शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

२२ गावांतच जलयुक्तची ५0 टक्क्यांवर कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:16 IST

जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत २0१८-१९ च्या आराखड्यात तब्बल ११५ गावांची निवड केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत २0१८-१९ च्या आराखड्यात तब्बल ११५ गावांची निवड केली आहे. तर यापैकी २२ गावांतच आराखड्याची ५0 टक्क्यांपेक्षा जास्त अंमलबजावणी झाली आहे. उर्वरित ९0 पेक्षा जास्त गावे अजूनही त्यापेक्षा कमीच कामे झालेली आहेत.या योजनेत यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे थोडीबहुत सुधारणा दिसत असली तरीही हे वर्ष निवडणुकांचे असल्याने यात मोठ्या अडचणी येणार असल्याचे लक्षात घेता कामांना गती देणे गरजेचे आहे. जलयुक्त शिवार योजना याच शासनाच्या काळात सर्वच गावांपर्यंत पोहोचण्यासाठी यंदा निवडण्यात आलेल्या गावांची संख्या तब्बल ११५ आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने निवडलेल्या गावांत कामे करण्याची कवायत विविध यंत्रणांना करावी लागणार आहे. केवळ २२ गावांत ८0 टक्के कामे झाली आहेत. यात हिंगोली, वसम व कळमनुरी प्रत्येकी ३ तर सेनगाव ४ व औंढ्यातील ९ गावांचा समावेश आहे. ५0 टक्के कामे झालेल्यांत हिंगोली १२, कळमनुरी २, सेनगाव ११, वसमत १0, औंढा ८ अशी संख्या आहे. ३0 टक्के कामे झालेल्यांत हिंगोली १४, कळमनुरी ५, सेनगाव ५, वसमत १0 तर औंढ्यातील ४ गावांचा समावेश आहे.यामध्ये सर्वांत कमी गावे कळमनुरी तालुक्यात असताना याच तालुक्यात कामांची गतीही सर्वांत धिमी असल्याचे दिसत आहे. तर औंढा तालुक्यात गावांच्या संख्येच्या तुलनेत चांगले काम आहे. त्यापाठोपाठ हिंगोलीचे काम चांगले दिसत आहे.हिंगोली जिल्ह्यात आराखड्यानुसार ४८.४६ कोटींची २४१२ कामे प्रस्तावित केली आहेत. मात्र प्रत्यज्ञात २६.५३ कोटींच्या १८५२ कामांना कार्यारंभ आदेश दिला. यातील १0९९ कामे पूर्ण झाली असून २.६४ कोटी खर्च झाला. तर ३७७ कामे सुरू असून त्यावर ७.२२ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. यावरून कमी खर्चाची कामे तेवढीच पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. त्यातही नाला सरळीकरणाच्या कामांवरच जोर असून सर्व यंत्रणा ही कामे जास्त करीत आहेत. यामध्ये कंत्राटदारांनाही मार्जिन असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाWaterपाणी