शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चार गावांतील आराखड्याची कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:48 IST

मानव निर्देशांक कमी असलेल्या व दुर्गम भागातील गावांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत सेनगाव तालुक्यातील चार गावांमध्ये आराखडे तयार करण्याचे काम नुकतेच सुरू झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मानव निर्देशांक कमी असलेल्या व दुर्गम भागातील गावांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत सेनगाव तालुक्यातील चार गावांमध्ये आराखडे तयार करण्याचे काम नुकतेच सुरू झाले.मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून दुर्गम गावांसाठी मोठ-मोठ्या कंपन्यांच्या सीएसआर उपक्रमातून तसेच शासन योजनांच्या वापरातून ही योजना पुढे आली आहे. या योजनेत महाराष्ट्रातील १ हजार गावे निवडण्यात आली आहेत. यामध्ये हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातील लिंगदरी, जामदया, गोंडाळा, खिल्लार या गावांत ही कामे होणार आहेत. यात निवडलेल्या गावात दोन वर्षांत सर्व कामे करणे अपेक्षित आहे. अशा दुर्गम गावात केवळ भौतिक सुविधाच्या उभ्या करायच्या नसून सामाजिक, आर्थिक उत्थानासाठीही कामे करायची आहेत. यात रोहयो, जि.प., बांधकाम, वन, कृषी अशा विविध विभागांचाही सहभाग घेतला जाणार आहे. शिवाय ही गावे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतही असून यातील कामेही होणार आहेत. तर जेथे कोणत्याच योजनेतून काम घेणे शक्य नाही, असे काम सीएसआरमधून कंपन्यांमार्फत करून घेणार आहेत. एवढेच नव्हे, तर या आराखड्यानुसार एखादे गावच एखादी कंपनी दत्तक घेणार असल्यास त्यांना तसेही कामे करून देण्यास मुभा दिली जाणार आहे.जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर याबाबतचा आढावा नियमितपणे घेतला जाणार आहे.या गावांसाठी चार मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक दाखल झाले आहेत. ते प्रत्यक्ष गावात राहून आराखडा तयार करतील. त्यात गावांच्या गरजांचा व परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून आराखडा बनविला जाईल. तर १ मेच्या ग्रामसभेत हा आराखडा मंजूर व्हावा, असे नियोजन केले जात आहे.