शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

चार गावांतील आराखड्याची कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:48 IST

मानव निर्देशांक कमी असलेल्या व दुर्गम भागातील गावांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत सेनगाव तालुक्यातील चार गावांमध्ये आराखडे तयार करण्याचे काम नुकतेच सुरू झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मानव निर्देशांक कमी असलेल्या व दुर्गम भागातील गावांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत सेनगाव तालुक्यातील चार गावांमध्ये आराखडे तयार करण्याचे काम नुकतेच सुरू झाले.मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून दुर्गम गावांसाठी मोठ-मोठ्या कंपन्यांच्या सीएसआर उपक्रमातून तसेच शासन योजनांच्या वापरातून ही योजना पुढे आली आहे. या योजनेत महाराष्ट्रातील १ हजार गावे निवडण्यात आली आहेत. यामध्ये हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातील लिंगदरी, जामदया, गोंडाळा, खिल्लार या गावांत ही कामे होणार आहेत. यात निवडलेल्या गावात दोन वर्षांत सर्व कामे करणे अपेक्षित आहे. अशा दुर्गम गावात केवळ भौतिक सुविधाच्या उभ्या करायच्या नसून सामाजिक, आर्थिक उत्थानासाठीही कामे करायची आहेत. यात रोहयो, जि.प., बांधकाम, वन, कृषी अशा विविध विभागांचाही सहभाग घेतला जाणार आहे. शिवाय ही गावे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतही असून यातील कामेही होणार आहेत. तर जेथे कोणत्याच योजनेतून काम घेणे शक्य नाही, असे काम सीएसआरमधून कंपन्यांमार्फत करून घेणार आहेत. एवढेच नव्हे, तर या आराखड्यानुसार एखादे गावच एखादी कंपनी दत्तक घेणार असल्यास त्यांना तसेही कामे करून देण्यास मुभा दिली जाणार आहे.जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर याबाबतचा आढावा नियमितपणे घेतला जाणार आहे.या गावांसाठी चार मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक दाखल झाले आहेत. ते प्रत्यक्ष गावात राहून आराखडा तयार करतील. त्यात गावांच्या गरजांचा व परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून आराखडा बनविला जाईल. तर १ मेच्या ग्रामसभेत हा आराखडा मंजूर व्हावा, असे नियोजन केले जात आहे.