शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जि.प. सदस्य देणार धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:33 IST

पंचायत राज व्यवस्थेला मूठमाती देत आपल्याच पदरात सगळे पाडून घेण्याचा घाट विधिमंडळ व संसद सदस्य करु लागल्याची तिखट प्रतिक्रिया जि.प. पदाधिकारी व सदस्यांच्या झालेल्या बैठकीत ऐकायला मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पंचायत राज व्यवस्थेला मूठमाती देत आपल्याच पदरात सगळे पाडून घेण्याचा घाट विधिमंडळ व संसद सदस्य करु लागल्याची तिखट प्रतिक्रिया जि.प. पदाधिकारी व सदस्यांच्या झालेल्या बैठकीत ऐकायला मिळाली.जि.प.तील या बैठकीस जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती संजय देशमुख, बाबा नाईक, भानुदास जाधव, गटनेते अंकुश आहेर, मनीष आखरे आदींची उपस्थिती होती. सर्वपक्षीय सदस्य बैठकीत दिसत होते. घटनादुरुस्तीनंतर पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यासाठी ज्या बाबी जि.प.कडे सुपूर्द केल्या. त्यातील अनेक बाबी हळूहळू राज्य शासनाने पुन्हा आपल्या अखत्यारितल्या विभागांना वर्ग केल्या. अजूनही हा प्रकार थांबलेला नाही. आता तर बांधकाम विभागाला मिळणारा ३0५४ व ५0५४ या लेखाशिर्षांचा निधी नुसता नावालाच जि.प.कडे ठेवला आहे. नियोजन मात्र हिसकावले आहे. मग या सभागृहाची गरजच काय? असा सवाल सदस्यांनी केला. मिनी मंत्रालय म्हणून जि.प.ला मोठेपण द्यायचे, जि.प.च्या अध्यक्षांना राज्यमंत्री दर्जा असल्याचे सांगायचे अन् याच संस्थेवर अविश्वास दाखवायचा, असा प्रकार सुरू असल्याचा आरोप केला. त्यामुळे राज्य शासन अथवा विधिमंडळ, संसद सदस्य जि.प.च्या अधिकारावरच गंडांतर आणण्याचा चंग बांधून असतील तर त्यांना निवडणुकांत आमची किंमत दाखवून देवू, असा इशाराही सदस्य आक्रमकपणे दिसत होते.विशेष म्हणजे दलित वस्तीच्या कामांनाही आराखड्याचे शेवटचे वर्ष असताना तक्रारी करून ब्रेक लावल्याची नाराजीही पोटतिडकीने मांडली जात होती. या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी कायदेशीर लढा देण्याचाही निर्णय घेण्यात आला. तर याबाबत ३0 आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या आंदोलनात पदाधिकाऱ्यांसह सर्वपक्षीय सदस्य सहभागी असल्याचे दिसून येत आहे.नूर पालटला : स्वकीयांचीही नाराजीया बैठकीत काही सदस्यांनी अगदी पोटतिडकीने निवडणुकीत केलेल्या कामांचा वरिष्ठ लोकप्रतिनिधींना विसर पडत असेल तर आगामी निवडणुकांमध्ये आपणही हे विसरले पाहिजे, असे मांडले. तर स्वकीयांविरोधात रणांगणात उतरण्याची वेळ आली तरीही मागे हटायचे नाही. यापूर्वी कधीच कोणत्या लोकप्रतिनिधींनी जि.प.तील आपल्या भावंडांना त्रास दिला नाही. लहान भाऊ म्हणूनच सांभाळले. मात्र ही मंडळी वाºयावर सोडत असेल तर आम्हीही भावकीची भिंत उभी करायला काय हरकत? असा सवाल केला.मागील अनेक दिवसांपासून जि.प.पदाधिकारी व सदस्य त्यांच्या अधिकारांवर गंडांतर येत असल्याने नाराज होते. मात्र ती खदखद व्यक्त करण्यासाठी आजच्या बैठकीत व्यासपीठ मिळाले. त्यामुळे अनेकजण यात खुल्या दिलाने व्यक्त झाल्याचे दिसले.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदMorchaमोर्चा