शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नऊ वर्षांनंतरही सविता नोकरीच्या प्रतीक्षेत, सरकारकडून मिळाले केवळ आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 04:21 IST

बलाढ्य चीनला नमवून १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आशिया चषक पटकावलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला ‘हॉकी इंडिया’ने प्रत्येकी एक लाख रुपये रोख पारितोषिक जाहीर केले खरे

नवी दिल्ली : बलाढ्य चीनला नमवून १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आशिया चषक पटकावलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला ‘हॉकी इंडिया’ने प्रत्येकी एक लाख रुपये रोख पारितोषिक जाहीर केले खरे, परंतु भविष्याच्या दृष्टीने गोलरक्षक सविता पूनिया हिच्यासाठी ही रक्कम पुरेशी नाही. याला कारण म्हणजे, नऊ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतरही सविता नोकरीच्या शोधात आहे.भारताला आशिया चषक मिळवून देण्यात निर्णायक कामगिरी बजावलेल्या सविताच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला नऊ वर्षे पूर्ण झाली. परंतु, अजूनही तिचा नोकरीचा शोध थांबलेला नाही. २००८मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये पदार्पण केलेल्या सविताने जपानच्या काकामिगहरा येथे झालेल्या आशिया चषक स्पर्धेत कारकिर्दीतील १५० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. दिवंगत आजोबा महिंदर सिंग यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हॉकी खेळण्यास सुरुवात केलेल्या सविताने आपली वेगळी ओळख निर्माण केली. तिने अनेकदा चमकदार कामगिरी करताना भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. मात्र, इतके यश मिळवूनही तिला नोकरीने मात्र हुलकावणी दिली.जपानहून भारतात परतल्यानंतर हरियाणाच्या सविताने म्हटले की, ‘‘माझे वय आता २७ वर्षे होणार असून, गेल्या नऊ वर्षांपासून मी नोकरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. हरियाणा सरकारच्या ‘पदक आणा, नोकरी मिळवा’ योजनेंतर्गत मला आशा होती. परंतु, नेहमी मला आश्वासनेच मिळाली.’’ २०१३मध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेतही मलेशियाविरुद्ध दोन महत्त्वपूर्ण पेनल्टी वाचवून सविताने भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते. सविताचे वडील फार्मासिस्ट असून, आपल्या खर्चासाठी सविता वडिलांवरच अवलंबून आहे.‘‘मी नऊ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळत असून, आजही मी स्वत:च्या खर्चासाठी आई-वडिलांवर अवलंबून आहे. खरं म्हणजे या वयामध्ये मला त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळेच दरवेळी माझ्या मनात एकच विचार सुरूअसतो, की माझ्याकडे नोकरी नाही. असे असले तरी या गोष्टीचा मी माझ्या कामगिरीवर परिणाम होऊ देत नाही. मात्र, प्रत्येक यशानंतर एका आशा असते. हे चक्र अनेक वर्षांपासून सुरूच आहे,’’ अशी खंतही सविताने मांडली.आशिया चषक पटकावणे खरंच खूप मोठे यश आहे. रिओ आॅलिम्पिक पात्रतेनंतर माझ्या कारकिर्दीतील हे सर्वांत मोठे यश आहे. आपले क्रीडामंत्री स्वत: आॅलिम्पिकपदक विजेते आहेत आणि मला विश्वास आहे,की ते माझी परिस्थिती समजून घेतील आणि मला नोकरी मिळेल. आशिया चषक पटकावल्यानंतर भारतात महिला हॉकीचा खूप प्रसार होईल. यामुळे मुली मैदानात नक्की येतील याची खात्री आहे. आम्ही आमच्या मेहनतीवर विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवला असून, भविष्यात याच कामगिरीची आम्ही पुनरावृत्ती करु.- सविता पूनिया