शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

युवा शेतकऱ्याने ‘सेल्फ मार्केटिंग’चा 'फंडा' वापरत टोमॅटो विक्रीतून मिळवले भरघोस उत्पन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 12:34 IST

यशकथा : मंदीच्या काळातही ४० रुपये प्रतिकिलो दर मिळविला आहे.

- रमेश कदम ( हिंगोली) सध्या बाजारात टोमॅटोचे दर कमालीचे घसरले असतानाही हिंगोली जिल्ह्यातील नवखा ता. कळमनुरी येथील माऊली देशमुख या युवा शेतकऱ्याने नैसर्गिक पद्धतीने गावराण टोमॅटो विक्रीतून १५ गुंठ्यात पन्नास हजारांचा नफा मिळविला आहे.

सध्या बाजारात टोमॅटोला पाच ते दहा रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळत आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले असताना माऊली देशमुख यांनी सेल्फ मार्केटिंगचा फंडा अजमावत मंदीच्या काळातही ४० रुपये प्रतिकिलो दर मिळविला आहे. नैसर्गिक टोमॅटोची चव आणि महत्त्व पटवून सांगत शेतमालाला शेतकऱ्यालाही दर ठरविता येतात याचा आदर्श शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.

माऊली नेहमी आपल्या छोटेखानी शेतीत वेगवेगळे प्रयोग करतात. फुलशेती व मार्केटिंगच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीमुळे त्याने मराठवाडा आणि विदर्भात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. यापूर्वी गावराण लसूण घरोघरी विकून त्यांनी बाजारभाव हा शेतकऱ्यांनी स्वत: ठरवायचा असतो, हे सिद्ध केले. आता देशमुख यांनी गावराण टोमॅटोचा नवा प्रयोग केला. केवळ १५ गुंठे जमिनीत त्यांनी चेरी टोमॅटोची लागवड केली. यासाठी अठराशे रुपयांचे बियाणे आणि इतर किरकोळ खर्च, असा एकूण चार हजारांचा खर्च आला आहे. कुठलेही रासायनिक खत किंवा कीटकनाशकाचा वापर केला नाही. जमिनीत शेण व गोमूत्रापासून तयार केलेल्या नैसर्गिक जीवामृताचा वापर केला. किडीपासून संरक्षणासाठी ताकाची फवारणी केली.

लागवडीनंतर काही दिवसातच रसरशीत, लालबुंद टोमॅटो निघण्यास सुरुवात झाली. रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर न केल्याने टोमॅटोची चव इतर टोमॅटोपेक्षा वेगळी लागते. रसदार आणि आंबट-गोड चव असलेले चेरी टोमॅटो हा तरुण हिंगोली, पुसद जिल्ह्यात पॉलिथीनच्या पिशवीमध्ये पाव किलोची पॅकिंग दहा रुपयांस विकून चाळीस रुपये प्रतिकिलोने विक्री करीत आहे. 

सद्य:स्थितीत बाजारपेठेत टोमॅटोचे भाव कमालीचे घसरले आहेत. दहा रुपयांत दीड ते दोन किलोपर्यंत दर घसरूनही ग्राहक पाहिजे तसा प्रतिसाद देत नाहीत. त्यामध्ये शेतकऱ्यांचा  उत्पादन खर्चही वसूल होत नाही, हे वास्तव चित्र असताना या नैसर्गिक टोमॅटोला मात्र ग्राहक प्रचंड पसंती दाखवत आहेत.  मॉर्निंग वाकला येणाऱ्या नागरिकांना माऊली नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या टोमॅटोचे महत्त्व सांगतो. तासाभरातच शंभरच्या वर पाकिटांची विक्री करून तो घरी परततो. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर, कळमनुरी परिसरातही घरोघरी जाऊन टोमॅटोची चव आणि नैसर्गिक उत्पादनाचे महत्त्व सांगून काही वेळातच टोमॅटो विक्री करतो.

नैसर्गिक पद्धतीचे उत्पादन आणि सेल्फ मार्केटिंगचे तंत्र या तरुण शेतकऱ्याने विकसित केले असून, त्याच्यासाठी ते लाभदायक ठरत आहे. दहा रुपये किलो टोमॅटो मिळत असतानाही माऊलीकडून मात्र, दहा रुपयांचे पाव किलो टोमॅटो खरेदी करतात. यातच त्याच्या मार्केटिंगचे यश सामावले आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी