शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

महिलांच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:15 IST

बचत गटातील महिलांना बचतीचे नियोजन १०० वेळा सांगूनही जर त्यांच्या काहीच फरक पडत नसेल तर त्यांची प्रगती होणार तरी कशी? आपल्यासह कुटूंबाची प्रगती होण्यासाठी महिलांच्या मानसिकतेत खरोखरच बदल होणे गरजेचा असल्याचे प्रतिपादन तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी धान फाऊंडेशनच्या वतीने घेतलेल्या कार्यक्रमात केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : बचत गटातील महिलांना बचतीचे नियोजन १०० वेळा सांगूनही जर त्यांच्या काहीच फरक पडत नसेल तर त्यांची प्रगती होणार तरी कशी? आपल्यासह कुटूंबाची प्रगती होण्यासाठी महिलांच्या मानसिकतेत खरोखरच बदल होणे गरजेचा असल्याचे प्रतिपादन तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी धान फाऊंडेशनच्या वतीने घेतलेल्या कार्यक्रमात केले.शासन जरी विविध योजना राबवित असले तरी त्याचा लाभ घेण्यासाठी लोकसहभाग हा अतिशय महत्वाचा भाग असतो. लोकसहभाग असेल्या बचत गटाचा कोणत्याही योजनेसाठी प्राधान्यांने विचार केला जातो. त्यामुळे बचतगटातील महिलांनी याचा फायदा जरुन घ्यायला हवा. बँकेशी व्यवहार चांगले ठेवल्यास बँकेकडून वाढीव कर्ज मिळून विविध उद्योग उभारणे शक्य होण्यास मदत होते आदी संदर्भात तहसीलदार गोरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. तसेच मिरा गणगे यांनी देखील बचत गटातील लहानसहा बाबी सजमजून सांगितल्या. त्यांनी सांगितले शासन विविध योजना राबवित आहे. महिलासांठी राबविण्यात येणाºया योजनांकडे डोळे झाक करुन चालणार नाही तर त्या योजनांचा फायदा घेऊन महिलांने निर्भिड पणे उभे राहणे गरजेचे आहे. घराचा संपूर्ण भार हा महिलेवर असल्याने त्या अतिशय काटकसरीने संसार चालविण्याचे नियोजन करतात. तर महिलाच पदराने दु:ख आणि सुख झेलू शकतात. धनी सोडून गेला तरीही न खचून जाता आपल्या चिल्यापिल्यांना पांखरासाखरे उडण्याचे बळ देऊ शकतात. तर आर्थिक विकासाची वाटचाल बचत गटाच्या रस्त्यावरुन जाते आदी उदाहरणे देत महिलांना मार्गदर्शन केले. प्रस्ताविक विभागीय समन्वयक महादेव पुरी यांनी तर सूत्रसंचालन प्रविण भिक ले केले. आभार अनिल दवणे यानी मानले. यशस्वीतेसाठी हनुमान जगताप, प्रदीप रणखांब, अमोल ससाणे, मयूर ठवळी, गणेश तिखांडे, गुलाब गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास जिल्हाभरांतून मोठ्या संख्येने महिला आल्या होत्या.विविध योजनेतून बचत गटांना मिळणाºया योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र व भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्ष संस्थेंतर्गत प्रशिक्षण दिले जाते. जणे करुन त्यांना या प्रशिक्षणामुळे ज्या व्यवसायासाठी कर्ज घ्यावयाचे आहे. त्यासाठी उपयोग होईल. परंतु बहुधा महिला अर्धवट प्रशिक्षण सोडत असल्याचे दिपाळी काळे यांनी सांगितले. त्यामुळे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना योजनेंचा उपयोग घेताच येत नसल्याचे चित्र आहे. महिलांचे गणित पक्के असले तरीही त्या जगाच्या भितीपोटी स्वत:ला अडाणी म्हणून घेतात. त्यामुळे त्यांची प्रगती होण्या ऐवजी नेहमीच अधोगतीच होते.