शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जि.प.त सभेपूर्वीच वादाची फोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:11 IST

जिल्हा परिषदेच्या गुरुवारच्या सर्वसाधारण सभेच्या पूर्वतयारीसाठी झालेल्या बैठकीत आरोग्य उपकेंद्राच्या मुद्यावरून जि.प. सदस्यांमध्ये जुंपल्याने अध्यक्षांच्या दालनात एकच गोंधळ उडाला. त्यामुळे ही सभा तहकूब करण्याची वेळ आली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेच्या गुरुवारच्या सर्वसाधारण सभेच्या पूर्वतयारीसाठी झालेल्या बैठकीत आरोग्य उपकेंद्राच्या मुद्यावरून जि.प. सदस्यांमध्ये जुंपल्याने अध्यक्षांच्या दालनात एकच गोंधळ उडाला. त्यामुळे ही सभा तहकूब करण्याची वेळ आली.जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांच्या दालनात आयोजित केलेल्या या पूर्वतयारी बैठकीस सदस्यांचीच नव्हे, तर सदस्य पतींचीही मोठी उपस्थिती होती. सुरुवातीलाच जि.प. सदस्य संजय कावरखे यांनी उपाध्यक्ष अनिल पतंगे यांच्याशी वाद घातला. त्यानंतर दोघांत चर्चा झाल्याने कावरखे यांनी माघार घेतली. हा वाद थांबत नाही तोच शिवसेनेचे दोघेजण एकमेकांशी भिडले. जि. प. सदस्य श्रीशैल्य स्वामी व सारिका खिल्लारे यांचे पती नंदू खिल्लारे यांच्यात आरोग्य उपकेंद्राच्या मंजुरीवरून जुंपली. यामध्ये वाद विकोपाला गेल्याने इतरही सदस्यांनी सहभाग घेतला अन् एकच गोंधळ उडाला. नियोजन विभागाने निधीची तरतूद न करताच परस्पर २ उपकेंद्रांना मंजुरी दिली. यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकारांवर गंडांतर येत असल्याचा काही सदस्यांचा आक्षेप होता. तर काहीजण मंजुरीचेच काम झाले पाहिजे म्हणून बाजू घेत होते. मात्र हा प्रकार म्हणजे नियोजन विभागाची अनागोंदी की चिरीमिरीमुळे हे घडतेय, असा सवाल सदस्य करीत होते.जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीने दहा उपकेंद्र्रांची शिफारस केली होती. त्यापैकी शेवाळा व हाताळा ही दोन नावे आली. मात्र मोरवड व सेंदूरसना ही दोन नावे न सुचविता मंजूर झाली. यावरूनच ही बोंब उठली होती. यापूर्वी निधी नसताना मंजूर झालेल्या दोन शाळांचे काम जिल्हा परिषदेच्या सभागृहाने फेटाळले होते. शिवाय उपकेंद्रांसाठी केवळ १२0 लक्ष रुपयांचा निधी असल्याने दीडपट नियोजनात हे काम करणे शक्य नसल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. यामुळे मूळ कामांवर परिणाम होणार असल्याने ही कामे फेटाळण्याचीच तयारी दिसून येत आहे.सभा तहकूब : दिवस ठरेनाएकीकडे हा वाद सुरू असताना दुसरीकडे अधिकारी सभागृहात येऊन बसले होते. मात्र तिकडे पदाधिकारी व सदस्य फिरकले नसल्याने सभा तहकूब करावी लागली. ही सभा कधी होणार यावर मात्र शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. सोमवारी ही सभा घेण्याचे नियोजन केले जात होते. मात्र आखाडा बाळापूर बाजार समितीच्या निवडणूक निकालाचे कारण काहीजण सांगत होते. यामध्ये सायंकाळी उशिरापर्यंत बैठकीवर कोणताच निर्णय झाला नसल्याचे दिसून आले. या वादाच्या चर्चेतच दिवस निघून गेला.दरम्यान, जिल्हा परिषदेतील नियोजन समितीवरील सदस्यांचीही बैठक झाली. यामध्ये जि.प.ला त्रासदायक ठरत असलेले मुद्दे उपस्थित करण्यावर सदस्यांनी चर्चा केली.

टॅग्स :Hingoliहिंगोलीzpजिल्हा परिषद