शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
2
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
3
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
4
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
5
VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
6
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
7
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
8
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
9
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
10
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
11
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
12
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
13
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
14
पुढील वर्षी असं काही होईल, जे यापूर्वी कधीच झालं नाही, बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी
15
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
16
Virat Kohli Celebration : चेहऱ्यावर हसू अन् खातं उघडल्याचा 'विराट' आनंद! व्हिडिओ बघाच
17
Crime: एकेकाळी 'राज्यस्तरीय पैलवान', लग्नानंतर ड्रग्जचं व्यसन जडलं, पैशांसाठी मुलाला विकले!
18
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
19
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
20
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट

मुख्यमंत्र्यांच्या सभेत धनगर आरक्षणासाठी गोंधळ; दाखवले पिवळे झेंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 21:25 IST

भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला बचत गट व शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असताना धनगर-हटकर समाजाच्या कार्यकर्त्यांनी पिवळे झेंडे दाखवत गोंधळ घातला.

हिंगोली : भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला बचत गट व शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असताना धनगर-हटकर समाजाच्या कार्यकर्त्यांनी पिवळे झेंडे दाखवत गोंधळ घातला. यावेळी आमचेच शासन केंद्राकडे आरक्षणासाठी शिफारस करेल, असे आश्वासन देत सभेनंतर या कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या.

रामलीला मैदानावर आयोजित या सभेस ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री दिलीप कांबळे, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आ.तान्हाजी मुटकुळे, माजीमंत्री सूर्यकांता पाटील, माजी खा. शिवाजी माने, माजी खा. सुभाष वानखेडे, माजी आ.गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, मिलींद यंबल, फुलाजी शिंदे, कैलास काबरा आदींची उपस्थिती होती.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच पिवळे झेंडे घेवून काहींनी गोंधळ सुरू केला. तेव्हा या पिवळ्या झेंड्यांचा अर्थ मी समजतो. धनगर-हटकर समाजाच्या आरक्षणाची केंद्र शासनाकडे हेच सरकार पाठवेल, असे सांगून कार्यक्रमानंतर भेटण्याचे आवाहन केले. फडणवीस पुढे म्हणाले, यापूर्वीचे सरकार हे अप्पलपोटे होते. त्यांनी आपल्यापुरतेच पाहिले. आम्ही शेतकरी, गोरगरिबांसाठी काम करीत आहोत. सतत चार वर्षांपासून दुष्काळ पडत आहे. ५0 हजार कोटींची मदत या काळात दिली. तीही मागच्या सरकारप्रमाणे मार्च-एप्रिलमध्ये नव्हे, जानेवारीतच दिली. तीन वर्षांत १२ हजार कोटींचा पीकविमा दिला.

कर्जमाफीची योजना शेवटच्या शेतकरी लाभार्थ्याला लाभ मिळेपर्यंत बंद केली जाणार नाही. तर शेतीमाल हमीभावाने खरेदी साडेआठ हजार कोटींची केली. पूर्वीच्या सरकारने पंधरा वर्षांत साडेचारशे कोटींची खरेदी केली होती. तर केंद्र शासनाने आता प्रत्येक शेतक-याला सहा हजार पेन्शन सुरू केली. त्यात वाढही होवू शकते, असेही फडणवीस म्हणाले. शेतीमालाला सुरुवातीला कमी व नंतर जास्त भाव मिळतो. मात्र असे न होण्यासाठी योजनेवर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात ३0 हजार किमीचे रस्ते केले. ५ लाख लोकांना घरे दिली. तेवढ्यांना आगामी वर्षभरात देण्याचा प्रयत्न आहे. तर हिंगोलीचा रस्त्यांचा १00 कोटींचा प्रस्ताव मान्य करून तीन टप्प्यांत निधी देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. तर आ.तान्हाजी मुटकुळे यांचा विकासकामांसाठी पाठपुरावा व निधी आणल्याबाबत त्यांचे कौतुक केले.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, भाजप सामान्यांसाठी काम करते. आमच्या सरकारमध्ये दलालांना थारा नाही. दलालांचे सरकार गेले अन् आमचे आले. आता विरोधक व दलाल आमच्याविरुद्ध ओरडतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्यासाठी सगळे एकत्र येत आहेत. मात्र जनता पाठीशी आहे. जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, गॅस योजना, कर्जमाफीतून सामान्यांची कामे केल्याने आपल्याकडे कुणी ढुंकूनही पाहणार नसल्याची भीती विरोधकांना आहे. त्यामुळे ही सगळी धडपड आहे. यांनी दारू, मटन दिल्यावर ते थोडेच पाच वर्षे टिकणार आहे. मात्र आमची विकासाची कामे पुढील पाच पंचवीस वर्षे दिसतील. त्यामुळे भविष्याचा विचार करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी पालकमंत्री कांबळे यांनी जिल्ह्यात झालेल्या विकास कामांत मुख्यमंत्र्यांनी भरभरून दिल्याचे सांगितले. प्रास्ताविकात आ.तान्हाजी मुटकुळे यांनी रस्ते विकासासाठी १0३ कोटी व नर्सी नामदेव संस्थानसाठी २५ कोटींची मंजुरी देण्याची मागणी केली. आभार नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी मानले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसHingoliहिंगोली