शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

२० टक्के बालकांमध्ये जंतदोष ; जंतदोष गोळ्या वाटप केल्या का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:27 IST

हिंगोली : कोरोना महामारीमुळे गत दोन वर्ष शाळा बंद असल्यामुळे जंतनाशक गोळ्यांचे वाटप करता आले नाही. सद्यस्थितीत शाळा बंद ...

हिंगोली : कोरोना महामारीमुळे गत दोन वर्ष शाळा बंद असल्यामुळे जंतनाशक गोळ्यांचे वाटप करता आले नाही. सद्यस्थितीत शाळा बंद असल्या तरी शाळाबाह्य विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे २१ ते २८ सप्टेंबर दरम्यान वाटप करण्यात येणार आहे. ही मोहीम शासनामार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात २० टक्के बालकांमध्ये जंतदोष असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

सद्यस्थितीत शाळा बंद असल्या तरी शाळेच्या प्रांगणात नेमणूक केलेल्या शिक्षकांकडे या गोळ्यांचे वाटप मोहिमेदरम्यान केले जाणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना आशावर्कर, आरोग्य सेविकांमार्फत जंतनाशक गोळ्या देण्याचे काम सुरू आहे. याबाबत शासनाने तसे निर्देश दिल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले. ज्या पालकांना जंतनाशक गोळ्या मिळाल्या नाहीत त्यांनी, आशावर्कर, आरोग्य सेविका किंवा आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. सर्वांना जंतनाशक गोळ्या दिल्या जातील. सध्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या दिल्या जात आहेत.

- काय आहे जंतदोष...

बालक जर गोड पदार्थ मागत असेल तर त्याच्या पोटात जंत आहेत हे समजावे. पालकांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जंतनाशक गोळी बारीक करून पाण्यात टाकून चमच्याने ते पाणी पाजावे.

- वयाच्या १९ वर्षांपर्यत द्याव्या लागतात गोळ्या...

वय वर्ष एकच्याखाली ही जंतनाशक गोळी बालकाला देऊ नये. १ ते १९ वर्षांपर्यत ही जंतनाशक गोळी द्यावी. ही गोळी पाण्यात विरघळून द्यावी, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

- गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधायचा...

शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी जंतनाशक गोळ्यांसाठी आशा वर्कर, आरोग्यसेविका किंवा आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. बालकांना जास्त त्रास होत असेल तर तज्ज्ञ डॉक़्टरांचा सल्ला घेऊनच औषध द्यावे.

आरोग्य विभागातर्फे केले जाते वाटप...

जंतनाशक गोळ्यांचे वाटप हे आरोग्य विभागातर्फे केले जात आहे. तेव्हा नागरिकांनी जंतनाशक गोळ्याबाबत आरोग्य विभाग किंवा आशा वर्कर यांच्याकडे विचारणा करावी. एक वर्षाखालील मुलांना ही जंतनाशक गोळी देऊ नये.

बालकांची काळजी घ्यावी...

बालकांच्या पोटात जंत असल्यास बालकांना खूप त्रास होतो. बालक रडू लागते. बालक सतत गोड पदार्थ मागत असतो. अशावेळी त्यास गोड पदार्थ न देता जंतनाशक गोळी द्यावी. ही गोळी पाण्यात विरघळून द्यावी. बालकास बाहेरचे पदार्थ देण्याचे टाळावे. एक ते दोन वर्ष बालकास अर्धी गोळी द्यावी.

- डॉ. नामदेव कोरडे, तालुका आरोग्य अधिकारी