शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

२० टक्के बालकांमध्ये जंतदोष ; जंतदोष गोळ्या वाटप केल्या का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:27 IST

हिंगोली : कोरोना महामारीमुळे गत दोन वर्ष शाळा बंद असल्यामुळे जंतनाशक गोळ्यांचे वाटप करता आले नाही. सद्यस्थितीत शाळा बंद ...

हिंगोली : कोरोना महामारीमुळे गत दोन वर्ष शाळा बंद असल्यामुळे जंतनाशक गोळ्यांचे वाटप करता आले नाही. सद्यस्थितीत शाळा बंद असल्या तरी शाळाबाह्य विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे २१ ते २८ सप्टेंबर दरम्यान वाटप करण्यात येणार आहे. ही मोहीम शासनामार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात २० टक्के बालकांमध्ये जंतदोष असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

सद्यस्थितीत शाळा बंद असल्या तरी शाळेच्या प्रांगणात नेमणूक केलेल्या शिक्षकांकडे या गोळ्यांचे वाटप मोहिमेदरम्यान केले जाणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना आशावर्कर, आरोग्य सेविकांमार्फत जंतनाशक गोळ्या देण्याचे काम सुरू आहे. याबाबत शासनाने तसे निर्देश दिल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले. ज्या पालकांना जंतनाशक गोळ्या मिळाल्या नाहीत त्यांनी, आशावर्कर, आरोग्य सेविका किंवा आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. सर्वांना जंतनाशक गोळ्या दिल्या जातील. सध्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या दिल्या जात आहेत.

- काय आहे जंतदोष...

बालक जर गोड पदार्थ मागत असेल तर त्याच्या पोटात जंत आहेत हे समजावे. पालकांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जंतनाशक गोळी बारीक करून पाण्यात टाकून चमच्याने ते पाणी पाजावे.

- वयाच्या १९ वर्षांपर्यत द्याव्या लागतात गोळ्या...

वय वर्ष एकच्याखाली ही जंतनाशक गोळी बालकाला देऊ नये. १ ते १९ वर्षांपर्यत ही जंतनाशक गोळी द्यावी. ही गोळी पाण्यात विरघळून द्यावी, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

- गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधायचा...

शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी जंतनाशक गोळ्यांसाठी आशा वर्कर, आरोग्यसेविका किंवा आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. बालकांना जास्त त्रास होत असेल तर तज्ज्ञ डॉक़्टरांचा सल्ला घेऊनच औषध द्यावे.

आरोग्य विभागातर्फे केले जाते वाटप...

जंतनाशक गोळ्यांचे वाटप हे आरोग्य विभागातर्फे केले जात आहे. तेव्हा नागरिकांनी जंतनाशक गोळ्याबाबत आरोग्य विभाग किंवा आशा वर्कर यांच्याकडे विचारणा करावी. एक वर्षाखालील मुलांना ही जंतनाशक गोळी देऊ नये.

बालकांची काळजी घ्यावी...

बालकांच्या पोटात जंत असल्यास बालकांना खूप त्रास होतो. बालक रडू लागते. बालक सतत गोड पदार्थ मागत असतो. अशावेळी त्यास गोड पदार्थ न देता जंतनाशक गोळी द्यावी. ही गोळी पाण्यात विरघळून द्यावी. बालकास बाहेरचे पदार्थ देण्याचे टाळावे. एक ते दोन वर्ष बालकास अर्धी गोळी द्यावी.

- डॉ. नामदेव कोरडे, तालुका आरोग्य अधिकारी