर्दीतील १५० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. दिवंगत आजोबा महिंदर सिंग यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हॉकी खेळण्यास सुरुवात केलेल्या सविताने आपली वेगळी ओळख निर्माण केली. तिने अनेकदा चमकदार कामगिरी करताना भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. मात्र, इतके यश मिळवूनही तिला नोकरीने मात्र हुलकावणी दिली.जपानहून भारतात परतल्यानंतर हरियाणाच्या सविताने म्हटले की, ‘‘माझे वय आता २७ वर्षे होणार असून, गेल्या नऊ वर्षांपासून मी नोकरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. हरियाणा सरकारच्या ‘पदक आणा, नोकरी मिळवा’ योजनेंतर्गत मला आशा होती. परंतु, नेहमी मला आश्वासनेच मिळाली.’’ २०१३मध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेतही मलेशियाविरुद्ध दोन महत्त्वपूर्ण पेनल्टी वाचवून सविताने भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते. सविताचे वडील फार्मासिस्ट असून, आपल्या खर्चासाठी सविता वडिलांवरच अवलंबून आहे.‘‘मी नऊ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळत असून, आजही मी स्वत:च्या खर्चासाठी आई-वडिलांवर अवलंबून आहे. खरं म्हणजे या वयामध्ये मला त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळेच दरवेळी माझ्या मनात एकच विचार सुरूअसतो, की माझ्याकडे नोकरी नाही. असे असले तरी या गोष्टीचा मी माझ्या कामगिरीवर परिणाम होऊ देत नाही. मात्र, प्रत्येक यशानंतर एका आशा असते. हे चक्र अनेक वर्षांपासून सुरूच आहे,’’ अशी खंतही सविताने मांडली.आशिया चषक पटकावणे खरंच खूप मोठे यश आहे. रिओ आॅलिम्पिक पात्रतेनंतर माझ्या कारकिर्दीतील हे सर्वांत मोठे यश आहे. आपले क्रीडामंत्री स्वत: आॅलिम्पिकपदक विजेते आहेत आणि मला विश्वास आहे,की ते माझी परिस्थिती समजून घेतील आणि मला नोकरी मिळेल. आशिया चषक पटकावल्यानंतर भारतात महिला हॉकीचा खूप प्रसार होईल. यामुळे मुली मैदानात नक्की येतील याची खात्री आहे. आम्ही आमच्या मेहनतीवर विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवला असून, भविष्यात याच कामगिरीची आम्ही पुनरावृत्ती करु.- सविता पूनिया