शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
5
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
6
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
7
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
8
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
9
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
10
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
11
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
12
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
13
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
14
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
15
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
16
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
17
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
18
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
19
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

२० टक्के बालकांमध्ये जंतदोष ; जंतदोष गोळ्या वाटप केल्या का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:27 IST

हिंगोली : कोरोना महामारीमुळे गत दोन वर्ष शाळा बंद असल्यामुळे जंतनाशक गोळ्यांचे वाटप करता आले नाही. सद्यस्थितीत शाळा बंद ...

हिंगोली : कोरोना महामारीमुळे गत दोन वर्ष शाळा बंद असल्यामुळे जंतनाशक गोळ्यांचे वाटप करता आले नाही. सद्यस्थितीत शाळा बंद असल्या तरी शाळाबाह्य विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे २१ ते २८ सप्टेंबर दरम्यान वाटप करण्यात येणार आहे. ही मोहीम शासनामार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात २० टक्के बालकांमध्ये जंतदोष असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

सद्यस्थितीत शाळा बंद असल्या तरी शाळेच्या प्रांगणात नेमणूक केलेल्या शिक्षकांकडे या गोळ्यांचे वाटप मोहिमेदरम्यान केले जाणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना आशावर्कर, आरोग्य सेविकांमार्फत जंतनाशक गोळ्या देण्याचे काम सुरू आहे. याबाबत शासनाने तसे निर्देश दिल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले. ज्या पालकांना जंतनाशक गोळ्या मिळाल्या नाहीत त्यांनी, आशावर्कर, आरोग्य सेविका किंवा आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. सर्वांना जंतनाशक गोळ्या दिल्या जातील. सध्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या दिल्या जात आहेत.

- काय आहे जंतदोष...

बालक जर गोड पदार्थ मागत असेल तर त्याच्या पोटात जंत आहेत हे समजावे. पालकांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जंतनाशक गोळी बारीक करून पाण्यात टाकून चमच्याने ते पाणी पाजावे.

- वयाच्या १९ वर्षांपर्यत द्याव्या लागतात गोळ्या...

वय वर्ष एकच्याखाली ही जंतनाशक गोळी बालकाला देऊ नये. १ ते १९ वर्षांपर्यत ही जंतनाशक गोळी द्यावी. ही गोळी पाण्यात विरघळून द्यावी, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

- गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधायचा...

शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी जंतनाशक गोळ्यांसाठी आशा वर्कर, आरोग्यसेविका किंवा आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. बालकांना जास्त त्रास होत असेल तर तज्ज्ञ डॉक़्टरांचा सल्ला घेऊनच औषध द्यावे.

आरोग्य विभागातर्फे केले जाते वाटप...

जंतनाशक गोळ्यांचे वाटप हे आरोग्य विभागातर्फे केले जात आहे. तेव्हा नागरिकांनी जंतनाशक गोळ्याबाबत आरोग्य विभाग किंवा आशा वर्कर यांच्याकडे विचारणा करावी. एक वर्षाखालील मुलांना ही जंतनाशक गोळी देऊ नये.

बालकांची काळजी घ्यावी...

बालकांच्या पोटात जंत असल्यास बालकांना खूप त्रास होतो. बालक रडू लागते. बालक सतत गोड पदार्थ मागत असतो. अशावेळी त्यास गोड पदार्थ न देता जंतनाशक गोळी द्यावी. ही गोळी पाण्यात विरघळून द्यावी. बालकास बाहेरचे पदार्थ देण्याचे टाळावे. एक ते दोन वर्ष बालकास अर्धी गोळी द्यावी.

- डॉ. नामदेव कोरडे, तालुका आरोग्य अधिकारी