शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
4
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
5
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
6
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
7
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
8
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
9
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
10
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
11
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
12
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
13
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
14
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
15
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
16
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
17
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
18
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
19
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
20
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.चा गाडा रुळावर येतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:26 IST

जिल्हा परिषदेतील विविध विभागाच्या निधी खर्चातील बाह्य हस्तक्षेपाचे काटे एकदाच दूर होणे शक्य नसले तरीही त्यातून मार्ग काढून गाडी रुळावर येत असल्याची चिन्हे दिसत आहेत. पदाधिकाऱ्यांनी आपापल्या नेत्यांशी संवादाचा पूल उभारण्याचा फंडा आता उपयोगी ठरत असल्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेतील विविध विभागाच्या निधी खर्चातील बाह्य हस्तक्षेपाचे काटे एकदाच दूर होणे शक्य नसले तरीही त्यातून मार्ग काढून गाडी रुळावर येत असल्याची चिन्हे दिसत आहेत. पदाधिकाऱ्यांनी आपापल्या नेत्यांशी संवादाचा पूल उभारण्याचा फंडा आता उपयोगी ठरत असल्याची चिन्हे दिसत आहेत.जिल्हा परिषदेत गतवर्षी समाजकल्याणच्या दलित वस्ती सुधार योजनेत पंचवार्षिक आराखड्यातील शेवटचे वर्ष असल्याने पदाधिकाºयांनी काही प्रमाणात बाह्य हस्तक्षेपासमोर नांगी टाकली होती. मात्र निधी दिल्यानंतरही निधी अडविण्याचे धोरण राबविले गेल्याने पदाधिकारी व सदस्यही त्रस्त होते. त्यातच ३0५४ व ५0५४ ला तर पालकमंत्र्यांच्या समितीसमोर सादर करणे बंधनकारक झाले होते. आता न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिल्याने पुन्हा जिल्हा परिषदेकडेच या निधीचे नियोजन आले आहे. तरीही यात काही अडचणी असल्याने पेच कायम होता. यामुळे समाजकल्याणसह रस्त्याचाही निधी गतवर्षीपासून अखर्चित होता. आता यातील अडचणीही दूर झाल्यातच जमा असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यातही जि.प. पदाधिकाºयांनी एक पाऊल मागे घेतल्यानेच निर्णय होत असल्याचे सांगितले जात आहे. दलित वस्तीचा गतवर्षीचा २६ कोटींचा निधी सर्व तयारी झालेली असताना पडून आहे. हा निदी खर्च न झाल्याने यंदाचा २0 कोटी रुपयांचा निधी मागणे अवघड झालेले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी पडून राहिला तर आगामी काळात निवडणुकांमुळे तो खर्च करणेच शक्य नव्हते. आता यातील अडचणी दूर होताच नियोजनाकडे वाटचाल सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी बाह्यशक्तींना स्थानच द्यायचे नाही. जर या शक्तींनी डोके वर काढले तर त्या पक्षाच्या सदस्यांचा वाटा कमी करण्याचा नवा फंडा समोर येत आहे.शासनाकडून नियमितपणे मंजूर निधीवर कुणालाही डल्ला मारू दिला जाणार नाही. वाढीव निधी आणल्यास तो संबंधितांनीच खर्च केल्यास कोणाचीच नाराजी नसल्याचेही सांगितले जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये जि. प. सदस्यांची डोकेदुखी मागे लागू नये म्हणून यापुढे कोणी विरोध करेल, अशी शक्यता धूसर बनली आहे. मात्र सदस्यांनी एकजुटीने लढा दिल्यामुळे हे शक्य झाले आहे. असे असले तरीही विविध विभागांचा कोट्यवधींचा निधी पडून असून त्याकडेही लक्ष देणे तेवढेच गरजेचे आहे. या निधीकडे मात्र ना पदाधिकाºयांचे लक्ष आहे ना सदस्यांचे. केवळ निविदांच्या कामाकडे लक्ष देवून वैयक्तिक लाभाच्या योजनांकडे दुर्लक्ष होत असेल तर तेही चुकीचे आहे. मात्र बहुतांश योजना या वैयक्तिक लाभाच्या असून अशांचाच निधी खर्ची होत नाही. सार्वजनिक सेवांच्या निधीचीही हीच काही प्रमाणात बोंब आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद