शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

महिलांच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:15 IST

बचत गटातील महिलांना बचतीचे नियोजन १०० वेळा सांगूनही जर त्यांच्या काहीच फरक पडत नसेल तर त्यांची प्रगती होणार तरी कशी? आपल्यासह कुटूंबाची प्रगती होण्यासाठी महिलांच्या मानसिकतेत खरोखरच बदल होणे गरजेचा असल्याचे प्रतिपादन तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी धान फाऊंडेशनच्या वतीने घेतलेल्या कार्यक्रमात केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : बचत गटातील महिलांना बचतीचे नियोजन १०० वेळा सांगूनही जर त्यांच्या काहीच फरक पडत नसेल तर त्यांची प्रगती होणार तरी कशी? आपल्यासह कुटूंबाची प्रगती होण्यासाठी महिलांच्या मानसिकतेत खरोखरच बदल होणे गरजेचा असल्याचे प्रतिपादन तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी धान फाऊंडेशनच्या वतीने घेतलेल्या कार्यक्रमात केले.शासन जरी विविध योजना राबवित असले तरी त्याचा लाभ घेण्यासाठी लोकसहभाग हा अतिशय महत्वाचा भाग असतो. लोकसहभाग असेल्या बचत गटाचा कोणत्याही योजनेसाठी प्राधान्यांने विचार केला जातो. त्यामुळे बचतगटातील महिलांनी याचा फायदा जरुन घ्यायला हवा. बँकेशी व्यवहार चांगले ठेवल्यास बँकेकडून वाढीव कर्ज मिळून विविध उद्योग उभारणे शक्य होण्यास मदत होते आदी संदर्भात तहसीलदार गोरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. तसेच मिरा गणगे यांनी देखील बचत गटातील लहानसहा बाबी सजमजून सांगितल्या. त्यांनी सांगितले शासन विविध योजना राबवित आहे. महिलासांठी राबविण्यात येणाºया योजनांकडे डोळे झाक करुन चालणार नाही तर त्या योजनांचा फायदा घेऊन महिलांने निर्भिड पणे उभे राहणे गरजेचे आहे. घराचा संपूर्ण भार हा महिलेवर असल्याने त्या अतिशय काटकसरीने संसार चालविण्याचे नियोजन करतात. तर महिलाच पदराने दु:ख आणि सुख झेलू शकतात. धनी सोडून गेला तरीही न खचून जाता आपल्या चिल्यापिल्यांना पांखरासाखरे उडण्याचे बळ देऊ शकतात. तर आर्थिक विकासाची वाटचाल बचत गटाच्या रस्त्यावरुन जाते आदी उदाहरणे देत महिलांना मार्गदर्शन केले. प्रस्ताविक विभागीय समन्वयक महादेव पुरी यांनी तर सूत्रसंचालन प्रविण भिक ले केले. आभार अनिल दवणे यानी मानले. यशस्वीतेसाठी हनुमान जगताप, प्रदीप रणखांब, अमोल ससाणे, मयूर ठवळी, गणेश तिखांडे, गुलाब गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास जिल्हाभरांतून मोठ्या संख्येने महिला आल्या होत्या.विविध योजनेतून बचत गटांना मिळणाºया योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र व भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्ष संस्थेंतर्गत प्रशिक्षण दिले जाते. जणे करुन त्यांना या प्रशिक्षणामुळे ज्या व्यवसायासाठी कर्ज घ्यावयाचे आहे. त्यासाठी उपयोग होईल. परंतु बहुधा महिला अर्धवट प्रशिक्षण सोडत असल्याचे दिपाळी काळे यांनी सांगितले. त्यामुळे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना योजनेंचा उपयोग घेताच येत नसल्याचे चित्र आहे. महिलांचे गणित पक्के असले तरीही त्या जगाच्या भितीपोटी स्वत:ला अडाणी म्हणून घेतात. त्यामुळे त्यांची प्रगती होण्या ऐवजी नेहमीच अधोगतीच होते.