शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

जिल्ह्यात शिष्यवृत्ती योजनेची कामे संथ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 23:48 IST

शासनाकडून दरवर्षी शालेय मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो. २०१७-१८ व २०१८-१९ मधील शैक्षणिक वर्षातील २१ हजार २१६ विद्यार्थिनीं सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. पात्र विद्यार्थिनींच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी ही कामे बँकेतून संथगतिने सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शासनाकडून दरवर्षी शालेय मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो. २०१७-१८ व २०१८-१९ मधील शैक्षणिक वर्षातील २१ हजार २१६ विद्यार्थिनीं सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. पात्र विद्यार्थिनींच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी ही कामे बँकेतून संथगतिने सुरू आहेत.मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी शासनाकडून विविध शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाते. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील जि.प.समाज कल्याणअंतर्गत ५ वी ते सातवीतील विद्यार्थिनींना वार्षिक ६०० रूपये तर ८ वी ते १० वी तील मुलींना वार्षिक १ हजार रूपये याप्रमाणे लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाते. परंतु सध्या बँकेतील इतर कामकाजामुळे मात्र शिष्यवृत्ती लाभधारकांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया जलद गतीने होत नसल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ही कामे लवकर करणे गरजचे आहे.जि. प. समाज कल्याणअंतर्गत दरवर्षी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, मेट्रीकपूर्व तसेच अस्वच्छ व्यवसाय करणाºया पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मधील शिष्यवृत्तीसाठी शासनाकडून प्राप्त झालेले १ कोटी ५ लाख रूपये समाज कल्याणतर्फे बँकेत वर्ग करण्यात आले होते. संबंधित शाळांनी विद्यार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव कार्यालयास सादर केले नव्हते. तसेच मुख्याध्यापकांच्या लॉग इनवरून जिल्हा कार्यालयाच्या लॉग इनवर प्रस्तावच प्राप्त झाले नाही. त्यामुळे विद्यार्थी शासनाच्या शिष्यवृत्तीपासून वंचित होते. परंतु उशिराने का होईना अखेर २०१६-१७ मधील लाभार्थ्यांच्या रक्कम मार्च महिन्यात खात्यावर वर्ग केली.सूचना नाहीत...४जिल्हा परिषद समाजकल्याण तर्फे विविध योजनेअंतर्गत दिल्या जाणाºया शिष्यवृत्ती योजना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना शासनाकडून कळविण्यात आल्या नाहीत. सदर प्रस्ताव मुख्याध्यापकांनी आॅनलाईन पाठवायचे की, आॅफलाईन याचा अद्याप ताळमेळ लागला नाही. शासनकडून याबाबत सूचना मिळताच प्रस्ताव सादरीकरणाच्या सूचना संबधित शाळांच्या मुख्याध्यापकांना दिल्या जाणार असल्याचे जि. प. समाजकल्याण शिष्यवृत्ती विभागातर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :HingoliहिंगोलीEducationशिक्षण