शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

युवा शेतकऱ्याने ‘सेल्फ मार्केटिंग’चा 'फंडा' वापरत टोमॅटो विक्रीतून मिळवले भरघोस उत्पन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 12:34 IST

यशकथा : मंदीच्या काळातही ४० रुपये प्रतिकिलो दर मिळविला आहे.

- रमेश कदम ( हिंगोली) सध्या बाजारात टोमॅटोचे दर कमालीचे घसरले असतानाही हिंगोली जिल्ह्यातील नवखा ता. कळमनुरी येथील माऊली देशमुख या युवा शेतकऱ्याने नैसर्गिक पद्धतीने गावराण टोमॅटो विक्रीतून १५ गुंठ्यात पन्नास हजारांचा नफा मिळविला आहे.

सध्या बाजारात टोमॅटोला पाच ते दहा रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळत आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले असताना माऊली देशमुख यांनी सेल्फ मार्केटिंगचा फंडा अजमावत मंदीच्या काळातही ४० रुपये प्रतिकिलो दर मिळविला आहे. नैसर्गिक टोमॅटोची चव आणि महत्त्व पटवून सांगत शेतमालाला शेतकऱ्यालाही दर ठरविता येतात याचा आदर्श शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.

माऊली नेहमी आपल्या छोटेखानी शेतीत वेगवेगळे प्रयोग करतात. फुलशेती व मार्केटिंगच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीमुळे त्याने मराठवाडा आणि विदर्भात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. यापूर्वी गावराण लसूण घरोघरी विकून त्यांनी बाजारभाव हा शेतकऱ्यांनी स्वत: ठरवायचा असतो, हे सिद्ध केले. आता देशमुख यांनी गावराण टोमॅटोचा नवा प्रयोग केला. केवळ १५ गुंठे जमिनीत त्यांनी चेरी टोमॅटोची लागवड केली. यासाठी अठराशे रुपयांचे बियाणे आणि इतर किरकोळ खर्च, असा एकूण चार हजारांचा खर्च आला आहे. कुठलेही रासायनिक खत किंवा कीटकनाशकाचा वापर केला नाही. जमिनीत शेण व गोमूत्रापासून तयार केलेल्या नैसर्गिक जीवामृताचा वापर केला. किडीपासून संरक्षणासाठी ताकाची फवारणी केली.

लागवडीनंतर काही दिवसातच रसरशीत, लालबुंद टोमॅटो निघण्यास सुरुवात झाली. रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर न केल्याने टोमॅटोची चव इतर टोमॅटोपेक्षा वेगळी लागते. रसदार आणि आंबट-गोड चव असलेले चेरी टोमॅटो हा तरुण हिंगोली, पुसद जिल्ह्यात पॉलिथीनच्या पिशवीमध्ये पाव किलोची पॅकिंग दहा रुपयांस विकून चाळीस रुपये प्रतिकिलोने विक्री करीत आहे. 

सद्य:स्थितीत बाजारपेठेत टोमॅटोचे भाव कमालीचे घसरले आहेत. दहा रुपयांत दीड ते दोन किलोपर्यंत दर घसरूनही ग्राहक पाहिजे तसा प्रतिसाद देत नाहीत. त्यामध्ये शेतकऱ्यांचा  उत्पादन खर्चही वसूल होत नाही, हे वास्तव चित्र असताना या नैसर्गिक टोमॅटोला मात्र ग्राहक प्रचंड पसंती दाखवत आहेत.  मॉर्निंग वाकला येणाऱ्या नागरिकांना माऊली नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या टोमॅटोचे महत्त्व सांगतो. तासाभरातच शंभरच्या वर पाकिटांची विक्री करून तो घरी परततो. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर, कळमनुरी परिसरातही घरोघरी जाऊन टोमॅटोची चव आणि नैसर्गिक उत्पादनाचे महत्त्व सांगून काही वेळातच टोमॅटो विक्री करतो.

नैसर्गिक पद्धतीचे उत्पादन आणि सेल्फ मार्केटिंगचे तंत्र या तरुण शेतकऱ्याने विकसित केले असून, त्याच्यासाठी ते लाभदायक ठरत आहे. दहा रुपये किलो टोमॅटो मिळत असतानाही माऊलीकडून मात्र, दहा रुपयांचे पाव किलो टोमॅटो खरेदी करतात. यातच त्याच्या मार्केटिंगचे यश सामावले आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी