शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

महिलांच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:15 IST

बचत गटातील महिलांना बचतीचे नियोजन १०० वेळा सांगूनही जर त्यांच्या काहीच फरक पडत नसेल तर त्यांची प्रगती होणार तरी कशी? आपल्यासह कुटूंबाची प्रगती होण्यासाठी महिलांच्या मानसिकतेत खरोखरच बदल होणे गरजेचा असल्याचे प्रतिपादन तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी धान फाऊंडेशनच्या वतीने घेतलेल्या कार्यक्रमात केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : बचत गटातील महिलांना बचतीचे नियोजन १०० वेळा सांगूनही जर त्यांच्या काहीच फरक पडत नसेल तर त्यांची प्रगती होणार तरी कशी? आपल्यासह कुटूंबाची प्रगती होण्यासाठी महिलांच्या मानसिकतेत खरोखरच बदल होणे गरजेचा असल्याचे प्रतिपादन तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी धान फाऊंडेशनच्या वतीने घेतलेल्या कार्यक्रमात केले.शासन जरी विविध योजना राबवित असले तरी त्याचा लाभ घेण्यासाठी लोकसहभाग हा अतिशय महत्वाचा भाग असतो. लोकसहभाग असेल्या बचत गटाचा कोणत्याही योजनेसाठी प्राधान्यांने विचार केला जातो. त्यामुळे बचतगटातील महिलांनी याचा फायदा जरुन घ्यायला हवा. बँकेशी व्यवहार चांगले ठेवल्यास बँकेकडून वाढीव कर्ज मिळून विविध उद्योग उभारणे शक्य होण्यास मदत होते आदी संदर्भात तहसीलदार गोरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. तसेच मिरा गणगे यांनी देखील बचत गटातील लहानसहा बाबी सजमजून सांगितल्या. त्यांनी सांगितले शासन विविध योजना राबवित आहे. महिलासांठी राबविण्यात येणाºया योजनांकडे डोळे झाक करुन चालणार नाही तर त्या योजनांचा फायदा घेऊन महिलांने निर्भिड पणे उभे राहणे गरजेचे आहे. घराचा संपूर्ण भार हा महिलेवर असल्याने त्या अतिशय काटकसरीने संसार चालविण्याचे नियोजन करतात. तर महिलाच पदराने दु:ख आणि सुख झेलू शकतात. धनी सोडून गेला तरीही न खचून जाता आपल्या चिल्यापिल्यांना पांखरासाखरे उडण्याचे बळ देऊ शकतात. तर आर्थिक विकासाची वाटचाल बचत गटाच्या रस्त्यावरुन जाते आदी उदाहरणे देत महिलांना मार्गदर्शन केले. प्रस्ताविक विभागीय समन्वयक महादेव पुरी यांनी तर सूत्रसंचालन प्रविण भिक ले केले. आभार अनिल दवणे यानी मानले. यशस्वीतेसाठी हनुमान जगताप, प्रदीप रणखांब, अमोल ससाणे, मयूर ठवळी, गणेश तिखांडे, गुलाब गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास जिल्हाभरांतून मोठ्या संख्येने महिला आल्या होत्या.विविध योजनेतून बचत गटांना मिळणाºया योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र व भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्ष संस्थेंतर्गत प्रशिक्षण दिले जाते. जणे करुन त्यांना या प्रशिक्षणामुळे ज्या व्यवसायासाठी कर्ज घ्यावयाचे आहे. त्यासाठी उपयोग होईल. परंतु बहुधा महिला अर्धवट प्रशिक्षण सोडत असल्याचे दिपाळी काळे यांनी सांगितले. त्यामुळे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना योजनेंचा उपयोग घेताच येत नसल्याचे चित्र आहे. महिलांचे गणित पक्के असले तरीही त्या जगाच्या भितीपोटी स्वत:ला अडाणी म्हणून घेतात. त्यामुळे त्यांची प्रगती होण्या ऐवजी नेहमीच अधोगतीच होते.